Tuesday, December 14, 2010

लाल महाल,ब्रिगेड व दादोजी


सध्याचा लाल महाल ही मूळ वास्तु नाही
ब्रिगेडी लेखक कोकाटे म्हणाला,“लाल महाल पुरात्त्वखात्याकडे असला पाहीजे. तो पालीकेच्या अधिकारात का ?”
ब्रिगेडी कोळसे-पाटील म्हणाला, “२००२ मध्ये लाल महालात दादोजी कोंडदेवचा पुतळा बसवला आणि २००४ मध्ये जेम्स लेनने वादग्रस्त पुस्तक लिहीले. या दोन्ही ठरवून केलेल्या गोष्टी आहेत.”

लाल महालाची थोडक्यात माहिती – या वाडयाची जागा झांब्रे पाटीलकडून विकत घेतली होती आणि त्यावर लाल महाल हा वाडा बांधण्यात आला होता. त्याचा पाया ५२ ½' x ८२ ½' या व्यासाचा होता आणि उंची ३० ½' होती. त्यास १३ ½' खोलीची तळघरे होती. १६४६-४७ मध्ये शिवाजी महाराजांनी त्यांची राजधानी राजगडला हलवली आणि लालमहालाचा उपयोग प्रशासकीय कामासाठी होऊ लागला. इ.स.१६८९ ते इ.स.१७०७ या धामधूमीच्या काळात लाल महालाची अगदी दुर्दशा झाली. मोडकळीस आलेल्या लाल महालाची १७३४-३५ मध्ये डागडूजी करून थोरल्या बाजीरावांनी तो राणोजी शिंदेंना आणि रामचंद्रपंतांना रहायला दिला.

राणोजी शिंदे गेल्यानंतर लाल महालाचा उपयोग गोदाम म्हणुन झाला. त्याला लोकांनी अंबरखाना या नावाने पुकारण्यास सुरुवात केली होती. इ.स.१८१८ मध्ये इंग्रजांनी तो पुर्ण उध्वस्त करून त्याची लाकडं व दगडी ` ३१५ ला विकली. या लाल महालाच्या प्रांगणात एक विहीर होती. दोन करंजे होते. इ.स.१९२५ मध्ये जिजामाता उद्यान बांधण्यात आले. आज जिथे हे जिजामाता उद्यान आहे तिथेच हा वाडा होता. दुर्दैवाने तो कसा दिसत होतो, त्याची रचना कशी होती या बाबत कुणालाच माहिती नाही.



१९५० मध्ये पुणे महानगरपालीकेने पुण्याचा सांस्कृतीक वारसा जपण्याचे ठरविले. त्यापैकी पुन्हा लाल महालाच्या प्रतीकृतीची उभारणी हा उपक्रम १९८४ मध्ये हाती घेतला. ही वास्तु इ.स.१९८८ बांधून पुर्ण तयार झाली. सोन्याच्या नांगरच्या प्रकरणामुळे लाल महालला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले होते. म्हणुन त्या प्रसंगाला धरून बाळशिवबाची ब्राँझची प्रतिमा तयार केली. त्याच बरोबर नजर ठेवून देखरेख करणार्‍या राजमाता जिजाबाईसाहेब तसेच प्रशासकीय आणि शिवबाच्या प्रशिक्षणाची बाजू संभाळणारे दादोजी कोंडदेव लाल महालाशी निगडीत असल्या कारणाने त्यांचेही पुतळे उभारले.
२००४ मध्ये दादोजींचा पुतळा उभारला गेला हा कोळसे-पाटलाचा कपोलकल्पीत आरोप बिनबूडाचा आहे. हा मूळ लाल महाल नसल्याने पुरातत्त्वखात्याचा या वर काहीच अधिकार नाही. ती पालीकेची मालमत्ता आहे. स्वत:ला इतिहास लेखक म्हणुन प्रसिद्धी मिळवू पाहणार्‍या कोकाटयाला एवढेसुद्धा माहीत नाही ?

ब्रिगेडी आक्षेप व माझे मत.


तिथे दादोजी ह्यांचा पुतळा का?शहाजी राजांनी जिजाऊ बरोबर शिवरायांच्या शिक्षणासाठी विविध विषयात निपुण बरेच लोक दिले होते.(उत्तर:असतील.देणारच कि)
.मग दादोजी गुरु होते असे भट का ओरडतात? शिवाय सरकारने जी समिती ह्या प्रश्नी स्थापन केली होती तिने देखील दादोजी गुरु नाहीत असे म्हणाले व दादोजी ह्यांच्या नावाचा प्रशिक्षक पुरस्कार देखील मागे घेतला.त्या समिती मध्ये पण पुरंदरे आले नाहीत.
(उत्तर:इतिहास हा पूर्णपणे उलगडला जातोच असे नाही.बाबासाहेब पुरंदरे ह्यांनी कोणत्या काळात चरित्र लिहिले व आता काय साल चालू आहे? इतक्या वर्षात नवीन उत्खनन झाले असेल तसेच नवीन कागद पत्रे हाती लागली असतील.असो.पण काही असो दादोजी हे पुण्याचे कारभारी होते ह्यात दुमत नसावे त्यामुळे सोन्यचा नांगर फिरवला त्यावेळी ते तिथे उपस्थित असणारच कि.मग सध्याच्या पुतळ्याला नावे द्या व वाद संपवा)

Saturday, December 11, 2010


अण्णा हजारे

आपल्याला हि व्यक्ती माहितीच असेल.वेगळी ओळख द्याची गरज नाही.तरीही देतो.हे सध्या महाराष्ट्रातील एकमेव समाज सुधारक आहेत(असे म्हणाले जाते).
त्यांचे खरे नाव किसान बाबुराव हजारे.
पूर्वी ते मुंबईत भायखळ्याला भाजी विकत.थोडीशी भाई गिरी पण करत.म्हणजे एकदा त्यांनी हफ्ता मागतो म्हणून एका पांडूला (हवालदार) ला फटकवला होता.मग जरा गायब झाले भायखळा मधून. मग ६२ ला चीनी आक्रमण झाले तेव्हा मोठ्या प्रमाणत सैन्य भरती चालू झाली. शारीरिक चाचणी निकष शिथिल झालेले म्हणून अण्णा लष्करात भरती झाले.६५ च्या युद्धात ते जायबंदी पण झाले.मग १८ वर्षाचे कमिशन पूर्ण करून ते राळेगण सिद्धी ला परत आले.
घरात मोठे पण लग्न नाही केल व काही काळातच घरातून बाहेर पडून ते गावातल्याच मंदिरात राहू लागले.आजही ते एकाच गावात असून कधीही घरी जात नाहीत.
नंतर त्यांनी राळेगण मध्ये सिंचन का काय बोलतात ते प्रकल्प केला।(आम्हाला कुठे शेतीतलं कळते.आम्ही शहरी बाबू) तिथे पाणी आलं.पिके उत्पादन वाढू लागली.मग अशीच प्रगती करत त्यांचे गाव "आदर्श"गाव झाले.(कुलाब्यचे आदर्श न्हवे)

दुसरी बाजू


अण्णा हजारे हे सुधा manage होणारे समाज सुधारक आहेत. लावासा बद्दल बोलताना ते पर्यावरणाचा विचार करतात तर दुसरी कडे जैतापूर प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवतात...ते स्वताच्या तत्वांना नेहमीच आदरांजली देत आले आहेत...

जि तत्परता युति शासनाच्या काळात सो called भ्रष्टाचार विरुद्ध जन आन्दोलन व उपोशन करुन दाखवलि ति नन्तर कुठे गेलि.तेव्ह जवळ जवळ प्रत्येक गावात त्यान्चे लोक साखळी उपोशनला बसले होते ते पन अगदि मोक्याच्या जागि जसे बस/रेल्वे स्थानक

माहिति अधिकार वर गले काढून त्यन्चि बाजु घेन्यात कहि अर्थ नाहि. हो माहितीच्या अधिकार बद्दल बोलाल तर त्या आंदोलनात अण्णा हजारे काही कालावधी नंतर दाखल झालेत कारण ह्या अधिकार बद्दल आधीच डाव्या विचार सारणीच्या लोकांचे आंदोलन चालू होते..त्या बद्दल तसे निवेदनेही सरकारला त्यावेळी देण्यात आले होते..अण्णांचा ह्या आंदोलनाला फक्त हात लागला असेही म्हणता येईल... जेव्हा सर्व भारतात हा कायदा लागु करावा असे विधेयक सन्सदेत आले तेव्हा बरेच दिवस चर्चा झालि. ह्या कायद्यातिल "प्रमुख अस्त्रे" अस्लेल्या तरतुदि वगळण्यात आल्या .हे तेव्हा काहि निवडक माध्यम सान्गत होति.अन्ना देखिल त्याबद्द्ल बोलले"जसा आहे तस विधेयक मन्जुर व्हायला हव होत पन ठीक आहे"

आता म्हने मि नव्या मुख्य मन्त्र्याना आदर्श व लव्हासा प्रकरनि वेळ देनार किति तर ३ महिने.म्हन्जे नवे चव्हान काय अन्गुथा बहाद्दर वाटले का ह्याना.ते तर पन्त प्रधान कार्यलय चे मन्त्रि होते.त्याना हे कळत नाहि असे कसे म्हणता येइल.

जिथ शिवसेनेचा पाठींबा तिथ हे विरोध कर्नार.म्हने जैतापुर मधे योग्य पुनर्व्सन होनर आहे.अरे बाबा तुला मच्छी मधल काय कळत?देणार का तु आमच्या मच्छी मार लोकाना दुसरा समुद्र?

त्यान्चा टॆनिस चेन्डु झालाय.जो दोन्हि कोन्ग्रेस व त्यांचे विविध गट सोयिनुसार टोलवत असते.
ते शिवसेना द्वेष्टे आहेतच फार त्रास दिला त्यांनी युती च्या सरकार च्या वेळेस. त्यांनी आरोप केले म्हणून युतीच्या ३ मंत्र्यांनी राजीनामे दिले.बाळासाहेबांनी त्यांचा वाकड्या तोंडाचा गांधी,आडव गेलेल मांजर असा समाचार घेतला. समाज सुधारक गांधीवादी हा बुरखा घालून त्यांचे जे धंदे चालतात ते बाळासाहेबांनी १३ वर्षापूर्वी ओळखून लोकांना इशारा दिला होता.तो धोका आता जाणवतोय.सरकारला पण असे विरोधक विधीमंडला बाहेर लागतात ज्यांची प्रतिमा स्वच असते(निदान लोकांना दाखवण्यापुरती) बाळासाहेब तेच सुचवत होते. आम्हाला फ़रक पड्त नाहि त्यांचा.

मला काही त्यांच्या बधल पडलेले प्रश्न व त्यांची उत्तरे(कंसात)

१) लव्हासा: पर्यावरणाची वाट लागली मग जैतापूर चे काय?
( फक्त पुणे व नगर मध्ये पर्यावरण असते असा नवीन शोध लागला मला)

२) मी आदर्श व लव्हासा प्रश्नी नव्या चव्हाण साहेबाना वेळ देणार.
(public memory is short.- तो पर्यंत लोक विसरतील.)

३) 2g स्पेक्ट्रम ,CWG तसेच कणकवलीचे संत नारायण राणे ह्यांच्या शाळेच्या नावावर लाटलेल्या व आता हॉटेल नीलम व जेल (मुंबई) असलेला भूखंड.महाबळेश्वर येथील भूखंड,विलासराव देशमुखांचा लातूर मधील भूखंड जो मूक बधीर शाळेसाठी होता आज तिथे व्यावसायिक गाळे व (देशमुखांची) विकास बँक आहे या सर्व घोटाळ्यावर काहीच का बोलत नाहीत.

४) तेव्हा गावा गावात स्वतःचे कार्यकर्ते बसवून "भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन" केल मग वर उल्लेख केलेले नेते काय हजारे परिवाराचे जावई लागतात का?

५)युतीच्या काळात ज्या 3 मंत्र्यांनी अण्णा ह्याच्या आरोपानुसार भ्रष्टाचार केला त्यांचे पेक्षा हे आदर्श 2g cwg लव्हासा व वरील भूखंड घोटाळे शेकडो पटीने गंभीर व मोठे आहेत.मग आता अण्णा ह्यांच्या आंदोलनाला ती धार का नाही?

भारतीय समाजाची एक मानसिकता आहे.आपण जेव्हा एखाद्याला १-२ वेळा आजमावतो तेव्हा त्यावर विश्वास ठेवतो. त्या-त्या व्यक्तीचे मग ती राजकारण सोडून कोणत्याही क्षेत्रातील असो त्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवला जातो.
त्याने म्हणलाय मग ते बरोबर असा एक विश्वास लोकांचा बसतो आणि हे लोक विश्वास कधी तोडून जातील हे आपल्याला काळात पण नाही.

राजकारणी, लोक प्रतिनिधी हे ५ वर्षांनी का असेना निवडणुका आहेत लोकांना सामोरे जायचे आहे हे ध्यानात ठेवून काही तरी काम करतातच.१० आश्वासन दिली असतील तर २-3 तरी पूर्ण करतीलच पण आण्णा सारख्या व्यक्तीला अस काही आहे का? आला मनात करयचे आंदोलन नाहीतर मागे घ्याचे.कोण जाब विचारणार.बर जर खरच त्यांना त्यांचा विचार वाढवायचा असता तर त्यांच्या बरोबरचे लोक हि वाढलेच असते आज अण्णा हजारे ह्यांचे शिवाय कोणाचे नाव त्यांच्या संस्थेतून/आंदोलनातून पुढे आले?म्हणजे आपल्याशिवाय कोणाला वाढू हि द्याचे नाही.

अण्णा ह्यांनी आज पर्यंत बरीच कामे चांगली.नेते नालयक आहेत भ्रष्ट आहेत पण जर कोणी समाज सेवक ह्या बुरख्या आड सत्ताधारी पक्षाची बाहुली बनणार असतील तर काय अर्थ आहे?
लोकांनी त्यांच्या बधल नीट डोळे उघड ठेवून मत बनवावं व माझ्या दृष्टीने विचार एकदा तरी करून पहा व मग आपले मत बनवा.


Saturday, August 28, 2010

दादोजी कोंडदेव पुतळ्याचे राजकारण

अनेकांच्या तप्त ठिणग्यांतून शिवरायांच्या इतिहासाची ज्वाला भडकली. त्यातील एक ठिणगी दादोजी कोंडदेवनामक पात्राचीदेखील आहे.


इतिहास म्हणजे बाजारचा भाजीपाला नव्हे!
दादोजी कोंडदेव
एक गाव आणि बारा भानगडी तसे सध्या आपल्या इतिहासाचे झाले आहे. ज्यास आम्ही किंवा आपण सारे प्रेरणादायी पुरुष म्हणून पुजतो किंवा एखाद्या प्रसंगापुढे नतमस्तक होतो तो पुरुष किंवा प्रसंग घडलाच नाही, इतिहासाच्या पानावरून अशा पुरुषांना आणि प्रसंगांना हटवा, अशा मागण्यांची उबळ महाराष्ट्रात अधूनमधून उठत असते. जातनिहाय जनगणना सुरू होण्यास वेळ आहे. मात्र इतिहास व समाजपुरुषांचे जातनिहाय वाटप महाराष्ट्रातील राजकीय पुढार्‍यांनी करून टाकले आहे व त्यानुसार युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांवर ‘जात’ म्हणून मराठा समाजाच्या काही संघटनांनी शिक्का मारला आहे. अशा शिक्काबाजांना दादोजी कोंडदेवांच्या बाबतीत जो वात आला आहे व इतिहासाच्या पानांवरून दादोजींना हटविण्याची जी मागणी त्यांनी केली आहे तो निव्वळ मूर्खपणाच म्हणायला हवा. या चवचाल इतिहास संशोधकांचे म्हणणे आहे की, इतिहासात, खासकरून शिवरायांच्या जीवनकार्यात दादोजी कोंडदेव हे पात्रच अस्तित्वात नव्हते. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंसारख्या मंडळींनी म्हणे मारून मुटकून दादोजींचे पात्र निर्माण करून त्यांना शिवरायांचे गुरू बनविले आहे. त्यामुळे इतिहासाच्या पानांवर कोंडदेवांचे नावही असता कामा नये. पुण्यातील लाल महालात दादोजी कोंडदेवांचा जो पुतळा आहे तो तेथून ताबडतोब हलवावा, नाहीतर मोठे आंदोलन करू, अशा धमक्या काही संघटनांनी दिल्या. पुण्याच्या महापालिकेत त्यावर गोंधळ झाला. परिणामी पुण्याच्या महापालिकेतही दादोजी कोंडदेवांचा पुतळा हटविण्याचे आश्‍वासन देण्यात आले. पुण्यातील प्रतापाचे पडसाद महाराष्ट्राच्या मंत्रालयातही उमटले व शंकरराव चव्हाणांचे मुख्यमंत्री पुत्र अशोकराव चव्हाण यांनी या प्रश्‍नी कोणतीही ठोस भूमिका न घेता ‘हा प्रश्‍न पालिकेच्या अखत्यारीत येतो. दादोजींचा पुतळा हलवायचा की ठेवायचा याबाबतचा निर्णय त्यांनीच घ्यावा’ अशी मखलाशी करून स्वत:ची कातडी वाचवली आहे. कोंडदेवांचा पुतळा पालिकेच्या अखत्यारीत येतो हे मान्य. मग पुणे महापालिका व परिसर हे निजामाचे स्टेट असून त्यावर मुख्यमंत्र्यांचा अधिकार चालत नाही असे चव्हाणांना म्हणायचे आहे काय? शिवाजी महाराजांचा
इतिहास हा पोरखेळ नाही
व राजकारण्यांची टोलवाटोलवी नाही. शिवरायांच्या इतिहासातील सर्वच पात्रे ही जेथच्या तेथेच असायला हवीत. त्यांना हलविण्याचा अधिकार कुणालाही नाही. काही पात्रे व त्यांच्या विषयीच्या कथा दंतकथा कुणा टोळक्यास मान्य नसतील तर तो त्यांचा प्रश्‍न. गागा भट्ट, दादोजी कोंडदेव हे जन्माने ब्राह्मण म्हणून शिवरायांच्या इतिहासात त्यांना स्थान नाही असे सांगणारे हे टिकोजीराव कोण? इतिहास हा भाकडकथांनी बनत नाही, तर शौर्याने व चांगल्या आचरणाने बनत असतो. दादोजी कोंडदेव हे इतिहासातील असेच एक शक्तिस्थान आहे व ते राहणार. ज्याने शिवरायांचे जबरदस्त असे वर्णन केले तो उत्तर प्रदेशचा कवी कुलभूषणही ब्राह्मणच होता व त्याने शिवरायांबद्दल जे लिहिले ते पुढे कुणालाही जमले नाही.
काशी की कला जाती
मथुरा की मस्जीद होती
अगर शिवाजी न होता
तो सुन्नत सबकी होती
कवी भूषण यांनी शिवरायांच्या शौर्यावर हे कवन लिहिले, पण भूषण हा ब्राह्मण होता म्हणून त्याच्या लिहिण्यावर, बोलण्यावर विश्‍वास कसा ठेवायचा? असे जातपंचायतीच्या नव्या इतिहास संशोधकांना वाटते काय? शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवचरित्र लोकप्रिय केले, घराघरांत नेले, सातासमुद्रापलीकडे नेले. त्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. शिवशाहिरांनी ‘शिवचरित्र’ लिहिण्याआधीपासूनच दादोजी कोंडदेवांचे अस्तित्व शिवरायांच्या इतिहासात आहे. जन्माने ब्राह्मण असलेल्या लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली व त्यावेळच्या मेळ्यांतून होणार्‍या व्याख्यानांतही दादोजी कोंडदेवांच्या कथा सांगितल्या जात होत्या. बाबासाहेब पुरंदर्‍यांचा जन्म त्यानंतरचा आहे. छत्रपती शिवरायांनी त्यांच्या हयातीत कधी जातीचे राजकारण केले नाही. शिवरायांच्या स्वराज्यात सर्वच होते, पठाणही होते. सर्वांना सोबत घेऊनच त्यांनी राज्यकारभार केला. म्हणूनच शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण देशाचे महापुरुष ठरतात. शिवसेनेनेदेखील जात-पात, धर्म-पंथ असा भेद कधी केला नाही. ‘मराठा-मराठेतर, ब्राह्मण-ब्राह्मणेतर, घाटी-कोकणी, शहाण्णव कुळी-ब्याण्णव कुळी हे वाद गाडून मराठी माणसाची भक्कम एकजूट उभारा’
हाच शिवसेनेचा विचार
सुरुवातीपासून राहिला आहे. आजही तोच विचार शिवसेना जपत आहे. किंबहुना सर्वांनीच तो जपायला हवा. मात्र दुर्दैवाने तसे घडताना दिसत नाही. सध्याचे राज्यकर्ते शिवरायांचे नाव उठताबसता घेतात, पण कारभार नेमका त्या विपरीत करीत आहेत. शिवरायांना जातीच्या चौकटीत बंदिस्त करणार्‍यांचे कान उपटण्याऐवजी गोलमाल भूमिका घेत आहेत. ब्राह्मणांचा द्वेष म्हणजे ‘शिवचरित्र’ नाही हे मुख्यमंत्र्यांनी बजावून सांगायला हवे होते. पण मुख्यमंत्रीच लपाछपीचा खेळ करीत आहेत. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढ्यात ज्यांनी तलवार गाजवली, शस्त्रे चालविली, बॉम्ब बनवले, क्रांतीच्या ज्वालेत स्वत:च्या आयुष्याचा होम केला ते बहुसंख्य ब्राह्मण किंवा दलित समाजातले वीर होते. 1857 च्या बंडाचा सेनानी तात्या टोपे, वीर नानासाहेब पेशवे, क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, बॉम्बचे तंत्र हिंदुस्थानात आणणारे सेनापती बापट, देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत फासावर गेलेले एकाच घरातले तीन सख्खे चापेकर बंधू हेसुद्धा जातीने ब्राह्मण व कर्माने क्षत्रिय होते. हे सर्व क्रांतिकारक जातीने ब्राह्मण होते म्हणून इतिहासाच्या पानांवरून त्यांची नावे पुसायची व त्यांचे पुतळे कोणाला पाडायचे आहेत काय? झाशीची राणी ब्राह्मण म्हणून तिचे शौयर्र् काही लोकांना मान्य नाही. समर्थ रामदास यांना शिवरायांचे गुरू मानायला काही टोळभैरव तयार नाहीत. इतिहास म्हणजे बाजारचा भाजीपाला नसून जिद्द, रक्त व शौर्य यांच्या ठिणगीतून व बलिदानातून निर्माण झालेली ती जबरदस्त ज्वाला आहे. ती ज्वाला विझवता येणार नाही. अनेकांच्या तप्त ठिणग्यांतून शिवरायांच्या इतिहासाची ज्वाला भडकली. त्यातील एक ठिणगी दादोजी कोंडदेवनामक पात्राचीदेखील आहे. चंद्राला देव मानणार्‍यांना शेवटी तेथे दगडधोंडेच आढळले. म्हणून चंद्राची पूजा करायची कोणी थांबवले काय? ती सुरूच आहे. इतिहासातील अनेक पात्रांचे तसेच आहे. ज्यांना इतिहासाची इतकीच काळजी आहे त्यांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी वाढणारे अफझलखानाचे थडगे व त्याचे उदात्तीकरण रोखावे. औरंगजेबाच्या थडग्यासमोर पढला जाणारा नमाज व हिरवा उत्सव थांबवावा. मराठ्यांच्या इतिहासाशी का खेळता?

Sunday, May 9, 2010

६० कोटीला मुंबई विकत घेतली आपण!

६० कोटीला मुंबई विकत घेतली आपण!

मुंबई नगरी ही पहिल्यापासूनच बहुभाषी असली आणि तिच्या उभारणीत नि जडणघडणीत मराठ्यांसह सर्व प्रांतीयांचा वाटा असला, तरी तिचे अव्वल भौगोलिक स्थान आणि
प्राचीनत्व हे निखळ मराठी आणि मराठीच आहे. महाराष्ट्राला गुजरातशी सयामी जुळ्यासारखे जोडून द्वैभाषिक राज्य चालवण्याचा केंदाचा हेका महाराष्ट्रीयांनी मोडून काढला. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण केला. आणि गेली पन्नास वर्षे 'मुंबई कोणाची' हा प्रश्न सतत ऐरणीवर येत राहिला.

मुंबई फक्त मराठ्यांचीच नव्हे तर सगळ्यांची, इथपासून ते 'मुंबई तुमची, भांडी घासा आमची' म्हणण्यापर्यंत कटुता ताणली जात असते. मुंबई हे दक्षिण आशियाचे इकॉनॉमिक हब होण्यापर्यंतची घोडदौड ही परप्रांतीयांच्या भांडवलामुळे झाली असे उदाहरणांसकट मांडले जाते. पैसा, भांडवल हे शब्द नुसते ऐकले तरी मराठी माणसाला विनाकारण हुडहुडी भरते. किंबहुना पैसा आणि मराठी हे दोन विरुद्धाथीर् शब्द असल्यागत आपली वाटचाल चालू असते. त्यामुळे भांडवलवाल्या अमराठी माणसांसमोर मराठी माणसे कायम न्यूनगंड घेऊन वावरत असतात. रस्त्यावरच्या राड्यांमागेही हाच न्यूनगंड असतो.

पण याच महाराष्ट्राने मुंबईसह स्वतंत्र राज्य म्हणून जन्माला येण्यापोटी गुजरातला चक्क कोट्यवधी रुपये मोजले आहेत, हे फारच कमीजणांच्या गावी असेल. महाराष्ट्र आणि गुजरात अशी दोन स्वतंत्र राज्ये अस्तित्वात येणार ही काळ्या दगडावरची रेघ ठरल्यानंतर राज्यघटनेच्या ७व्या व ८व्या परिशिष्टात आवश्यक सुधारणा करण्यात आल्या. कलम ४२(२), ४८(१) आणि ५१(५)अनुसार गुजरात राज्याची राजधानी विकसित करण्यासाठी अस्तित्वात असलेल्या राज्याच्या कॅश बॅलन्स इन्व्हेस्टमेंट अकाऊंटमधून १० कोटी रुपये इतकी रक्कम देण्यात यावी असे प्रस्तावित करण्यात आले. त्यानंतर गुजरात राज्याची वाषिर्क तूट भरून काढण्यासाठी १९६० साली ६.०२ कोटी रुपयांपासून सुरुवात करून १९६९-७०पर्यंत १.१४ कोटी अशा क्रमाने रकमा द्याव्या, असे ठरले. याखेरीज १९६२-६३पासून १९६९-७०पर्यंत ८ आथिर्क वर्षांत गुजरातला २८.३९ कोटी रुपये लाभ व्हावा असाही निर्णय झाला.

बॉम्बे रिऑर्गनायझेशन अॅक्ट १९६०च्या कलम ५२खाली महाराष्ट्राने गुजरातला १९६२-६३ साली ६१२ लाख, ६३-६४ साली ५८५ लाख, ६४-६५ साली ५०१ लाख, ६५-६६ साली ५२६ लाख, ६६-६७ साली ४३३ लाख, ६७-६८ साली ३४० लाख, १९६८-६९ साली २०९ लाख असे ३२ कोटी ६६ लाख रुपये दिले. यात नव्या तरतुदीनुसार दिलेले ३८ कोटी धरून एकूण ६० कोटी ६६ लाख रुपये महाराष्ट्राने गुजरातला दिल्याची नोंद 'द गॅझेट ऑफ इंडिया एक्स्ट्रा ऑडिर्नरी'मध्ये आहे.

याचा अर्थ, मुंबईवरील ताबा राखण्यासाठी महाराष्ट्राला ६० कोटींची किंमत चुकवावी लागली आहे. होय, एका परीने मुंबई आपण विकत घेतलीय. भारतीय स्वातंत्र्याच्या वेळी झालेल्या फाळणीत पाकिस्तानला ५५ कोटी रुपये द्यावे लागले, त्यावरून आजही एक वर्ग सतत विखारलेला असतो. इथे तर स्वतंत्र भारतातीलच एका राज्याने दुसऱ्याला ही किंमत मोजली आहे. या मुंबईत कामगार, चाकरमानी, कारकून, कष्टकरी आणि निर्धन बुद्धिवादी इतकीच ओळख असलेल्या मराठी माणसाला कोणताच न्यूनगंड बाळगण्याची गरज नाही. मुंबईसह महाराष्ट्र अस्तित्वात आणण्यासाठी १०६ हुतात्म्यांचे रक्त तर आपण सांडले आहेच, पण ६० कोटी ६६ लाख रुपयेही मोजले आहेत!

Monday, April 19, 2010

सम्राट अकबर थोर नव्हताच......!!!

सम्राट अकबर थोर नव्हताच......!!!

अकबराने "दिन-ए-इलाही" नावाचा धर्म स्थापन केला।धादांत खोटे, कारण हा "धर्मही" इस्लामचेच एक लघूरूप असल्याचे आपल्या लक्षात यायला कदाचित काहिसा वेळ लागेल. "दीन" म्हणजे धम्र आणि "इलाही" म्हणजे "अल्लाचा". असे असताना अकबराने हिंदू-मुस्लिम धर्मातील चांगली तत्वे एकत्र करून एक नवा धर्म स्थापन केला, हे विधान शंकास्पदच आहे. धम्र स्थापन करणे म्हणजे काहि गणेशोत्सव मंडळ स्थापन करण्यासारखे सोपे नव्हे.कारण धर्म म्हटला की, त्याला त्याचे धर्मग्रंथ असतात, तर "दीन-ए-इलाही" चे असे कोणते धर्मग्रंथ आहेत याची माहीती इतिहास देतो?त्याचबरोबर प्रत्येक धर्मात मोक्षप्राप्ती,ईश्वर प्राप्ती यांच्यासारख्या काही व्याख्या असतात तसे "दीन-ए-इलाही" बाबत काय आहे?जर हा धर्म अकबराने स्थापन केला असे म्हटले तर "अकबर स्वतःला पैगंबरापेक्षाही श्रेष्ठ समजत होता" असा निष्कर्ष आपण काढावा काय? तेही खरेच आहे, कारण "सम्राट" म्हणवून घेणार्‍या अकबरला ग ची बाधा होणे स्वाभाविक आहे आणि याच ईर्षेपोटी त्याने असा धर्म स्थापन करण्याचा घाट घलण्याचा उपद्व्याप केला असणार हे निश्चित. पण तोही इस्लामचाच एक भाग होता हे विसरून चालणार नाही.शिवाय त्याने असा धर्म स्थापन केलाच असे थोडा वेळ मान्य केले तर त्याच्या प्रार्थनास्थळाबद्दल किंवा मंदीराबाबत कोणती माहीती मिळते? असे काहीच "दीन-ए-इलाही" बाबत आढळत नाही.शिवाय आपला धर्म वेगळा आहे असे म्हणणारी व्यक्ती म्हणजे धर्मसंस्थापक नसून धर्मविच्छेदक असते, हे आपण ध्यानात घ्यायला हवे. आजीबाईंचे सोवळे वा देवघराचे पावित्र्य भंग करीत देवघरात खुशाल जोडे घालून वावरणार्‍या तरूण जसा "मी तुमचा धर्म मानीत नाही", असे खुशाल वर्तन करतो तसेच अकबराने केले.संदर्भासाठी वाचावे व्हिंसेंट स्मिथ लिखित Akabar the Great Mughal.
पोर्तुगीज पाद्र्यांचा जो गट अकबराच्या दरबारी काही वर्षे वास्तव्य करून होता, त्यातील मॉंसेरॉट नावाचा पाद्री म्हणतो,"आम्हाला पाचारण करण्यात अकबरास काही अध्यात्मिक उत्कंठा असावी ही आमची अपेक्षा फ़ोल ठरली,उलट आध्यात्मिक उत्कंठा नष्ट करण्याचाच हा त्याचा नवा उपद्व्याप होता आम्हाला दिसून आले।"जर अकबराने सर्वधर्मसहिष्णूता मानली असे म्हटले तर स्मिथने त्याच्या पृष्ठ १२५ वर लिहिले आहे" इसाई पाद्र्यांनी अकबरास जी बायबलची प्रत भेट म्हणून दिली होती, ती त्याने परत केली."स्मिथ लिहितो (पृष्ठ १६०) "अकबराचा तथाकथित "दीन-ए-इलाहि" धर्म म्हणजे एक राजकारणी सोंग होते.कमालीचा अहंभाव व बेलगामी वागणे हेच त्याचे के नाव होते."अकबर हा मोंगल सुलतान होता. मोंगल साम्राज्याचा जो जो दास होणार नाही त्याचा समूळ नाश करण्याचा त्याने घाट घातला होता, मग तो मुस्लिम सुद्धा का असेना. आत सारे मुसलमान काही मोंगल नव्हते.उलट अफ़गाण आणि तुर्क सुलतानांच्या शाह्याच विनाशून अकबराने मोंगलशाही चालविली. त्यामुळे इतर सुलतान त्याचा द्वेश करीत.म्हणजे हिंदू धर्माच्या विरुद्धच नव्हे तर स्वतःच्या मोंगल बाद्शाहीकरिता इतर कोणत्याही वैयक्तिक महत्वाकांक्षेप्रमाणे लढत होता, राज्य वाढवित होता. अर्थात तो मुस्लिमांनाही समानतेने वागवित नव्हत तर त्यांची राज्येही तुडवित होता,बुडवित होता. केवळ स्वतःची बादशाही टिकावी या एकाच हेतूने त्याने हिंदूंवर "जिझिया" सारखे जाचक कर लादले नाहीत किंवा सशस्त्र लाखो हिंदूंना सरसकट मुसलमान करण्याची मोहीमही आखली नाही.हिंदू-मुस्लिमांना समानतेने वागवावे हा त्याचा उद्देश मुळीच नव्हता.पण, हिंदूंवर असे प्रत्यक्ष धार्मिक अत्याचार जेव्हा जेव्हा आधीच्या मुस्लिम सुलतानांनी केले तेव्हा तेव्हा त्याचे झालेले भयंकर परीणाम त्याच्या डोळ्यासमोर होते.तशा प्रपीडक नि धर्मांध सुलतानशाह्याच केव्हा केव्हा हिंदूंच्या असंतोषाच्या आगीत भस्मसात झाल्या होत्या.(उदा- मुबारक खानाचा खून करून पूर्वाश्रमीचा हिंदू असलेला खुश्रुखानाने सत्त हस्तगत करून हिंदू सत स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता.) त्यामुळेच स्वतःची बादशाही टिकावी या एकाच हेतूने अकबराने जिझिया सारखे कर न लादता औरंगजेबापेक्षा कित्येक पटीने सौम्यपणे व्यवहार केला. याचा अर्थ हिंदूंना आदर देणे हा त्याचा उद्देश मुळीच नव्हता किंवा एकात्मतेच्या वा समतेच्या भावनेने मुळीच नव्हे.

पण सत्तास्थापनेत स्वतः सर्वसत्ताधीश, सम्राट, अगदी अरेरावी झाल्यानंतर अकबराची दुर्दम्य महत्वाकांक्षा त्याच्या पलिकडे धाव घेऊ लागली होती।लोकांचा सम्राट झालो, याचा अर्थ यांचा पारलौकीक मीच आहे, जगाचा पैगंबरही मीच झालो आहे, अशा थाटात त्याने "दीन-ए-इलाही" चा घाट घातला. जे त्याला आधीच्या सुलतानांप्रमाणे हिंदूंना छळाच्या बळावर धर्मांतरीत करणे जमले नाही,ती राक्षसी महत्वाकांक्षा त्याने या अशा प्रकारे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला होता, तलवारीच्या बळावर नव्हे तर "दीन-ए-इलाही" द्वारे हिंदू धर्माला एक प्रकारे ग्रहण लावण्याचाच त्याचा प्रयत्न होता. कारण इतिहासातील सर्व लढाया या फ़क्त तलवारीच्याच बळावर लढल्या गेल्या नाहीत.त्यामागे कूटनितिचाही समावेशही होता.कारण, या धर्माचा मुख्य पैगंबर हा "अकबर" हाच मानावा लागे. नुसते "जयगोपाळ" सोडाच,पण नमस्कार म्हणूनही भागत नसे, तर त्या अकबरी धर्मात गेलेल्या हिंदूंना प्रथम वंदनेतच "अल्ला हो अकबर"च म्हणावे लागे. त्या धर्माची भाषाही पर्शियन होती जिचा मागमूसही हिंदुस्तानच्या संस्कृतीत दिसत नाही. जेणेकरून अकबराची सत्ता हे एकप्रकारे परचक्रच होते.एकंदरीत इतके सांगणे पुरेसे आहे की,अकबराची, मनुष्यजातीचा पारलौकीक सम्राट बनण्याची ही सवाई शेख महंमदी महत्वाकांक्षाही पार धुळीला मिळाली.कारन, त्याच्या या नव्या धर्मात आधी कोणी फ़ारसे हिंदू-मुसलमान गेलेच नाहीत.दुसरे प्रमाण म्हणजे आपण हिंदू,पारशी,ख्रिश्चन यासारख्या धर्मियांची नावे अर्हात त्या त्या धर्माच्या अनुयायांची नावे सांगू शकतो, तसे "दीन-ए-इलाही" च्या किती अनुयायांची नावे इतिहास देतो?कारण जरी या धर्माचे अनुयायी खोदून खोदून बळजबरीने शोधलेच तरी त्यांनी अकबराने स्थापन केलेल्या धर्मात जबरदस्तीने धर्मांतरीत केले गेले होते. कारण अकबराच्या मृत्यूनंतर त्याच्या धर्माचे हेच अनुयायी काळाबरोबरच कुठच्या कुठे इतिहासात बेपत्ता झाले हे त्या पैगंबरालाच माहीत.---संदर्भ (सावरकर लिखित "भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने--- पृष्ठ ३५६-३५७)

ऑरकुट वरील "आजचा दिनविशेष" कमुनिटी चे मालक ह्यांच्या लेखावारून साभार.

Saturday, April 17, 2010

दि. १३ एप्रिल २०१० हा सोनेरी दिवस आम्ही आजन्म विसरू शकत नाही. कारण या दिवशी एका आगळ्या वेगळ्या सेनेचा उदय झाला. ४४ वर्षापूर्वी हिंदुहृदय सम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांनी विचारांचे जे सागर मंथन केले. त्या मंथनातील वादळी विचारांचे थेंब हे महाराष्ट्रातच नाही तर उभ्या हिंदुस्तानातील जनमानसात शिंपडले गेले. आणि ह्या शिंपडलेल्या एकेका थेंबातूनच शिवसेनेच्या वादळी विचारांचा एक महासागर तयार झाला. याच विचार धारेच्या प्रवाहाने प्रेरित होऊन असंख्य तरुणाच्या गळ्यातले आजही ताईत असणारे व्यक्तिमत्व म्हणजे बाळासाहेब ठाकरे. त्यांच्या याच विचार धारेचे शिवधनुष्य पेलून त्यांच्या विचारांची महती त्रिखंडात इंटरनेट च्या माध्यमातून गाजवण्यासाठी ज्या सेनेचा १३ एप्रिल २०१० या दिवशी जन्म झाला ती सेना म्हणजे शिव माहिती व तंत्रज्ञान सेना.

दि. १३ एप्रिलला हा सोहळा ठरल्या प्रमाणे सेनाभवनामधील तिसर्या मजल्यावरील एका प्रशस्त हॉल मध्ये पार पडला. या मेळाव्याला पुणे, नागपूर व नाशिकसह विविध भागातील शेकडो शिवसैनिक उपस्थित होते. मेळाव्याला येणाऱ्या प्रत्येक शिवसैनिकांचे हॉलच्या प्रवेश द्वारा जवळच संपर्कासाठी माहिती नोंद केली जात होती. बरोबर ५.३० pm च्या ठोक्याला कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि व्यासपीठावरची संचालनाची सर्व सूत्र श्री विशेष राणे यांनी आपल्या हातात घेतली. त्यानंतर लगेचच “शिवसेना सचिव मा. विनायकजी राऊत साहेबांचे आगमन झाले आहे” असे श्री अमोल नाईक यांनी घोषणा करताच टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत झाले. मा विनायकजी राऊत साहेबांच्या हातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला गेला. आणि सर्वांच्या शिव गर्जनेने हॉल दणाणून गेला. आता पर्यंत श्री. राहुल खेडेकर, मा विनायकजी राऊत साहेब , मा मानकर साहेब या सर्व मान्यवरा व्यतिरिक्त श्री अमित चिविलकर, श्री अनुज म्हात्रे, श्री अमोल नाईक, नागपूरहून खास आलेले श्री सतीश पानपते तसेच महिला भगिनी मेघा गावडे, अक्षय महाडिक पुण्याचे श्री रोनक शहा हि मंडळी व्यासपीठावर उपस्थित होती. ऑर्कुट समुदायाचे नियंत्रक श्री अमित चिविलकर यांनी सुंदर आशय पूर्ण प्रस्तावना सादर केली त्यात त्यांनी इंटरनेट वरील ऑर्कुट समुदायाच्या जन्मापासून ते आज पर्यंतच्या कार्याचा सर्व लेखाजोखाच सर्वांसमोर मांडला. त्यानंतर श्री अमोल, श्री सतीश पानपते, अक्षया महाडिक, मेघा गावडे या सदस्यांनी हि आपली परखड मते सर्वांसमोर मांडली. त्यानंतर आम्हा सर्व ऑर्कुट समुदायातील कार्यकर्त्यांचे लाडके तसेच सर्व कार्यकर्त्यांना वेळोवेळी वडिलकीच्या नात्याने मार्गदर्शन करणारे, प्रसंगी आमच्या पाठीशी खंबीर पणे उभे असणारे मा. श्री जनार्दन मानकर साहेब यांनी आपल्या ओजस्वी भाषणाने सर्वांना मार्गदर्शन केले. त्यानंतर शिवसेना सचिव मा. विनायकजी राऊत साहेब यांनी त्यांच्या वक्तशीर अशा भाषणात खूप महत्वाचे मुद्दे या सभेत मांडले “एक अदृश्य शक्ती आज दृश्य स्वरुपात शिवसेना भवनात अवतरली आहे. एकमेकांचे चेहरेहि न पाहता, शिवसेना प्रमुखांना प्रत्यक्ष न भेटता तुम्ही शिवसेनेचं काम एका निष्ठेने करत आहात, या दृष्टीने तुम्हीच खरे शिवसेना प्रमुखांचे खरे दूत आहात.” अशा शब्दात राऊत यांनी समस्त ऑर्कुट समुदायाशी निगडीत असलेल्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले. तसेच “रंग विकत घेता येतात पण त्या रंगातील लोकांची निष्ठा विकत नाही घेता येत!!” असा टोलाही त्यांनी हाणला. या अभूत पूर्व अशा सोहळ्याला भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष मा. अभिजित पानसे तसेच मुंबई महापलिका स्थायी समिती अध्यक्ष मा. राहुल शेवाळे यांची उपस्तिथी लाभली. मा. अभिजित पानसे तसेच मा. राहुले शेवाळे यांनी आपले मार्गदर्शनपर मते सर्वांसमोर मांडली. माणसाला जर ध्यास, आत्मविश्वास असेल तर त्याला वय, स्थल, काल या कुठल्याच गोष्टी बंधन कारक नसतात. याचे मूर्तिमंत उदाहरण असलेले तसेच परदेशात राहून इंटरनेटच्या माध्यमातून शिवसेनेचा प्रचार आणि प्रसार करणारे मा. सुनील मंत्रीची उपस्तिथी या कार्यक्रमाला लाभली. तसेच शिवसेने बद्दल त्यांना एवढ्या अपेक्षा तसेच प्रेम का आहे या विषयी त्यांनी मोजक्याच शब्दात मनोगत व्यक्त केले. सर्व उपस्थित मान्यवरांचे मार्गदर्शन झाल्यावर श्री अमोल नाईक यांनी या मेळाव्याला उपस्थित असणार्या सर्व मान्यवरांचे नम्रपणे आभार प्रदर्शन केले तसेच या मेळाव्याला प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष रित्या सहकार्य केलेल्या सर्व सहकारी, स्वयंसेवकांचे आभार मानायला श्री अमोल नाईक विसरले नाही. आभार प्रदर्शन प्रकट केल्यावर राष्ट्रगीताने या अभूत पूर्व अशा सोहळ्याची सांगता झाली.

या दिवशी मा. शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे तसेच तसेच आदित्य ठाकरे यांची उपस्तिथी लाभणार होती. पण काही अपरिहार्य कारणांमुळे ते या कार्यक्रमाला येऊ शकले नाही. त्यांच्या वतीने या मेळाव्याला महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून उपस्थित असलेल्या समस्त शिवसैनिकांची इथे आम्ही नम्रपणे क्षमा मागतो.

थोडिशी हितगुज

४४ वर्षा पूर्वी इंटरनेट या माध्यमाचा कुठेहि मागमूस नव्हता. पण तरीही तेंव्हाच्या मोगल काँग्रेसी दडपशाही विरुद्ध आवाज जर कोणी उठवला असेल तर तो म्हणजे हिंदुहृदय सम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांनीच. हजारोंच्या वरती त्यांनी सभा घेतल्या, उभा महाराष्ट्र त्यांनी पिजून काढला. लोकांच्या उरात मराठी बाण्याच्या, स्वाभिमानाच्या मशाली पेटवल्या आणि बघता बघता याच मशालींचा धगधगता भगवा वणवा तयार झाला आणि हाच वणवा आजतागायत जिवंत जळत आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो!!! जर इंटरनेट सारखे प्रभावी माध्यम उपलब्ध नसूनही जर मा. बाळासाहेब एवढा भव्य वणवा पेटवू शकतात तर आज हे इंटरनेट चे प्रभावी ब्रम्हास्त्र आपल्याकडे आहे, त्याचा सदुपयोग जर आपण केला तर ते आपल्यासाठी वरदान ठरू शकत पण त्याचा गैर उपयोग जर केला गेला तर तेच मध्यम आपला संहार करू शकत हे लक्षात असुद्या.

आई भवानी ची आन घेउनी गोंधळ घालूया
कास धरुनी माय मराठी हिंदू धर्म वाढवूया
आड आला परी कोणीही तरी तिथेच ठेचुया
शपथ आम्हाला शिवरायांची हि साद घालूया !!

आपला नम्र,

शिवसैनिक कौस्तुभ गुरव

Thursday, March 25, 2010

लक्षात असू दया

"नसेल भगवा शिरावर तर उपरा बसेल छाताडावर"
हे कायम लक्षात ठेवा
महाराष्ट्र अंधारात बुडत आहे
दारूचे कारखाने वाढत आहेत
"विदर्भ" महाराष्ट्र पासून तोडण्याचा प्रयत्न आपला "कमळ छाप" मित्र करत आहे
"घड्याळ" महागाई मूळे बंद पडत आहे
"हाताचा पंजा" मतांसाठी पूर्ण हिरवा झाला आहे
मराठी-मराठी मध्ये फुट पडून चट्टेरी पट्टेरी लेंगा माफ करा झेंडा इटली च्या आशीर्वादानी मुंबई भर फडकत आहे
आता तरी पेटून उठ मराठी माणसा "शिवसेनेचा वाघ" सहयाद्री होऊन तुझ्या रक्षणासाठी उभा आहे.........

कांग्रेस का हात महेंगाई के साथ ,
राष्ट्रवादी की घडी आमिरों के साथ ,
बीजेपी का कमल संघ के साथ ,
मनसे का इंजिन सरकार के साथ ,
मगर शिवसेना का धनुष्यबाण गोर गरीबों के साथ ,पुरे हिंदुस्तान के साथ ....