Tuesday, December 14, 2010

लाल महाल,ब्रिगेड व दादोजी


सध्याचा लाल महाल ही मूळ वास्तु नाही
ब्रिगेडी लेखक कोकाटे म्हणाला,“लाल महाल पुरात्त्वखात्याकडे असला पाहीजे. तो पालीकेच्या अधिकारात का ?”
ब्रिगेडी कोळसे-पाटील म्हणाला, “२००२ मध्ये लाल महालात दादोजी कोंडदेवचा पुतळा बसवला आणि २००४ मध्ये जेम्स लेनने वादग्रस्त पुस्तक लिहीले. या दोन्ही ठरवून केलेल्या गोष्टी आहेत.”

लाल महालाची थोडक्यात माहिती – या वाडयाची जागा झांब्रे पाटीलकडून विकत घेतली होती आणि त्यावर लाल महाल हा वाडा बांधण्यात आला होता. त्याचा पाया ५२ ½' x ८२ ½' या व्यासाचा होता आणि उंची ३० ½' होती. त्यास १३ ½' खोलीची तळघरे होती. १६४६-४७ मध्ये शिवाजी महाराजांनी त्यांची राजधानी राजगडला हलवली आणि लालमहालाचा उपयोग प्रशासकीय कामासाठी होऊ लागला. इ.स.१६८९ ते इ.स.१७०७ या धामधूमीच्या काळात लाल महालाची अगदी दुर्दशा झाली. मोडकळीस आलेल्या लाल महालाची १७३४-३५ मध्ये डागडूजी करून थोरल्या बाजीरावांनी तो राणोजी शिंदेंना आणि रामचंद्रपंतांना रहायला दिला.

राणोजी शिंदे गेल्यानंतर लाल महालाचा उपयोग गोदाम म्हणुन झाला. त्याला लोकांनी अंबरखाना या नावाने पुकारण्यास सुरुवात केली होती. इ.स.१८१८ मध्ये इंग्रजांनी तो पुर्ण उध्वस्त करून त्याची लाकडं व दगडी ` ३१५ ला विकली. या लाल महालाच्या प्रांगणात एक विहीर होती. दोन करंजे होते. इ.स.१९२५ मध्ये जिजामाता उद्यान बांधण्यात आले. आज जिथे हे जिजामाता उद्यान आहे तिथेच हा वाडा होता. दुर्दैवाने तो कसा दिसत होतो, त्याची रचना कशी होती या बाबत कुणालाच माहिती नाही.



१९५० मध्ये पुणे महानगरपालीकेने पुण्याचा सांस्कृतीक वारसा जपण्याचे ठरविले. त्यापैकी पुन्हा लाल महालाच्या प्रतीकृतीची उभारणी हा उपक्रम १९८४ मध्ये हाती घेतला. ही वास्तु इ.स.१९८८ बांधून पुर्ण तयार झाली. सोन्याच्या नांगरच्या प्रकरणामुळे लाल महालला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले होते. म्हणुन त्या प्रसंगाला धरून बाळशिवबाची ब्राँझची प्रतिमा तयार केली. त्याच बरोबर नजर ठेवून देखरेख करणार्‍या राजमाता जिजाबाईसाहेब तसेच प्रशासकीय आणि शिवबाच्या प्रशिक्षणाची बाजू संभाळणारे दादोजी कोंडदेव लाल महालाशी निगडीत असल्या कारणाने त्यांचेही पुतळे उभारले.
२००४ मध्ये दादोजींचा पुतळा उभारला गेला हा कोळसे-पाटलाचा कपोलकल्पीत आरोप बिनबूडाचा आहे. हा मूळ लाल महाल नसल्याने पुरातत्त्वखात्याचा या वर काहीच अधिकार नाही. ती पालीकेची मालमत्ता आहे. स्वत:ला इतिहास लेखक म्हणुन प्रसिद्धी मिळवू पाहणार्‍या कोकाटयाला एवढेसुद्धा माहीत नाही ?

ब्रिगेडी आक्षेप व माझे मत.


तिथे दादोजी ह्यांचा पुतळा का?शहाजी राजांनी जिजाऊ बरोबर शिवरायांच्या शिक्षणासाठी विविध विषयात निपुण बरेच लोक दिले होते.(उत्तर:असतील.देणारच कि)
.मग दादोजी गुरु होते असे भट का ओरडतात? शिवाय सरकारने जी समिती ह्या प्रश्नी स्थापन केली होती तिने देखील दादोजी गुरु नाहीत असे म्हणाले व दादोजी ह्यांच्या नावाचा प्रशिक्षक पुरस्कार देखील मागे घेतला.त्या समिती मध्ये पण पुरंदरे आले नाहीत.
(उत्तर:इतिहास हा पूर्णपणे उलगडला जातोच असे नाही.बाबासाहेब पुरंदरे ह्यांनी कोणत्या काळात चरित्र लिहिले व आता काय साल चालू आहे? इतक्या वर्षात नवीन उत्खनन झाले असेल तसेच नवीन कागद पत्रे हाती लागली असतील.असो.पण काही असो दादोजी हे पुण्याचे कारभारी होते ह्यात दुमत नसावे त्यामुळे सोन्यचा नांगर फिरवला त्यावेळी ते तिथे उपस्थित असणारच कि.मग सध्याच्या पुतळ्याला नावे द्या व वाद संपवा)

Saturday, December 11, 2010


अण्णा हजारे

आपल्याला हि व्यक्ती माहितीच असेल.वेगळी ओळख द्याची गरज नाही.तरीही देतो.हे सध्या महाराष्ट्रातील एकमेव समाज सुधारक आहेत(असे म्हणाले जाते).
त्यांचे खरे नाव किसान बाबुराव हजारे.
पूर्वी ते मुंबईत भायखळ्याला भाजी विकत.थोडीशी भाई गिरी पण करत.म्हणजे एकदा त्यांनी हफ्ता मागतो म्हणून एका पांडूला (हवालदार) ला फटकवला होता.मग जरा गायब झाले भायखळा मधून. मग ६२ ला चीनी आक्रमण झाले तेव्हा मोठ्या प्रमाणत सैन्य भरती चालू झाली. शारीरिक चाचणी निकष शिथिल झालेले म्हणून अण्णा लष्करात भरती झाले.६५ च्या युद्धात ते जायबंदी पण झाले.मग १८ वर्षाचे कमिशन पूर्ण करून ते राळेगण सिद्धी ला परत आले.
घरात मोठे पण लग्न नाही केल व काही काळातच घरातून बाहेर पडून ते गावातल्याच मंदिरात राहू लागले.आजही ते एकाच गावात असून कधीही घरी जात नाहीत.
नंतर त्यांनी राळेगण मध्ये सिंचन का काय बोलतात ते प्रकल्प केला।(आम्हाला कुठे शेतीतलं कळते.आम्ही शहरी बाबू) तिथे पाणी आलं.पिके उत्पादन वाढू लागली.मग अशीच प्रगती करत त्यांचे गाव "आदर्श"गाव झाले.(कुलाब्यचे आदर्श न्हवे)

दुसरी बाजू


अण्णा हजारे हे सुधा manage होणारे समाज सुधारक आहेत. लावासा बद्दल बोलताना ते पर्यावरणाचा विचार करतात तर दुसरी कडे जैतापूर प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवतात...ते स्वताच्या तत्वांना नेहमीच आदरांजली देत आले आहेत...

जि तत्परता युति शासनाच्या काळात सो called भ्रष्टाचार विरुद्ध जन आन्दोलन व उपोशन करुन दाखवलि ति नन्तर कुठे गेलि.तेव्ह जवळ जवळ प्रत्येक गावात त्यान्चे लोक साखळी उपोशनला बसले होते ते पन अगदि मोक्याच्या जागि जसे बस/रेल्वे स्थानक

माहिति अधिकार वर गले काढून त्यन्चि बाजु घेन्यात कहि अर्थ नाहि. हो माहितीच्या अधिकार बद्दल बोलाल तर त्या आंदोलनात अण्णा हजारे काही कालावधी नंतर दाखल झालेत कारण ह्या अधिकार बद्दल आधीच डाव्या विचार सारणीच्या लोकांचे आंदोलन चालू होते..त्या बद्दल तसे निवेदनेही सरकारला त्यावेळी देण्यात आले होते..अण्णांचा ह्या आंदोलनाला फक्त हात लागला असेही म्हणता येईल... जेव्हा सर्व भारतात हा कायदा लागु करावा असे विधेयक सन्सदेत आले तेव्हा बरेच दिवस चर्चा झालि. ह्या कायद्यातिल "प्रमुख अस्त्रे" अस्लेल्या तरतुदि वगळण्यात आल्या .हे तेव्हा काहि निवडक माध्यम सान्गत होति.अन्ना देखिल त्याबद्द्ल बोलले"जसा आहे तस विधेयक मन्जुर व्हायला हव होत पन ठीक आहे"

आता म्हने मि नव्या मुख्य मन्त्र्याना आदर्श व लव्हासा प्रकरनि वेळ देनार किति तर ३ महिने.म्हन्जे नवे चव्हान काय अन्गुथा बहाद्दर वाटले का ह्याना.ते तर पन्त प्रधान कार्यलय चे मन्त्रि होते.त्याना हे कळत नाहि असे कसे म्हणता येइल.

जिथ शिवसेनेचा पाठींबा तिथ हे विरोध कर्नार.म्हने जैतापुर मधे योग्य पुनर्व्सन होनर आहे.अरे बाबा तुला मच्छी मधल काय कळत?देणार का तु आमच्या मच्छी मार लोकाना दुसरा समुद्र?

त्यान्चा टॆनिस चेन्डु झालाय.जो दोन्हि कोन्ग्रेस व त्यांचे विविध गट सोयिनुसार टोलवत असते.
ते शिवसेना द्वेष्टे आहेतच फार त्रास दिला त्यांनी युती च्या सरकार च्या वेळेस. त्यांनी आरोप केले म्हणून युतीच्या ३ मंत्र्यांनी राजीनामे दिले.बाळासाहेबांनी त्यांचा वाकड्या तोंडाचा गांधी,आडव गेलेल मांजर असा समाचार घेतला. समाज सुधारक गांधीवादी हा बुरखा घालून त्यांचे जे धंदे चालतात ते बाळासाहेबांनी १३ वर्षापूर्वी ओळखून लोकांना इशारा दिला होता.तो धोका आता जाणवतोय.सरकारला पण असे विरोधक विधीमंडला बाहेर लागतात ज्यांची प्रतिमा स्वच असते(निदान लोकांना दाखवण्यापुरती) बाळासाहेब तेच सुचवत होते. आम्हाला फ़रक पड्त नाहि त्यांचा.

मला काही त्यांच्या बधल पडलेले प्रश्न व त्यांची उत्तरे(कंसात)

१) लव्हासा: पर्यावरणाची वाट लागली मग जैतापूर चे काय?
( फक्त पुणे व नगर मध्ये पर्यावरण असते असा नवीन शोध लागला मला)

२) मी आदर्श व लव्हासा प्रश्नी नव्या चव्हाण साहेबाना वेळ देणार.
(public memory is short.- तो पर्यंत लोक विसरतील.)

३) 2g स्पेक्ट्रम ,CWG तसेच कणकवलीचे संत नारायण राणे ह्यांच्या शाळेच्या नावावर लाटलेल्या व आता हॉटेल नीलम व जेल (मुंबई) असलेला भूखंड.महाबळेश्वर येथील भूखंड,विलासराव देशमुखांचा लातूर मधील भूखंड जो मूक बधीर शाळेसाठी होता आज तिथे व्यावसायिक गाळे व (देशमुखांची) विकास बँक आहे या सर्व घोटाळ्यावर काहीच का बोलत नाहीत.

४) तेव्हा गावा गावात स्वतःचे कार्यकर्ते बसवून "भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन" केल मग वर उल्लेख केलेले नेते काय हजारे परिवाराचे जावई लागतात का?

५)युतीच्या काळात ज्या 3 मंत्र्यांनी अण्णा ह्याच्या आरोपानुसार भ्रष्टाचार केला त्यांचे पेक्षा हे आदर्श 2g cwg लव्हासा व वरील भूखंड घोटाळे शेकडो पटीने गंभीर व मोठे आहेत.मग आता अण्णा ह्यांच्या आंदोलनाला ती धार का नाही?

भारतीय समाजाची एक मानसिकता आहे.आपण जेव्हा एखाद्याला १-२ वेळा आजमावतो तेव्हा त्यावर विश्वास ठेवतो. त्या-त्या व्यक्तीचे मग ती राजकारण सोडून कोणत्याही क्षेत्रातील असो त्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवला जातो.
त्याने म्हणलाय मग ते बरोबर असा एक विश्वास लोकांचा बसतो आणि हे लोक विश्वास कधी तोडून जातील हे आपल्याला काळात पण नाही.

राजकारणी, लोक प्रतिनिधी हे ५ वर्षांनी का असेना निवडणुका आहेत लोकांना सामोरे जायचे आहे हे ध्यानात ठेवून काही तरी काम करतातच.१० आश्वासन दिली असतील तर २-3 तरी पूर्ण करतीलच पण आण्णा सारख्या व्यक्तीला अस काही आहे का? आला मनात करयचे आंदोलन नाहीतर मागे घ्याचे.कोण जाब विचारणार.बर जर खरच त्यांना त्यांचा विचार वाढवायचा असता तर त्यांच्या बरोबरचे लोक हि वाढलेच असते आज अण्णा हजारे ह्यांचे शिवाय कोणाचे नाव त्यांच्या संस्थेतून/आंदोलनातून पुढे आले?म्हणजे आपल्याशिवाय कोणाला वाढू हि द्याचे नाही.

अण्णा ह्यांनी आज पर्यंत बरीच कामे चांगली.नेते नालयक आहेत भ्रष्ट आहेत पण जर कोणी समाज सेवक ह्या बुरख्या आड सत्ताधारी पक्षाची बाहुली बनणार असतील तर काय अर्थ आहे?
लोकांनी त्यांच्या बधल नीट डोळे उघड ठेवून मत बनवावं व माझ्या दृष्टीने विचार एकदा तरी करून पहा व मग आपले मत बनवा.