Tuesday, December 17, 2013

अखेर लोकपाल मंजूर-माझेही मत

संसदेसमोर असलेले लोकपाल विधेयक अण्णांनी मान्य  केले ह्यावरून आम आदमी पक्ष बरीच टीका करत आहे त्यावर काही लिहावास वाटल ते लिहितोय.

आम आदमी पक्षाचे कुमार विश्वास जेव्हा राळेगणला गेले व हे लोकपाल विधेयक जन लोकपाल नाही तर सरकारी लोकपाल आहे, तुलनेत तेवढे प्रभावी नाही अस बोलू लागले. त्यावरून वाद झाला. अण्णांचे काही कार्यकर्ते विश्वास ह्यांच्यावर धावून गेले.
मला वाटत ह्यावेळच्या उपोषणाचा हा टर्निंग point होता. ह्या घटनेपर्यंत देश,राजकारणी  व मिडिया  अण्णा हजारेंचे अजून एक उपोषण इतकच त्याकडे पाहत होता. व गेल्यावेळी प्रमाणे सरकार आश्वासनावर बोळवण करेल व हे उपोषण संपेल असच सर्वांच मत होत.(जरी कुणी उघड बोलून दाखवत नसले तरी ).  पण अण्णा व सहकारी ठाम होते.     

ह्या सीन मुळे आप व अण्णा ह्यांच्यातील मतभेद किती टोकाचे आहेत हे स्पष्ट झाले. आधी ते उघड झालेच होते. ह्याच दिवशी अण्णांचे सहकारी विश्वंभर चौधरी ह्यांनी काहीना वाटत हा मुद्दा असाच पडून राहावा व पुढल्या निवडणुकीत त्याचा वापर करता येईल पण आम्हाला ते नको असून जितक्या मागण्या  मान्य होऊन मंजुरीसाठी पटलावर आल्यात तेवढे तर तेवढे लोकपाल पाहिजे अशी भूमिका घेतली. तिथून हालचालींना वेग आला.

ह्यापूर्वी आंदोलनात अण्णा व सरकार ह्यांच्यात दिल्लीचे ठग होते.अण्णांच्या वतीने हे दिल्लीचे ठगच चर्चा करीत. आजच ऐकल कि रामलीला मैदनावर अण्णांची वैयक्तिक भेट केवळ आयबीएन लोकमतच्या वागळे ह्यांनीच घेतली. आणि त्यावेळी केजरीवाल वागलेंवर चिडले होते. म्हणजे आंदोलन आपल्या तंत्राने चालावे,इतरांना अण्णा भेटू नये अशी पुरेपूर काळजी केजरीवाल आणि टीमने घेतली होती. शेवटी जेव्हा पोपटराव पवार,विलासराव देशमुख वैगेरे पुढे आले  आणि ते आंदोलन मागे घेण्यात आले.

हे आंदोलन चिघळावे व पुढे त्याचा आपल्याला फायदा मिळावा अशीच केजरीवाल टीमची अपेक्षा असावी.एकीकडे राजकरणी चोर म्हण्याचे,संसदेवर टीका करायची आणि जराही तडजोडीची भूमिका घ्याची नाही ह्यामागे वातावरण पेटते ठेऊन आपला स्वार्थ साधण्याची त्यांची मानसिकता दिसून येते.

अण्णांनी ह्यापूर्वी वेगवेगळ्या मागण्यांसाठी १३ उपोषण केली व लोकपाल साठी ३. १ रुपयाची मागणी केली तर चाराणे मिळतात हा फंडा काय त्यांना नवीन नाही.आणि हळूहळू वेळोवेळी चार आण्याचा रुपया करायचा असतो. कोणतेही आंदोलन असेच चालते.एकदम सरकार एक रुपया काढून देत नाही-एकदम सर्वच्या सर्व मागण्या मान्य होत नाहीत. हे अण्णा जाणतात. आताही पुढे सुधारणा करू ह्या विश्वासावर आहे ते तरी स्वीकारुया ह्या भूमिकेवर अण्णा आले . ह्यावेळी  त्यांच्या सोबत त्यांचे जुने व खरे सहकारी होते. ह्यावेळी वाटाघाटी थेट आण्णा व सरकार अशा होत्या. म्हणूनच लोकपाल मंजूर झाले.

असो. जे लोकपाल येते त्याचे स्वागत करूया. आणि अजून एक भावाना मनात आलीये
    मराठ्यांनी पुन्हा एकदा  हादरवले दिल्लीचे तख्त!

जयहिंद! जय महाराष्ट्र!