Wednesday, April 17, 2013

रानडेंचा उंच झोका पण इतरांचं काय ?

महाराष्ट्रात बरीच थोर  लोक होऊन गेली. पण फुले शाहू आंबेडकर आणि शिवाजी त्यापलीकडे लोक पाहतच नाहीत. त्यापलीकडे फारस   बोलतही  नाही. सध्या उंच माझा झोकामुळे न्यायमूर्ती रानडे ह्यांची आमच्या पिढीला ओळख  झाली पण अनेक  खूप थोर व्यक्तिमत्वे महाराष्ट्रात होऊन गेली. ज्यांची फारशी ओळख महाराष्ट्रास  नाही. असलीच तर इतिहासात कुठेतरी वाचेलल  नाव इतकच. अशी थोर लोक महाराष्ट्रासमोर मालिकेच्या माध्यमातून यायला हवीत. पूर्वी अशा मालिका होत्या.  अशा मालिका अजून यायला हव्यात.

मला आठवत साधारण २००० साली  झी  मराठीवर दोन मालिका लागत.

एक होती मर्मबंध. हे मर्मबंध होते टिळक व आगरकर ह्यांच्यातील. टिळकांच प्रथम  लक्ष्य होत  स्वातंत्र्य  व नंतर सामाजिक सुधारणा. आगरकर हे मवाळ. त्याचं म्हणणं होत आधी सामाजिक सुधारणा नंतर स्वातंत्र्य. आगरकर हे केसरीचे संपादक  हि होते. टिळकांच्या नित्य संपर्कातील होते. पण सुधारणा आधी कि स्वातंत्र्य आधी ह्यातून दोघांचे वैचारिक मतभेद वाढत गेले. आगरकर केसरीतून बाहेर पडले. त्यांनी आपले समाज सुधारणाविषयक मत मांडण्यासाठी  सुधारक हे पत्र काढले. तेव्हा आगरकर Fergusson   कॉलेज जवळ राहत. तो भाग ओसाड  माळरान  होता.  त्यांना दमा  हि होता.  टिळकांनी आगरकर ह्यांना माळावरचा महारोगी म्हंटले. असा वैचारिक  मतभेदाचा  इतिहास आणि आगरकर ह्यांचे कार्य हे उत्तमरीत्या त्या मालिकेत दाखवलेलं होत.  

दुसरी मालिका होती तीच नाव आठवत नाही. ती त्या संतती नीयमन  बाबत कार्य केलेल्या कर्वे ह्यांच्यावर होती. लोकांना संतती नियमनाचा उपदेश करत असताना आपल्याला मुल नको असा विचार करणारा हा माणूस. त्यासाठी आपल्या भावना मारणारा अस  चित्रण त्यात दाखवलं. स्वतःचा वंश वाढू देणार नाही असा हा निर्धार.  ग्रेट, थोर  हि विशेषण  हि कमी पडतील.  शिवाय लोकांच्या टिका,शिव्या शाप ते कसे सहन करतात. अस सर्व त्यात होत.

अशा मालिका आता का येत नाहीत?  किती किती म्हणून नाव घेऊ ? टिळक, आगरकर,कर्वे,सार्वजनिक काका, गांधीजींचे गुरु नामदार गोखले,मुंबईचे शिल्पकार   नाना शंकरशेठ, विठ्ठल रामजी
शिंदे,कर्मवीर भाऊराव पाटील.