Friday, September 2, 2011

ओर्कुट comunity च्या राड्यातून ब्लॉग युद्ध रंगले!

गेले काही दिवस खालील दोन ब्लॉग मध्ये ब्लॉग युध्द रंगले आहे.पैकी एक आहेत खबर मराठी नेटीझंसची.आणि ह्या व्यक्तीचे ओर्कुट प्रोफयाल -"आम्ही ओर्कुट चे बातमीदार २४* " आहे.आणि प्रोफयाल एका स्त्रीचे आहे.(म्हणजे तस लिहील आहे)

तर दुसरा ब्लॉग हा बातमीदाराचे बाप आहे. वरील ब्लॉग ला उत्तर म्हुणन हा ब्लॉग आहे त्यांचे ओर्कुट खाते " ...आम्ही बातमीदाराचे बाप" आहे.

तसेच "ओर्कुट चेहर्यांचा पर्दाफाश" नावाचा एक समूह हि चालू झाला आहे.

वरील सगळेच जण असे बोलतात कि आम्ही एकेकाची लफडी,बातम्या बाहेर काढू,कोण कोणाचे फेक ते सांगू.
त्यांना काय करयचे ते करू द्या पण माझा उल्लेख त्या ब्लॉगस मध्ये झाल्यामुळे मला स्पष्टीकरण देणे भाग आहे.स्पष्टीकरण देण्याची काही गरज न्हवती.उलट अस करून मी त्याना मोठा करतोय.पण जे मी केल नाही ते माझ्या नावावर खपवल जात असेल तर मला माझी बाजू मांडवी लागेल.(उद्या भविष्यात आमदार झालो कि प्रेस नोट काढण्याची प्र्याक्तीस ह्या निमित्ताने होत आहे)

१)खबर मराठी नेटीझंसची
हे एका बाईचे खाते आहे (असे लिहील आहे).ह्या बाईंची माहिती काढण्याचे खबरी नेटवर्क सादिक चिकना आणि असलम हटेला पेक्षा सोलिड आहे.
ह्या मला आंतरजालावरील प्रती ठाकरे म्हणाले आहे.हा सन्मान आहे कि उपहास ते मला अजून कळलेले नाही.

मी शिवसेना ओर्कुट समुदाय आणि फेसबुक पेज वरच्या ज्या काही उठाठेवी केल्या त्या त्यांनी लिहिल्या आहेत.
त्या बाबत मी त्या त्या व्यक्तींशी प्रत्यक्ष भेटून बोललो.मुळात समाजातील राडेबाज नेतृत्व आणि नेट वरील सुसंस्कृत उच्च शिक्षित समाज ह्यांचे नेतृत्व असा तो संघर्ष होता. आणि आम्ही सगळे आपल्या आपल्या जागी योग्यच होतो.ग्रेट माणसे आहेत ती.निष्ठावान आहेत.ह्यांनी मॉड केला किंवा त्यांनी दारू पाजली तर समूहावर तली उचलणारे वाटले काय?

मी त्या कोणालाही आणि ते कोणी मलाही एका मर्यादेत राहूनच,परस्पर सन्मान ठेवून वाद,चर्चा करत होतो.जे लिहील ते खरय पण ती एकच बाजू आहे.हा संघटनेतील वाद आहे आणि ते होताच राहणार.म्हणून ते चव्हाट्या वर आणणे कितीपत योग्य आहे? त्या आमच्या १५ जणांच्या टीम पैकी एक कोनि तरी फुटला त्यांनी टीप दिली हे मान्य कराव लागेल.म्हणून मी सगळ्यांना दोष देणार नाही.आता लवकरच बैठक होणार आहे त्यात मी प्रत्यक्ष चर्चा ह्या मुद्द्यावर करीन.

त्यांनी जे दुसर लिहील कि अन्य समूहावर अमुक केल इकडे तमुक केल.हो लिहील.पक्षाचा विचार मांडला.उगाच कोण नडला तर त्याला फोडला.त्यावर मी ठाम आहे.

२) बातमीदाराचे बाप
ह्याने म्हंटले कि मी एका समूहाची वाट लावली.नियंत्रक अधिकाराचा गैरवापर केला.त्यांना एकच सांगीन -टाळी एका हाताने वाजत नसते.पहिल्या लेखावरील माझी प्रतिक्रिया- "मला तुलना नाही करयाची पण हे म्हणजे अस झाल न-

जेव्हा देशात कुठेही बॉम्ब फुटतो आणि ट्रेस लागत नाही तेव्हा डॉग विजय सिंघ सारखी कोन्ग्रेजी पिलावळ कोकालते कि ह्यात "संघाचा हाथ" आहे

तस हे सगळ चालू आहे.सायबर सेल मुंबई पुणे मी खिशात घालून फिरतो.किती तक्रारी आजवर केल्या,किती तरी प्रोफायाल,मजकूर आणि व्हिदिओ काढायला लावले, किती तरी लोकांवर गुन्हे नोंद करायला लावले.मला जर एखाद्याची बदनामी करयाची असेल तर ती मी माझ्या ब्लॉग वर करीन.फेक नावानी कशाला.पण हा simple common sense which is very un common असल्याने हे पादरे पावटे माझ्या नावाने बांग देत फिरत आहेत."

दुसर्या लेखात त्यांनी मला म्हंटले आहे-"के.जी स्त्री सदस्यांना जो त्रास देत होता. त्या त्रासातून बऱ्याच स्त्रियांची सुटका झाली.अर्थात तसे मेसेज मला आले आहे."
तसेच हा बाई का बुवा हे कन्फर्म नसल्याने मी त्याला खालील प्रतिक्रिया त्याच्या दुसर्या लेखावर दिली आहे
"काय रे पाद्र्या,
काल पर्यंत तू पुरुष होतास ना रे पावट्या .आणि आजच्या ब्लॉग मध्ये महत्वाचे "सांगते" म्हणत सांगत्ये ऐका वाली कधी झालीस तू? एवढ्या जलद लिंग बदल शस्त्रक्रिया मफतलाल च्या पोराची पण झाली न्हवती.तू तर कमाल केलीस.

आणि मी स्वताच्या बायकांना -आजवर ज्या ज्या (GF) होत्या त्यांना त्रास दिला नाही तर नेट वर कोणत्या बाई ला त्रास दिल? "

३)ओर्कुट चेहर्यांचा पर्दाफाश
ह्यावर आज तरी जास्त बोलण्यासारखे नाही.पण खरच गरज होती अशा समूहाची.फेक वरून शंका घेणे हे सगळीकडेच चालू असत.त्यासाठी हे व्यासपीठ असेल तर चांगलाच म्हणव लागेल.ह्यांनी सध्या तरी सगळ्यांना प्रवेश द्यावा.म्हणजे खरे खोटे सगळ्यांना.आणि एक एक माणसास उघडे पाडावे.

उलट ह्या सगळ्यांमुळे मराठी ओर्कुट विश्व चर्चेत आल आहे.एक नवा प्राण फुंकला गेला आहे.मध्ये एकानी मुपिवर धागा काढला होता-"मराठी समूह ओर्कुट चालवत आहेत का?" त्याच म्हणन अस कि इतर राज्यात जिथे तो गेला ओर्कुट ची एवढी चर्चा नाही,तिथ लोक फेसबुक वैगेरे वापरतात. आज हे ब्लॉग युद्ध बघून तो टोपीक आठवला.
आपल्या मराठी माणसाची एकमेक्नाची पाय खेचायची खेकडा वृत्ती मुळे हे सगळ होतंय.आणि गुगल व ओर्कुट कमवतय.

तुम्ही काय तो राडा करा.मला शिव्या घाला मी पण तुम्हाला शिव्या घालीन.पण कारण नसताना चुकीचे संदर्भ मला चिकटवले उगाच माझा उल्लेख आला आणि जरुरी वाटल तर मी माझ्या ब्लॉग च्या माध्यमातून अथवा "ओर्कुट चेहर्यांचा पर्दाफाश" ह्या नव्या व्यासपीठाने संधी दिल्यास ह्या दोन्ही ठिकाणी माझी बाजूं मांडीन.

जय हिंद! जय महाराष्ट्र!

(आता दहा दिवस मी घरचा गणपती आणि जुगारात बिझी असीन.त्यामुळे काहीतरी अळणी प्रतिक्रिया टाकून माझ्या फोडणीची वाट बघू नये.आणि प्रतिक्रिया नाही आली तर मी घाबरलो अशी बांग देवू नये.जमेल तस उत्तर देईन.)

अतृप्त आत्म्यानो!

पोर्णिमे पर्यंत मजा करा.पितृ पक्षात एकेकाचे श्राद्ध घालतो

No comments:

Post a Comment