Sunday, January 3, 2016

बाजीराव मस्तानी! माध्यमांतर करताना बदल आवश्यक आहे.

बाजीराव मस्तानी! माध्यमांतर करताना बदल आवश्यक आहे.

बाजीराव मस्तानी बघितला. त्यावर ज्या कारणासाठी टीका झाली ती योग्यच होती. पण ह्या निमित्ताने श्रीमंत बाजीराव पेशवे जगभर पोहोचले. आपण मराठे लुटारू न्हवतो हे आम्ही सोशल मिडीयावर (इतिहास आधारित परप्रांतीय ग्रुप) वर सांगून सांगून थकलो. ते काम ह्या एका चित्रपटाने केले. ह्या अशा संमिश्र प्रतिक्रिया आपण वाचल्याच असतील. पण माझा विषय तो नाही तर माध्यमांतर आहे.

बखर आणि कादंबरीत फरक आहे हे मान्य करता ना तुम्ही ? exactly हेच केल आहे त्या चित्रपटात. बखर आणि पत्रव्यवहार ह्यावरून कादंबरीकार कादंबरी रंगवतो. जर कादंबरी लेखकांच स्वातंत्र्य तत्कालीन पिढीने मान्य केल नसत तर आज किती लोकांना मराठ्यांचा इतिहास समजला असता? किती लोकांनी मुद्दाम जाऊन बखरी आणि ऐतिहासिक पत्रव्यवहार अथवा अन्य साधने अभ्यासून ती लक्षात ठेऊन आपले महापुरुष समजून घेतले असते? तोच प्रकार चित्रपट माध्यमात रुपांतर करताना जर दिग्दर्शकाने केला तर त्याला ते एका मर्यादेत करू द्या. बाजीरावांना व काशीबाईंना गाण म्हणताना- नाचताना दाखवण हे चुकीचे आहे. पण हे दाखवत असताना ह्या चित्रपटात बाजीरावांच्या शौर्याला कुठेही धक्का लागला नाहीये. आता समजा त्यांना पराभूत नायक दाखवले असते तर विरोध करण्यास वाव आहे. पण तसे काहीही चित्रपटात नाहीये बाजीराव एक योद्धा ते एक प्रियकर हा प्रवास पटकथा अलगद करते. उगाच हा प्रसंग घुसडला आहे अस चित्रपट पाहताना कुठेही वाटत नाही.

आता ह्या चित्रपटातून लोकांचे कुतूहल निश्चित जागृत झाले आहे. ते वाचू लागतील,नेट वर सर्च करू लागतील. तसेच व्यावसायिक यश मराठ्यांचा इतिहासावरील चित्रपटास मिळते हे लक्षात आल्याने आपल्या इतिहासातील अन्य महापुरुषांवर देखील चित्रपट भविष्यात येतील अशी आशा आहे. ह्यास मराठ्यांचा इतिहासाचा एक प्रकारे विजयच म्हणावा लागेल.