Sunday, September 28, 2014

हम तुम: माझी खरी प्रेमकहाणी

हम तुम 

सन  १९९९ मधील १३ जून.महात्मा गांधी विद्यालय अंबरनाथ. ८ वीच्या शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस. ८ वी तुकडी जे. अख्या शाळेतला हुशार वर्ग.साधारण सर्व जण निदान ७५ % च्या वरील गुणांचे. एक एक जण जरासा बिचकतच वर्गात येत होता. कारण ७ वीतील सर्व तुकड्यातील हुशार मुल व अन्य शाळा ज्या ७ वी पर्यंत आहेत त्यातील टोपर्स हे ह्य तुकडीत असतात. 
२ लाख लोकसंखेच्या  अख्या अंबरनाथ शहरातील त्यावर्षीची बेस्ट ऑफ दि बेस्ट मुल त्या तुकडीत हि त्या तुकडीची प्रसिद्धी.  

मी आणि माझे दोन शार्प शुटर(आमच्यात खास मित्राला अस म्हणतात) आम्ही एरियातून एकत्र धमाल करत चाललो होतो. मागच्या वर्षी एवढे राडे  करून पण आम्ही ७५ ते ८५ ची बालवाडी पासूनची मार्कांची रेंज सोडली न्हवती,व हुशार अशा जे तुकडीत -ज्यात संपूर्ण संस्कृत विषय मिळतो व जिथे शाळेतले तज्ञ-अनुभवी शिक्षक असतात तिथे आपण आहोत ह्याचा आनंद झाला होताच. त्यापेक्षा गेल्या वर्षी काय काय लफडी केली ह्याची उजळणी चालू होती. आम्ही शाळेत पोहोचलो. वर्ग माहितीच होता  सवयीनुसार आपल्या आकारमानाला सोयीस्कर बेंच निवडून तिथे दफ्तर ठेवले. दोन चार ओळखीचे मित्र काही आमच्याच शाळेतले तर काही अन्य शाळातले होते.त्यांना पण व आम्हाला हि त्यांना बघून आनंद झाला. आणि मग सवयीनुसार ह्या वर्षी "सिझन" कसा आहे हे उजवीकडे  बघू लागलो. 

एकाध दोन सेकंदात तिघांच्या थोबाडावर निराशेचे भाव आले.कारण बर्याच मुली ह्या आधीच्या वर्षी होत्या त्याच होत्या. "सुंदर मुली हुशार नसतात" असे मी पुटपुटलो.मग दोघांनी पण मला सहमती दर्शवत एकमेकांचे सांत्वन केल. मग हळू हळू नेहमीची भंकस सुरु झाली. मध्येच दरवाजाकडे लक्ष होतेच.आता येणाऱ्या मुला मुलींवर कमेंट्स चालू होत्याच. अस करत करत घंटेची वेळ झाली. तेवढ्यात एक उंच मुलगी आता आली. ह्या दोघांनी नुसतीच उंच वाढलीये वैगेरे कमेंट्स  केल्या. ती आमच्या शेजारच्या रांगेतच नेमकी आली. पण मी मात्र मान वर(मी बसलो होतो ना बेंच वर) करून ती जागेवर बसेस्तोवार पाहत राहिलो.

आता मी काही मोठा कथालेखक नसल्याने शाळेतली वर्ष थोडक्यात पुढे नेतो. पहिल्याच दिवशी तीच नाव समजल. खरी कथा व अजूनही माझ्या आयुष्यात सुरु असल्याने तनू एवढेच देतो. खर तर तिच्या बाबत मी प्रत्येक गोष्ट लक्षात ठेऊन आहे.अगदी वेळ, तारीख इतकाच काय  कुठे भेटलो व तिचा कोणत्या रंगाचा ड्रेस होता हे सगळ. 

पहिले वर्ष काही विशेष घडल नाही.थोडं फार बोलण व्हयच पण मी बर्याचदा नुसता बघायचो,तिच्या नकळत पाहायचो. एव्हाना तिला "जिराफ" हे नाव पडलं होत.तिच्या उंचीमुळे आहेच ती उंच माझ्याहून दोन इंच उंच.आमचा जो ग्रुप जमला त्यात मी व ती दोघे हि होतो.पण मी ८ वीत तर कधीच तिच्याशी फारस बोललो नाही.तिला कवितेचा छंद होता. दिवाळी सुट्टी नंतर शाळा सुरु झाली तेव्हा तिने कवितेची वही आणली.ती मात्र मी वाचून फार फार तारीफ केली होती.

अस करत करत ८ वीचे वर्ष संपले.९ वीचे पण अर्धे झाले.पण ९ वीत प्रश्न मंजुषा स्पर्धेत मी होतो. आम्ही जिंकलो.आमच्या ग्रुप चे आम्ही ३  घे हि होतो.मी अजिंक्य व गौरी. पहिली फेरी हि आपल्या इयत्तेशी होती.मग त्यातून ते जिंकतील ते अंतिम फेरीत. कुणालाच माझा काहीच भरवसा न्हवता.कारण मी व माझी राडेबाज मस्तीखोर इमेज.पण वर्ग शिक्षिका आमच्या मातोश्रींच्या खास मैत्रीण.मातोश्रींच्या ग्रंथालयात त्याही यायच्या.मी काय काय वाचतो हे त्यांना त्यामुळे माहिती होत. मी वर वर कसाही वाटत  असलो तरी त्या स्पर्धेला फिट आहे हे त्यांना माहिती होत. अजिंक्य हा केवळ पहिला नंबर येतो म्हणून ह्यात होता.आणि अजून एक मुलगी गौरी हि अशाच एका बाहेरच्या स्पर्धेत गेल्यावर्षी २ री आली म्हणून होती. आम्ही आमच्या इयत्तेत तर जिंकलोच पण अंतिम फेरीत दहावी ला हि हरवले. 

त्यानंतर मात्र तिचा व अन्य काही वर्गातल्या मित्र मैत्रिणीचा माझ्यकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला.कारण इतिहास हा प्रकार मी निवडला व सर्वच प्रश्नांची उत्तरे दिली व चांगल्या ७० गुणाने आम्ही दहावीला हरवले. पण तरीही फारस बोलण अस नाहीच.एकदम फोर्मल बोलण कधी  दसर्याला सोन दे,संक्रांतिला तिळगुळ दे वैगेरे 
  
सन २००१. दहावी आली अभ्यासात गेली.पुन्हा प्रश्नमंजुषा एकहाती जिंकून मी माझी  ओळख अजून पक्की केली मग अकरावी मध्ये मी त्याच शाळेत सायन्स ला गेलो तर ती कॉमर्स ला.तेव्हा मात्र बोलण जरा जास्त होऊ लागल. कधी कधी कोलेज सुटल्यावर थांबून कट्यावर गप्पा होऊ लागल्या.पण खास तिच्याशी बोलण्यासाठी वैगेरे कधी थांबलो नाही कि बोलावलं नाही.गप्पा व्हायच्या त्या इतरांच्या समोरच.इतरांशी बोलताना व्हायच्या तेवढ्याच  

सन २००४.

मी पहिल्यांदा हरलो होतो.बारावी नापास. बरोबरीचे सगळे पुढे निघून गेले. आता कसे विषय सोडवायचे ह्याचा विचार तर होताच पण आता तनू माझ्या सोबत न्हवती.गेली ५ वर्ष १९९९ ते २००४ मी तिला बघून काढली होती. मी काही तिच्याशी  फार बोलयचो हि नाही किंवा आमची मैत्री होती अस हि म्हणता येणार नाही.७-८ जणांच्या ग्रुप मधला मी एक.माझे मन मी कधीच कुणासमोर मोकळे केले नाही.जे माझे दोन खास मित्र होते त्यांच्यापाशीही नाही. त्यामुळे  तिला मी काही असा विचार करतो ह्याची पुसटशीही कल्पना न्हवती. 

ह्याची दोन कारण होती.एकतर तिच्या नावाने मला चिडवण चालू झाल असत. शिवाय तिला हे समजल असत.आणि उगाच कुणी चिडवणार नाही मीच काहीतरी बोललो असल्याशिवाय इतर जन चिडवणार नाही अस तिला वाटण्याची शक्यता होती.आणि दुसर अस कि ती तेव्हा म्हणजे शाळेत असताना सुंदर अशी न्हवती.त्या वयात मुलांची साधारणपणे सुंदर मुलगी ही जी व्याख्या असते त्यात बसणारी ती न्हवती.नुसतीच उंची वाढली होती त्यामुळेच तिला जिराफ हे नाव उंचीमुळे पडले.तुलनेत मी आजच्या पेक्षा  त्याकाळी बरा दिसत होतो.म्हणून जरी मी माझी भावना मित्रात बोलून दाखवली असती तर त्यांनी मला मुर्खात काढाल असत.ही पण भीती होती.स्वतः च्या इमेज ची भीती.
    
 तिला पाहण,तीच माझ्या आजू बाजूला असण हे मला फार आवड्याच. मनाला फार बर वाटायचं. ती आली नाही तर मी सैर भैर  व्हायचो. का आली नसेल? एक तर ती अशक्तच.वजन कमी नुसतीच उंच. अकरावीत ती कॉमर्स ला गेली तरी मी सकाळी व मधल्या सुट्टीत न चुकता तिच्या वर्गापाशी जाऊन बर्याचदा तिच्या वर्गातल्या अन्य मित्रांशी व कधी कधीच तिच्याशी बोलायचो. मी घाबरत होतो अस नाही.पण माझ्या बोलण्यातून तिला माझ्या मनात काय चालू आहे हे समजेल कि काय अशी भीती होती.व समजल तर हे जे थोड फार बोलन होतंय तेही जायचं अशी मला भीती होती. मी योग्य वेळी सांगणार होतोच.माझ्या मते ती वेळ म्हणजे १२ वी नंतर.कारण जेव्हा आयुष्याची एक दिशा नक्की झालेली असते. तेव्हा तुमच्या प्रेम भावनेचा समोरचा जरा तरी विचार करतो.शाळेत जर हे करयला गेल तर समजून घेण दूर पण उलट तक्रार व्हायची भीती व कायमचे संबंध तुटणे हे धोके होते.पण मला तिला मिळवायचं होत आणि त्यासाठी मी इतकी वर्ष गप्प होतो.योग्य वेळेची वाट पाहत होतो. अशा प्रकारे माझ्यातला राजकारण्याने माझ्यातील प्रेमवीरावर बंधन घातलं होत. 
(माझ हे राजकरण योग्यच होत.ते पुढे येईलच.)  

पण आता कसलं काय? मी फेल.ती १२ वी पास. तसेही कॉलेज वेगळेच असले असते.पण कधी तरी जाऊन भेटता आले असते.पण आता फेल झाल्यावर कोणत्या तोंडाने जाणार? शिवाय मी इस्ट ला राहायचो ती वेस्टला.येत जाताना भेट होईल अशी पण शक्यता नाही.एकवेळेस आम्ही इस्ट वाले वेस्ट ला जायचो.कारण त्या भागात बाजारपेठ,नगरपरिषद व अन्य कार्यालये.पण ती कशाला इस्टला यायला?  मी तिचा विचार सोडून दिला. दरम्यान मला नवीन ग्रुप मिळाला.
त्या ग्रुप मध्ये माझ्या विभागातले सगळे १२ वी नापास होतो.व एक जण डिप्लोमा फेल तर एक जण फर्स्ट इयर फेल.  ह्या ग्रुप मध्येही सुरुवातीला काही बोललो नाही.पण नंतर ह्याच ग्रुप ने ह्या स्टोरीत मला मनापासून साथ दिली.मी ह्या ग्रुप मध्ये राहून १२ वीचे अपयश विसरलो  व आम्ही सगळेच दिवसभर अभ्यास करून संध्याकाळी एकत्र जमून फेल व्हायचे दुख हवेत धूर करयचो.व्यसन ह्याच ग्रुप मध्ये वाढली.पण जगण्याच शिक्षण इथेच मिळालं.एक एक जण एक दंतकथा आहेत.त्यावर नंतर कधीतरी.

सन २००५ 
मी पूर्णपणे विसरून गेलो.जोमाने अभ्यासाला लागलो. आषाढी-कार्तिकी प्रमाणे ऑक्टोबर ला २ विषय व फेब ला २ विषय करत बारावी पास झालो. नंतर मी कर्जत ला बी.एससी. आय. टी. ला प्रवेश मिळवला.आमचे वर्ग इंजिनियरिंग क्याम्पास मधेच होते.  नवीन शहर,नवीन कॉलेज नवीन मुल  मुली.इथली मुल तर मुंबई हून अप डाऊन करणारी,कुणी स्थानिक,कुणी कल्याण डोंबिवली व आमच्या भागातली तर कुणी महाराष्ट्राच्या अन्य भागातली तर काही जम्मू काश्मीर मधली.तर काही पुर्वांचलामधली. 

मी तनूला पूर्ण पणे विसरलो कि काय अस वाटू लागयच पण नाही.दिवसभर जरी आठवण नाही आली तरी रात्री पलंगावर   अंग टाकले,डोळे मिटले कि प्रथम तिचाच विचार यायचा.भले पूर्ण दिवस नाही येणार पण तेव्हा मात्र जरूर यायचा. काय करत असेल,सेकंड इयर ला असेल ना?बघितलंच नाही दिडेक वर्षात.कशी दिसत असेल? आता.कसा संपर्क करू? जावू का तिच्या कॉलेज मध्ये आणि भिडू का डायरेक्ट.काही डोकच चालत न्हवत.   

आणि अचानक  एक दिवस मयूर चा फोन आला.......

मग एके दिवशी मयूर चा फोन आला. मयूर तेव्हा पुण्यात आय.एल.एस.ला होता. मध्ये मध्ये अंबरनाथला जाण येण त्याच व्हायचंच. तर फोन वर- हाय, हेल्लो काय चाललंय? झाल्यावर तो म्हणला कि परवा तनू अंबरनाथला भेटली होती. मी एकदम खुश झालो.पण बोलण्यातून जाणवू दिल नाही. मी म्हंटल काय म्हणाली? काय करतीये आता ती? त्याने सांगितलं कि ती सेकंड  इयर बीकॉम ला आहे व AHA करतीये. मला ऐकून शॉक बसला. हि आणि AHA .कस शक्य आहे. AHA म्हणजे एयर होस्टेस Academy . मी हसयालाच लागलो.मग तो पण हसयला लागला. मग तो म्हणाला,अरे लगेच काय ती हवाई सुंदरी होणार नाही.ती खाजगी प्रशिक्षण संस्था आहे. तिथे जवळ जवळ कुणालाही घेतात. आणि नुसत हवाई सुंदरी नाही तर Hospitalityच देखील प्रशिक्षण असत त्यात.मग मी विचारलं नंबर वैगेरे दिलाय का? तर मयूर हो म्हंटला व त्याने नंबर दिला मी लिहून घेतला.

आता नंबर तर आलाय.पण कॉल नक्की कसा करयचा? काय निमित्त काढून फोन करावा हे  समजेना मग मी ठरवलं कि आपण sms पाठवू.  मग निमित्त हि मिळाल, मकर संक्रातीच आणि मकर संक्रांतीला मी तिला शुभेच्छा  संदेश पाठवला.माझ्या अपेक्षेप्रमाणे त्या दिवशी काही प्रतिसाद आला नाही.पण दुसर्या दिवशी मात्र तिचा कॉल आला.         
 मी कौस्तुभ बोलतोय हे समजल्यावर तिला फार आनंद झाला. काय करतोयस वैगेरे विचारण झाल. इतर थोडफार बोलण  झाल आणि ठेवला.    

असेच काही दिवस फोनवर बोलण होत होत. आमची पहिली भेट झाली गुढी पाडव्याच्या  आदल्या दिवशी. मार्केट मध्ये उभ्या  उभ्याच. नंतर एकदा तिच्या कॉलेज जवळ. काहीतरी काम काढून गेलो होतो. अशा जवळ जवळ ४-५  भेटी महिन्याभरात झाल्या. जेव्हा जेव्हा भेट व्हयाची किंवा फोनवर बोलण व्हायचं, तेव्हा मी तिच्या बद्धल अधिक जाणून घ्याचा प्रयत्न करत असे. करियर शिक्षण ह्यावर बोलण तर झालच होत. मग मी थोडा पुढे सरकलो. जस तिच्या घरात नक्की काय मत आहेत लग्नाबाबत. म्हणजे प्रेम विवाहा बाबत. तिच्या काय अपेक्षा आहेत.वैगेरे कुणी प्रपोज केला होता का वैगेरे? ती म्हणाली तिला ३ प्रपोज आले होते. ऐकून मी शॉक झालो. मला अस वाटल न्हवत. मग मी नाकारण्याचे कारण विचारले. तिने विचार करून उत्तर  दिले. ती म्हणाली कि," माझ्या वडिलांना अजून एक सक्खे भाऊ आहेत. त्यांना दोन्ही मुलीच आहेत.माझ्याहून लहान. मी आमच्या सर्व भावंडात मोठी.  आमच्या सांगली कडील  मराठी जैन समाजात  लग्न ठरवताना  त्या मुलीचे इतर भाऊ बहिण व त्यांनी कुणाशी लग्न केली आहेत ह्याचाही विचार केला जातो.मी
मोठी आहे व मी इतर समाजातील मुलाशी लग्न केल तर  त्यामुळे  माझ्या बहिणींच्या लग्नात प्रोब्लेम येऊ शकतो." मुद्दा पटण्यासारखा होता.         

मी तिच्या तेव्हा जो ग्रुप होता कॉलेजचा आणि AHA चा त्यांना हि नियमित भेटू लागलो. तेव्हा मला जाणवलं कि तनू फार भावना प्रधान आहे. ग्रुप मध्ये मुलच जास्त आहेत. आणि प्रत्येकाशीच ती इतकी आणि अशा तर्हेने बोलते कि बघून कुणाला वाटाव  कि अफेयर असाव. पण तिच्या मनात तस काहीच नसाव. नसत. ती पटकन कुणाशीही मैत्री करते हे मला पटत नाही अस तिची एक मैत्रीण श्वेता म्हणाली. आणि म्हणूनच हिला ३ प्रपोज आले असावेत.             

तिला थोडा थोडा अंदाज येऊ लागला होता. शेवटी मी १५  एप्रिल २००५ ला प्रपोज केलेच. थेट बोलण्याची हिंम्मत न्हवती. फोन केला. मी तिला आठवी इयत्तेपासून कसा तिच्या प्रेमात आहे हे सांगितलं. आणि इतकी वर्ष स्वतःला वेळ दिला. प्रेम आहे कि आकर्षण ह्याच 
उत्तर मला हव होत. आणि जेव्हा हे प्रेमच आहे हे समजल तेव्हाच मी तुला सांगतोय हे तिला सांगितलं. मी इतकी वर्ष थांबलो ह्यावर मी भर देत होतो. आणि हा मुद्दा तिला पटलाच. ते तिने मान्य केल. मी उगाच टिपी करत नाही हे तिला समजल. पण तिने नकारच दिला. तिने मला घरातल्या लोकांच कारण (वर दिल आहे ते) सांगितल. मी तिला म्हणालो कि अजून बरीच वर्ष आहेत हातात. लगेच उद्या लग्न नाही करायचं आहे. माझ प्रेम खर आहे. हे तर तू मान्य केलस ना ? ती म्हणाली कि आता जास्त बोलण्या पेक्षा भेटून बोलू. लगेच नाही जमणार पण जेव्हा फ्री असेल तेव्हा नक्की बोलावेल.

मग मी त्या दिवशी रात्री गुड नाइट मिस कॉल केला नाही. गुड नाइट मिस कॉल हा प्रकार असा  कि रात्री झोपण्या आधी ती मला आणि अन्य काही फ्रेंड्सना मिस कॉल द्यायची. आणि पोच म्हणून आपण परत तिला करायचा. म्हणजे आता मी झोपत आहे काय आहे ते आताच बोला किंवा मेसेज करा नंतर सकाळ पर्यंत करू नका. मी मिस कॉल केला नाही. नंबर आल्यापासून रोजच करायचो. पण प्रपोज केल्यावर नाही केला. दुसरा दिवस उजाडला. मी तिला फोन मेसेज गुड नाइट मिस कॉल काहीच केल नाही.  मग तिसर्या दिवशी  तिचाच फोन आला.तिने मला पक्क सुनावलं. ती म्हणाली तू मला प्रपोज केल हे खरय पण त्या आधी आपली मैत्री नाहीये का ? तू मला मित्र म्हणून हवाच आहेस. पूर्वीसारखाच राहा. फोन मेसेज करत जा. कधी भेटायचं ते ठरवते लवकरच.

७-८  दिवस असेच गेले.एके दिवशी ती मला म्हणाली कि माझा वाढदिवस येत आहे.मी तो वेगळ्या पद्धतीने साजरा करते. वृद्धाश्रमात जाते.तिथल्या वृद्धाना मिठाई फळे वाटते. त्यांचा आशीर्वाद घेते. वाढदिवशी जमणार नाही म्हणून आपण आधीच जावू. हायवेला आहे. तूच घेऊन चल. हि कल्पना मला चांगली वाटली. तिच्या बद्धल प्रेम, आदर अजून वाढला.     

मग आम्ही दुसर्यादिवशी स्टेशनला भेटलो. फळ,मिठाई घेतली. गाडीवरून निघालो. वृद्धाश्रमात मी पूर्वी कधी गेलोच न्हवतो. तिकडच वातावरण वेगळच भासल. अनुने  सर्वाना फळे मिठाई दिली. सर्वांच्या पाया पडली. एक दोन तिच्या ओळखीचे ज्येष्ठ होते त्यांच्याशी माझी ओळख करून दिली. तिथे थोडावेळ बसलो. आणि मग आम्ही निघालो. माझ्या प्रपोजल बधल चर्चा करण्यासाठी. मी जागा पण अशी निवडली होती कि आम्ही मोकळेपणे बोलू शकू. इतर लोक नसतील आणि तरी जागा सेफ असेल. एक तळ आहे तिथे गेलो.    
मग तळयापाशी पोहोचलो. दुपारी ४ वाजता. एकदम शांतता. माणस फारशी नाहीत. मी सुरुवात केली.पुन्हा मी इतकी वर्ष कसा थांबलो हे सांगितलं. त्यावर तीने माझी भावना खरी आहे  हे मान्य केल. तिने पुन्हा घरच कारण दिल. मी तिला समजावलं  कि लगेच काही उद्या लग्न नाही करायचं. आता २००५ चालूये. निदान ५ वर्ष तरी आहेत. आणि खरच हेच कारण आहे का? हे मला पटत नाही. मी तुला त्या दृष्टीने नसेल आवडत तर तस स्पष्ट सांग. पण उगाच गुंडाळू नकोस. 

त्यावर ती पुन्हा पुन्हा घरच कारण देत राहिली. जी गोष्ट होणार नाही त्याचा विचार का करावा अस म्हणाली. आपण पूर्वी मित्र होतो नंतरही राहू अस म्हणाली. मला काही सुचेना. ठीक आहे अस म्हणून निघालो. 

मग काही  महिने असेच गेले.मग साधारण नोवेंबर २००५ च्या दरम्यान आमचा संपर्क बंद झाला. तो बंद होण्याच कारण अस कि जेव्हा जेव्हा आम्ही बोलयचो तेव्हा तेव्हा आडवळणाने किंवा थेट मी पुन्हा पुन्हा तिला विचारायचो. मग तिनेच  फोन उचलणे  
बंद  केल. मलाही माझी चूक समजत होती. आपण केवळ मित्र राहू शकत नाही त्यापेक्षा बोलण, बंद  झालेलं बर, लवकर बाहेर पडता येईल  अस समजून मी सुधा तिला विसरण्याचा प्रयत्न केला. 

पण जेव्हा माझ  शेवटच बोलण झाल तेव्हा मी एक  डायलॉग मारला.

 "तू आणी मी आपण एकमेकासाठीच बनलो आहोत अशी माझी ठाम श्रद्धा आहे. मी तुला contact करणार नाही. पण जेव्हा कधी तू कुणाशी लग्न करशील तेव्हा तुला कायम वाटत राहील आणि आपले मित्रही म्हणतील कि खरच कौस्तुभ काय वाईट होता? त्याला नाकारून चूक केलीस. तुला पश्चाताप होईल. " 

3 Years Later
ऑगस्ट २००८ 
                                  

माझा मित्र धवल त्याचा  मला फोन आला. आज  फ्रेंडशिप डे आहे. आपल्या १० वि फ च जी२जि करूयात. मी सर्वाना कळवल  आहे. आधीच.तुझा नंबर आज मिळाला. उशीर
 झाला  कळवायला. येतोस का? मी  म्हणालो. कोण कोण येतंय? त्याने ७-८ नावे घेतली. 
त्यात तनू  पण होती.त्याला येतो सांगितलं. तनू  येतीये म्हंटल्यावर दिल गार्डन गार्डन हो गया. आज ती तीन वर्षांनी मला भेटणार होती.  

मी
 संध्याकाळी हॉटेलवर पोहोचलो. हॉटेलचा वरचा मजला बुक होता.धवलने व्यवस्था चांगली केली होती. गेलो सर्वाना भेटलो. सगळे बोलावलेले हजर होते. फक्त  तनू सोडून. मी आहे म्हणून ती येत नाही अस वाटल मला. मी सोडून दिला विचार आणि 
इतरांच्यात गप्पात रमलो. थंड पेय,सूप अस एक राउंड झाला. माझा हा सीन बहुतेक सगळ्यांना समजला होता. मी २-३ जणांना तनूने २-३ जणांना अस करत समजल होतच. त्यावर  २-३ कमेंट्स येउन गेल्या.

शेवटी ती आलीच. आणि पुढे जे होते त्यांच्याशी बोलून थेट माझ्याकडेच आली. एकदम व्यवस्थित पूर्वीसारख बोलली. हा माझ्यासाठी धक्काच होता. मीही बोललो. मग कार्यक्रम सुरु झाला. कोण काय करतय वैगेरे.कस वाटल इतक्या दिवसांनी भेटून अस बोलायचं  होत. ते चालू होत. मी जास्त तिच्याकडे लक्ष देतोय अस दाखवलं नाही.बोलण्यारच  ऐकतोय दाखवत मी आपला व्होडका मारत होतो. (सुमडीत घेऊन गेलो होतो).

कार्यक्रम संपला. घरी निघालो. आणि मी तिचा निरोप घेतला. तर तिनेच मला तुझा नंबर तोच आहे का विचारलं. मी हो म्हणालो. तिने तीच कार्ड दिल. आणि निघालो.  दुसर्या दिवशी पासून पुन्हा contact चालू. पण कमी पुर्वीसारख रोजच फोन नाही. ८- १५
दिवसातून. 

आपण मध्येच बोलण सोडलं हे तिला मनातून पटत नसेल. गिल्टी वाटत असेल म्हणून स्वतःहूनच ती बोलली असावी.           
पण भेट मात्र पुन्हा झाली नाही. आणि मी सुधा कसा बसा तृतीय वर्षाला गेलो होतो म्हणून मी सुधा जास्त लक्ष दिल नाही.   

दीड वर्षानंतर
३०  डिसेंबर २० ० ९ 


पुन्हा धवलनेच पुढाकार घेऊन नवीन वर्षाच्या निमित्ताने जी २ जी ठेवलं.तनूला मीच फोन करून कळवल. जवळ जवळ
वर्षाने फोन केला होता. आणि दीड वर्षाने भेटणार होती. ह्यावेळी लोक बरीच कमी होती. १०-१२ जणच होतो.  त्यामुळे हॉटेल काही बुक केल न्हवत. टेबल खाली होएस्तोवर आणि नंतर बर्याच  गप्पा झाल्या. नंतर शेवटी जाता जाता  तनूने सर्वाना सांगितलं 

"मला एक announcement करायची आहे. "      

आम्ही सगळे-,"काय आहे? "

धवल- "काय लग्न वैगेरे ठरलं का ?"

अनु- "मला बोलू तर द्या "

मी-"बोला "
तनू
-" तुम्ही सर्व माझे शाळेपासून मित्र मैत्रिणी आहात. आज एका जागी सगळे जमलोय. म्हणून मला सांगायचं  आहे  कि मी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. त्याचे नाव ---- आहे."

लगेच सगळे अभिनंदन करू लागले. मी पण केले.   इथवर मी ठीक होतो.  ती म्हणाली पूर्ण ऐकून तर घ्या

"ह्या लग्नाला घरून मान्यता मिळण्याची शक्यता कमी. तेव्हा मला तुम्हा सर्वांची मदत लागेल. "

हे ऐकून मात्र माझी सटकली. साला आम्हाला घरची कारण. आणि आता काय. तेव्हाच नाही म्हण्याच होत. पण मी शांत राहिलो. मला काही फरक पडत नाही. अस दाखवलं. शिवाय  मदतीच आश्वासन हि दिल.

2010

नंतर मात्र मी अनूचा विचार करण सोडून दिल. आठवण यायची पण ती आठवण अप्रिय होती. तिला आपण नको होतो हे तिने स्पष्ट का नाही सांगितलं ? उगाच इतर कारण कशाला दिली ? असे विचार मनात काही दिवस आले पण नंतर विसरलो.

कारण तेव्हा मी पुण्यातील दोन पैकी एक flat विकून आमच्या इथे दुसरा flat घेण्याच्या गडबडीत होतो. पुण्यातला विकला व इथे बदलापूर मध्ये घेतला. हे व्यवहार पूर्ण करण्यात आणि अंबरनाथहून बदलापूर ला शिफ्ट होण्याच्या गडबडीत तिचा विचारच आला नाही. एकदा आठवण आली तेव्हा सहज फोन केला.तिला मी शिफ्ट होतोय हे सांगितलं.   तेव्हा ती म्हणाली ,"अरे काय खो खो आहे का ?  मी तुमच्या इथे राह्यला येणार आहे. बी केबिन रोडला. आणि तू चालला."  च्यायला आम्ही इथून चाललो आणि नेमकी हि इथे येतीय. पुढे ती म्हणाली कि," मला नक्की सांगता  येणार नाही कि तिथे मी राहू शकेन कि नाही. कारण त्या आधीच लग्नाचा
विचार आहे. आणि घरचे तयार होतील अस वाटत नाही. त्यामुळे न सांगताच कोर्ट Marraiage करून मग सांगाव लागेल". मी तिला म्हणालो कि," पूर्ण विचार करून निर्णय घे. उद्या पश्चाताप नको. काही मदत हवी असल्यास सांग." ती बर म्हणाली आणि फोन ठेवला.

नंतर नवीन घरी शिफ्ट झालो.तर अंबरनाथचा flat भाड्याने देण्याची गडबड. तसेच नवीन घरत काही छोटी मोठी काम चालूच होती.
अशात १९ जून २०१० आला. आमचा शिवसेनेचा वर्धापन दिन. वर्धापन दिनाला गेलो. मानकर साहेबांनी तिकीट काढून ठेवलेली.षण्मुखानंद बाहेर भेटलो.  मला म्हणाले," सध्या काय करतोस? मी म्हणालो सध्या CA मिन्स Complete आराम चालूये. साहेब बोलले नाहीतरी आपण दुपारी  १२ वाजता उठता.  ये परवापासून माझ्याकडे.मला संध्याकाळीच जास्त गरज आहे.  काम काय आहे ते समजावलं. मी ठीके म्हंटल. शिवसेना पक्षामुळे मला मिळालेला हा तिसरा जॉब.  शिवसेनाप्रमुखांची हि
अप्रत्यक्ष कृपा.

२१ जून २०१०
मानकर साहेबांच ऑफिस.


इथे सर्व काम फोनवर असायचं. नेट वापरायला भरपूर वेळ. नवीन घरी  अजून नेट घेतलं न्हवत. गेला १ महिना मी लॉग इन  झालो न्हवतो. ऑर्कुटवर  आलो. स्क्राप चेक करत होतो. एका मित्राचा- बंटीचा  स्क्राप आला "तनूने लग्न केल.फोटो टाकलेत.आता सगळ संपल." 
ह्या बंटीने माझ्यासाठी तनूकडे फार आग्रह धरला होता. पण काही उपयोग झाला न्हवता. हा एकच  मित्र असा कि ज्याची मनापासून इच्छा होती कि तनू मला मिळावी. 

 ती लग्न करणार हे माहिती होतच. फोटो बघितले.आजवरच सर्व चित्र झर झर डोळ्यासमोरून  गेले. दुख झालच.  कितीही नाही म्हंटल तरी एक भाबडी आशा होती. ती सुधा आज संपली. 
पण चला एकदाचा हा चाप्टर बंद झाला.

2011
December
अस म्हंटल जात कि मानव जे जे बोलतो ते कधी नाहीस होत नाही. शब्द हे अवकाशात अनंताच्या दिशेने प्रवास करत असतात. इथेही तेच झाल. माझे शब्द नाहीसे नाही झाले.कारण ती अंतः करणातून आलेली खरी प्रेम भावना होती. ते शब्द खरे झाले. काय होते ते शब्द? ते शब्द होते.  

"तू आणी मी आपण एकमेकासाठीच बनलो आहोत अशी माझी ठाम श्रद्धा आहे. मी तुला contact करणार नाही. पण जेव्हा कधी तू कुणाशी लग्न करशील तेव्हा तुला कायम वाटत राहील आणि आपले मित्रही म्हणतील कि खरच कौस्तुभ काय वाईट होता? त्याला नाकारून चूक केलीस. तुला पश्चाताप होईल. "माझे शब्द खरे ठरले होते. 
तनूच बिनसलं तनू  आपल्या नवर्याला सोडून परत आई वडिलांकडे राह्यला आली होती. 

2014
September

आज तीच लग्न मोडून ३ वर्ष होतील.आजही आम्ही बोलतो. रोज रोज नाही तरी महिन्यातून एखाद वेळी बोलण होत.तिचा एकटेपणा तिने स्वतःला  कामात गुंतवून दूर केला आहे. तीच्या समाजात पुनर्विवाह तसा कठीणच. तिने लग्नाचा विषयच सोडून दिलाय.पण बोलण्यातून पश्चाताप जाणवतो. आई वडिलांच्या इच्छेविरुद्ध घरातून पळून जाऊन लग्न केल, आणि शेवटी पुन्हा त्यांच्याकडेच याव लागल हि अपराधीपणाची भावना तिच्या मनात आहे.  

लग्न मोडण्याच कारण काय? तर तिला लहानपणापासूनच कसलासा त्रास आहे. ती कधी आई बनू शकत नाही. काहीतरी नाव सांगितलं तिने आता आठवत नाही. तिने नवर्याला लग्न करतेवेळीच  हे स्पष्ट सांगायला हव होत. त्याची तरी काय चूक ? मुल असावीत अस कुणाही  पुरुषाला वाटणारच. त्याला वाटत हिने फसवल आणि हि म्हणते मला त्या आजारानी मूल होणार नाही हे माहिती न्हवत. खर खोट देव जाणे.          

 मला आजही वाटत धावत तिच्या घरी जाव. तिच्या आई वडिलांना भेटून तिच्याशी लग्न करण्याची इच्छा सांगावी. पण  माझ्या घरी हे चालणार नाही.परजातीय त्यात घटस्फोटित मुलीशी  लग्न करतोय हे एकवेळ चालेल. पण तिच्या आई न होऊ शकण्याच काय ? ह्याच काय उत्तर देणार आहे मी माझ्या आई वडिलांना ? मी खूप विचार केला. मी स्वतः काय आहे ? कुणीच नाही. आई वडिलांच्या भरवशावरच माझा उद्योग सुरु आहे. त्यांनी कधीच कोणत्याच गोष्टीला मनाई केली नाही.सकाळी नाश्ता काय असावा ते रात्री जेवण काय असाव ? घरात काय फर्निचर असाव,कोणती गोष्ट कुठे असावी  इथपासून सगळ ऐकल. बारावी फेल ,पदवीला ६ वर्ष घेतली, तरी काहीच बोलले नाहीत. फक्त व्यसन करू नको म्हणत. मी एकटाच मुलगा. आई वडिलांनी सगळ काही कमावल. ३-३ घर, बर्यापैकी बँक ballance ,दागिने,उद्योगाला भांडवल दिल,  डोक्यावर एक रुपयाच कर्ज नाही. माझ्या कडून खूप काही अपेक्षा नाहीत. फक्त आमच्या मर्जीने लग्न कर इतकीच अपेक्षा त्यांना असेल.  त्यांना अव्हेरून मी प्रत्येक निर्णय घेतले.

पण हा निर्णय मात्र मी नाही घेऊ शकत..नाही घेऊ शकत.  

समाप्त  

ता. क. -    तो सैफ आणि राणीचा पिक्चर होता. ह्याच नावाचा. त्यात पण असेच आहे आपल्यासारख  2 years later, 4 years later म्हणून हे नाव दिल.             

Sunday, September 21, 2014

शिवसेना-भाजप युती

काही नवीन उत्साही कार्यकर्ते युती अगोदर भाजप किती ताकदवर होती हे सिद्ध करताना ७८-८६ काळातले आकडे फेकत आहेत.जनसंघाने शिवसेनेला पहिला पाठींबा १९६७ साली पोटनिवडणूकीसाठी दिला. १९७१ सालच्या शिवाजी पार्कच्या दसरा मेळाव्यात जनसंघाचे बलराज मधोक उपस्थित होते अधुन मधून जनसंघी शिवसेनेच्या कार्यक्रमाला येत. ७१ च्या लोकसभा निवडणुकीत वायव्य मुंबईच्या जागेवरून जनसंघ-शिवसेना युती फिस्कटली होती. शिवसेनेच्या हिंदुत्वाने लॉस होतो असा मतप्रवाह होता. अरे बाळानो ७८ ते ८६ जनसंघ व नंतर भाजप हे शरद पवार ह्यांच्या पुलोद प्रयोगात होते. सो त्यांची स्वताची ताकद किती व पवार पॉवर किती हे अनुत्तरीतच राहणार. नुसते एवढेच नाही तर भाजप तेव्हा गांधीवादी समाजवाद ह्या विचारावर आधारित होता. रामजन्मभूमी वैगेरे विषय न्हवतेच तेव्हा.

मग पार्ल्याच्या ८७च्या निवडणुकीत भाजपवाले गांधीवादी समाजवादाचा राग आळवत होते. आणि त्यांनी जनता दलाच्या प्राणलाल व्होराना पाठींबा दिला. परिणाम शिवसेनेचे रमेश प्रभू विजयी.कॉंग्रेसचे कुंटे पराभूत तर व्होरा तिसर्या स्थानी फेकले गेले . आणि ह्या निवडणुकीत अवतरले कोण तर सय्यद शहाबुद्दीन. सय्यद शहाबुद्दीनच्या येण्याने कट्टर हिंदुत्ववादी गट सतर्क झाला आणि हा गांधीवादी समाजवादाचा बुरखा परवडणार नाही तेलही जायचे आणि तूपही हे जाणले. मग आले आमच्याकडे युती करा युती करा करत. आम्ही न्हवतो आलो कधी तुमच्या दारात.

अधिक माहिती- शिवसेना १९६७ साली कल्याणच्या दुर्गाडी किल्ला आंदोलन व १९७० च्या महाडच्या महिकावती प्रकरणापासून हिंदुत्ववादी आहे. आणि किती कट्टर त्याची झलक बघायची असल्यास कल्याणच्या दुर्गाडी प्रकरणातली हि काही स्टेटमेंट बघा.
१) शिवसेना पाकी मुस्लिमांना हाकलून देईन. - मनोहर जोशी
२) मी जमावबंदी तोडून स्वतः भगवा फडकावेल.-साहेब
३) कृष्णराव धुळूप शेकापचे कल्याणचे आमदार आणि विरोधी पक्षनेते होते.
साहेब म्हणाले- कल्याणातील ६ हजार मुस्लिम मतांसाठी धुळप स्वताच्या आईला विकायला पण कमी करणार नाही.

Thursday, September 4, 2014

आम्ही पोलिसांचा विरोध मोडून विसर्जन वाहत्या पाण्यातच केले.

ह्यावर्षी आमच्या इथल्या गणेश घाटावर विसर्जन करू नये अशी विनंती नगरपालिकेने केली होती.त्यासाठी खोटी कारणे  देण्यात आली होती. जसे गणेश घाटावरील पाणी दुषित आहे. (वाहते पाणी दुषित असते हा नवीन शोध लावल्याबद्धल लावणार्यांचे सत्कार करावयास हवे.) खरे तर ह्या घाटावरून जो रस्ता-पूल  जातो त्याचे रुंदीकरण करण्यात आले. त्यात घाटात काही गाळ पडला तो साफ केला गेला नाही.पुलाचे एका बाजूचे काम थोडे बाकी आहे. अशी खरी कारणे देण्याऐवजी खोटी कारणे देण्यात आली होती. मोठ्या मूर्तींसाठी हे योग्यच आहे. पण आमची मूर्ती अगदीच छोटी. आणि  पर्यायी व्यवस्था ह्या घाटापासून १ किमी लांब होती. मग आम्ही का पायपीट करून लांब जायचे तेही वृद्ध वडिलांना घेऊन ? आणि आम्ही हिंदू आहोत.मूर्तींचे नैसर्गिक वाहत्या पाण्यातच विसर्जन करणार तेही जवळच्याच. 



आमचा बाप्पा 
(दरवर्षी ह्याच आकाराची मूर्ती असते. रंगसंगती फक्त बदलते.)

मग आम्ही गणेश घाटावरच गेलो. मी व माझे वडील दोघेच. घाटात उतरत असताना एक पोलिस शिपाई आडवा आलाच.

तो म्हणाला- इथे ह्यावर्षी विसर्जन बंद केले आहे.तुम्ही तिकडे आत जा. तिकडे सोय केली आहे.          

मी (त्याच्या दुप्पट आवाजात) -इथे विसर्जन करू नये अशी "विनंती" केली आहे. विनंतीच आहे. "आदेश" नाहीये. मला हि विनंती मान्य नाही. मी इथेच विसर्जन करत आलोय आणि इथेच करणार. जा कुणाला बोलवायचं त्यांना बोलाव.        

मी तरुण, नसेल ऐकत म्हणून त्याने मोर्चा आमच्या वडिलांकडे वळवला. त्यांनी पण सांगितलं आम्ही इथेच विसर्जन करणार. पोलिस परत माझ्याकडे आला. म्हणाला- आपण इतके दिवस मनापासून पूजा केली बाप्पाची. मी पण मानतो गणपतीला. म्हणून सांगतो इथे खराब पाण्यात विसर्जन करू नका.

मी त्याला म्हणालो- कधी ड्युटी लागली इथे ?

तो- आजच

मी- माहिती नाहीये तर माहिती करून घ्या. आम्ही इथेच राहतो. इथेच दरवर्षी विसर्जन करतो. हे वाहते पाणी आहे. गेले २ तास पाऊस पण मोठा  जोराचा पडलाय. शुद्ध आहे हे पाणी. आणि हे जे नाटक ह्यावर्षी केलंय ते कुणासाठी हे वेगळ सांगायला नको.पुलाचे काम वेळेत पूर्ण केले नाही , काम चालूये त्यासाठी असेल.त्यासाठी  मी का लांब जाऊ ? मी इथेच करणार. काय करायचं ते करा.
मग त्याच्या वरची महिला अधिकारी बाजूच्या दुकानात बसली होती. ती आली. त्या शिपायाला विचारलं काय झाल ? त्याने सांगितलं.  आमची मूर्ती लहान आहे बघून तिने हरकत घेतली नाही.

 मी आणि बाबांनी  आरती केली.नंतर मी विसर्जन केल. कधी नाही ते इतक्या वर्षात मी पहिल्यांदाच स्वतः पाण्यात उतरून विसर्जन केल. एरव्ही विसर्जन करून देणारी मुल असत. ते प्रवाहाच्या मधोमध जाऊन विसर्जन करत. ह्यावर्षी स्वतः केल.

आमच पाहून एक क्वालीस गाडीमधील गणपतीवाले कुटुंब पण आमच्या मागे आले . त्यांनीही तिथेच विसर्जन केल. नंतर अजून ३ जण आले.  निघताना मी त्या पोलिस शिपाई आणि त्याच्यावरील महिला अधिकारी ह्यांना खिरापतीचा प्रसाद दिला व कमी जास्त बोललो असेल तर मनावर घेऊ नका अस हसत हसत म्हणालो. त्यांनीही हसून निरोप दिला  आणि आम्ही निघालो.

विसर्जन वाहत्या पाण्यात करायचे हा नियम  पाळा. विहीर,कुंड,तलाव ह्यात विसर्जन करू नये. हे शक्य नसेल तर पंचधातूची/चांदीची मूर्ती आणावी व तीच दरवर्षी प्राणप्रतिष्ठा करावी. विसर्जनाच्या अक्षता वाहाव्यात मग घासून पुसून ठेऊन द्यावी व पुढच्या वर्षी वापरावी.एकदाच खर्च.  पण जर मातीची(पार्थिव) मूर्ती आणत असाल तर तिचे विसर्जन हे वाहत्या पाण्यातच करावे. 


आपला 
कौस्तुभ गुरव, बदलापूर          
          

Monday, June 23, 2014

शिवसैनिक असल्याचे सार्थक झाले!- एक चांगला अनुभव!

आज सांयकाळी बदलापूर पूर्वेत मी आपल्या घराकडे निघालो होतो. दुचाकीवर होतो. नवरत्न हॉटेल पासून कात्रपकडे जात होतो. रस्त्याने समोरून एक बाई धावत आली.साधारण चाळीशीची असावी.निळ्या रंगांचा पंजाबी ड्रेस,गळ्यात पर्स,हातात पिशवी.  गाडी स्लो होती.तिने हात लाऊन मला थांबवले. " मला जरा सोडा,माझ्या आईला छातीत दुखायला लागले आहे. माझी प्लीज मदत करा " मी म्हंटल," बसा.कुठे जायचे आहे?" ती म्हणाली,"बँक ऑफ बडोदा बिल्डींग."  मी चाललो होतो त्याच्या विरुद्ध दिशेला होते ते ठिकाण.मी गाडी फिरवली आणि ती बसली. 

आम्ही निघालो. ती सांगू लागली,"मी कामावरून घरी जाताना अचानक आईचा मला फोन आला. तिने छातीत दुखू लागल्याच सांगितलं. मला प्लीज मदत करा आणि वर घरीही या. कदाचित आपल्याला तिला खाली आणून admit कराव लागेल."
मी ठीक आहे म्हंटल आणि घरात काही औषधे आहेत का विचारलं. पण त्या बाईला काही सुचतच न्हवत. मग मी धीर देत म्हणालो बदलापूर मधले चांगली  दोन विख्यात हॉस्पिटल तेथून अगदी लागूनच आहेत काळजी करू नका.आपण करू. सर्व नीट होईल.त्या बाईला जरा बर वाटल.

मग आम्ही तिथे पोहोचलो. तशी ती धावतच सुटली आणि धावता धावता मला पहिल्या मजल्यावर या म्हणाली. मी गाडी लाऊन वर गेलो. त्या बाईच्या आईने दार उघडल होत. हि बाई तिच्या आईला विचारात होती नक्की काय झाल? . तिची आई म्हणाली,"  अचानक छातीत जोरात दुखू लागल पण पण आता बरे आहे.तरी  आपण आपल्या नेहमीच्या डॉक्टर कडे थोड्या वेळाने जाऊ."
मग हि बाई म्हणाली,"Thanks.  फार मदत झाली तुमची. मला सुचत न्हवते. बर झाल तुम्ही भेटलात " आणि शेकह्यांड साठी हात पुढे केला.
मी हाथ मिळवला.नो मेन्शन म्हंटल.मग तिने नाव विचारलं मी माझ  नाव सांगितलं आणि विचारलं," मला  एक नाही समजल रस्त्याने एवढी लोक जात होते. तरी तुम्ही मलाच का मदत मागितली. तेही मी विरुद्ध दिशेने जाताना.?"

ती म्हणाली " आईचा असा फोन आणि तो तिचा त्रास होतानाचा आवाज ऐकून  मी रस्त्यावरून पळत होते,मला काही सुचत न्हवत.स्टेशन जवळ पण तरीही अर्ध्या रस्त्यातून रिकामी रिक्षा कुठे मिळणार? म्हणून मी धावत सुटले. तेवढ्यात तुम्ही दिसलात. तुमच्या गाडीवर शिवसेनेचा वाघ आणि भगवा झेंडा आहे. बस. म्हंटल ह्याला मदत मागू. हा शिवसैनिक आहे, आपली नक्की मदत करणार. अगदी उलटे जावे लागले तरी करणार. "

हे ऐकून मला फार बरे वाटले, अभिमान वाटला स्वतःचा,स्वतःच्या पक्षाचा.शिवसेनाप्रमुखांची ताकद काय आहे हे समजल.
शिवसैनिक मित्रानो,  हा विश्वास लोकांच्या मनात निर्माण केलाय शिवसेनाप्रमुखांनी. तो कधीही ढळू देऊ नका. सत्ता वैगेरे सेकंडरी आहे. लोकांची मदत करणे हीच आपली प्राथमिकता आहे.    
          
हीच ती माझी गाडी त्यावरील शिवसेनेचे बोध चिन्ह वाघ,भगवा आणि जय महाराष्ट्र.  


                   

Thursday, January 9, 2014

अलका पुणेवार निमित्ताने

हि बाई अभिनेत्री म्हणून मला तरी माहिती न्हवती. गदर वैगेरे चित्रपटात छोट्याशा भूमिका व स्टेज शोज करते अस हे प्रकरण झाल्यावर समजल. ह्या बाईंच आधी एक लग्न झाल . पहिल्या पतीपासून त्यांना एक मुलगी(वय २१ काही वृत्त पत्रानुसार २५ ) आहे व ती विवाहित आहे. त्यांनी दुसरे लग्न हवाई दलातील माजी अधिकारी संजय पुणेवार ह्यांच्याशी केल. त्यांच्यापासून त्यांना दोन जुळी मुल आहेत.अलका बाईंचे वय महाराष्ट्र टाईम्स नुसार ४७ व इतर वृत्तपत्रानुसार ४४ आहे. त्यांच्या प्रियकराचे वय महाराष्ट्र टाईम्स नुसार २७ व इतर वृत्तपत्रानुसार २३ आहे.


माझ्या मनात दोन प्रश्न आले. हि बाई म्हणते कि मला माझ्या नवऱ्याचा त्रास होता.त्याचेही एका मुलीशी संबंध होते. मी फार त्रासले होते. अलोक नसता तर मी माझ्या जीवाच बर वाईट केल असत. पण माझ्या मुलांना माझ्या वागण्याचा त्रास होऊ नये व त्यांनी वडिलांची दुसरी बायको accept करायची असेल तर मी मेले अस त्यांना समजायला हव,म्हणून मी आत्महत्येचा बनाव रचला.अस हि कबूल करतीये तर त्यांना सोडलं का ? त्यांनी स्वतःच स्वताच्या अपघाताचा बनाव रचला. आणि त्यांच्यामुळे पोलिसांचा वेळ वाया गेला. नवी मुंबईतील संध्या सिंह प्रमाणे तर हे प्रकरण नसेल ना अशी शक्यता वाटून पोलिसांनी जीवतोड मेहनत घेतली. सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग व कट रचणे आणि फसवणूक असे आरोप त्यांच्यावर का लावले नाहीत ? त्यांना सोडून का दिले?


दुसर अस कि दोन दोन लग्न होऊन पुन्हा तिसरे. तेही इतक्या लहान तरुणाशी. तो अलोक पालीवाल चांगला इंजिनियर आहे. मूळचा बंगलोरचा आहे व त्याचे वडील नामांकित सर्जन आहेत. एक भाऊ परदेशात तर एक मुंबईत स्थायिक आहे. त्याने हिच्यात काय बघितलं ? मला वाटल अभिनेत्री म्हणजे फार सुंदर असेल तर तेही नाही. तसेच हि बाई अलोकच्या आई वडिलांना भेटली. त्यांना स्वतःच नाव निकिता मिश्रा सांगितलं. तसेच माझे आईवडील अपघातात गेले व त्यात माझा चेहरा खराब झाला. तुम्ही सर्जन आहात तर माझी प्लास्टिक सर्जरी करून द्या. सगळाच झोल.

नक्की काय म्हण्याच ?इतक्या जास्त वयाच्या महिलेशी लग्न करून त्याला नक्की काय सुख मिळणार आहे ? ती फार काही सुंदर नाही कि श्रीमंत नाही. तिने ह्या पोराला नादाला लावलं कि तोच हिच्या प्रेमात पडला ?पण मग प्रेमात पडण्यासारखे तिच्यात काय आहे ?

आणि समजा अलका पुणेवार ऐवजी तिच्या वयाचा माणूस असता तर ? तर मात्र मिडिया आणि महिला संघटनानी त्यांना फाडून खाल्ल असत. आता कुठे गेली ती टीनपाट महिला आघाडी ?कुठे गेला तो महिला आयोग ?