Monday, April 19, 2010

सम्राट अकबर थोर नव्हताच......!!!

सम्राट अकबर थोर नव्हताच......!!!

अकबराने "दिन-ए-इलाही" नावाचा धर्म स्थापन केला।धादांत खोटे, कारण हा "धर्मही" इस्लामचेच एक लघूरूप असल्याचे आपल्या लक्षात यायला कदाचित काहिसा वेळ लागेल. "दीन" म्हणजे धम्र आणि "इलाही" म्हणजे "अल्लाचा". असे असताना अकबराने हिंदू-मुस्लिम धर्मातील चांगली तत्वे एकत्र करून एक नवा धर्म स्थापन केला, हे विधान शंकास्पदच आहे. धम्र स्थापन करणे म्हणजे काहि गणेशोत्सव मंडळ स्थापन करण्यासारखे सोपे नव्हे.कारण धर्म म्हटला की, त्याला त्याचे धर्मग्रंथ असतात, तर "दीन-ए-इलाही" चे असे कोणते धर्मग्रंथ आहेत याची माहीती इतिहास देतो?त्याचबरोबर प्रत्येक धर्मात मोक्षप्राप्ती,ईश्वर प्राप्ती यांच्यासारख्या काही व्याख्या असतात तसे "दीन-ए-इलाही" बाबत काय आहे?जर हा धर्म अकबराने स्थापन केला असे म्हटले तर "अकबर स्वतःला पैगंबरापेक्षाही श्रेष्ठ समजत होता" असा निष्कर्ष आपण काढावा काय? तेही खरेच आहे, कारण "सम्राट" म्हणवून घेणार्‍या अकबरला ग ची बाधा होणे स्वाभाविक आहे आणि याच ईर्षेपोटी त्याने असा धर्म स्थापन करण्याचा घाट घलण्याचा उपद्व्याप केला असणार हे निश्चित. पण तोही इस्लामचाच एक भाग होता हे विसरून चालणार नाही.शिवाय त्याने असा धर्म स्थापन केलाच असे थोडा वेळ मान्य केले तर त्याच्या प्रार्थनास्थळाबद्दल किंवा मंदीराबाबत कोणती माहीती मिळते? असे काहीच "दीन-ए-इलाही" बाबत आढळत नाही.शिवाय आपला धर्म वेगळा आहे असे म्हणणारी व्यक्ती म्हणजे धर्मसंस्थापक नसून धर्मविच्छेदक असते, हे आपण ध्यानात घ्यायला हवे. आजीबाईंचे सोवळे वा देवघराचे पावित्र्य भंग करीत देवघरात खुशाल जोडे घालून वावरणार्‍या तरूण जसा "मी तुमचा धर्म मानीत नाही", असे खुशाल वर्तन करतो तसेच अकबराने केले.संदर्भासाठी वाचावे व्हिंसेंट स्मिथ लिखित Akabar the Great Mughal.
पोर्तुगीज पाद्र्यांचा जो गट अकबराच्या दरबारी काही वर्षे वास्तव्य करून होता, त्यातील मॉंसेरॉट नावाचा पाद्री म्हणतो,"आम्हाला पाचारण करण्यात अकबरास काही अध्यात्मिक उत्कंठा असावी ही आमची अपेक्षा फ़ोल ठरली,उलट आध्यात्मिक उत्कंठा नष्ट करण्याचाच हा त्याचा नवा उपद्व्याप होता आम्हाला दिसून आले।"जर अकबराने सर्वधर्मसहिष्णूता मानली असे म्हटले तर स्मिथने त्याच्या पृष्ठ १२५ वर लिहिले आहे" इसाई पाद्र्यांनी अकबरास जी बायबलची प्रत भेट म्हणून दिली होती, ती त्याने परत केली."स्मिथ लिहितो (पृष्ठ १६०) "अकबराचा तथाकथित "दीन-ए-इलाहि" धर्म म्हणजे एक राजकारणी सोंग होते.कमालीचा अहंभाव व बेलगामी वागणे हेच त्याचे के नाव होते."अकबर हा मोंगल सुलतान होता. मोंगल साम्राज्याचा जो जो दास होणार नाही त्याचा समूळ नाश करण्याचा त्याने घाट घातला होता, मग तो मुस्लिम सुद्धा का असेना. आत सारे मुसलमान काही मोंगल नव्हते.उलट अफ़गाण आणि तुर्क सुलतानांच्या शाह्याच विनाशून अकबराने मोंगलशाही चालविली. त्यामुळे इतर सुलतान त्याचा द्वेश करीत.म्हणजे हिंदू धर्माच्या विरुद्धच नव्हे तर स्वतःच्या मोंगल बाद्शाहीकरिता इतर कोणत्याही वैयक्तिक महत्वाकांक्षेप्रमाणे लढत होता, राज्य वाढवित होता. अर्थात तो मुस्लिमांनाही समानतेने वागवित नव्हत तर त्यांची राज्येही तुडवित होता,बुडवित होता. केवळ स्वतःची बादशाही टिकावी या एकाच हेतूने त्याने हिंदूंवर "जिझिया" सारखे जाचक कर लादले नाहीत किंवा सशस्त्र लाखो हिंदूंना सरसकट मुसलमान करण्याची मोहीमही आखली नाही.हिंदू-मुस्लिमांना समानतेने वागवावे हा त्याचा उद्देश मुळीच नव्हता.पण, हिंदूंवर असे प्रत्यक्ष धार्मिक अत्याचार जेव्हा जेव्हा आधीच्या मुस्लिम सुलतानांनी केले तेव्हा तेव्हा त्याचे झालेले भयंकर परीणाम त्याच्या डोळ्यासमोर होते.तशा प्रपीडक नि धर्मांध सुलतानशाह्याच केव्हा केव्हा हिंदूंच्या असंतोषाच्या आगीत भस्मसात झाल्या होत्या.(उदा- मुबारक खानाचा खून करून पूर्वाश्रमीचा हिंदू असलेला खुश्रुखानाने सत्त हस्तगत करून हिंदू सत स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता.) त्यामुळेच स्वतःची बादशाही टिकावी या एकाच हेतूने अकबराने जिझिया सारखे कर न लादता औरंगजेबापेक्षा कित्येक पटीने सौम्यपणे व्यवहार केला. याचा अर्थ हिंदूंना आदर देणे हा त्याचा उद्देश मुळीच नव्हता किंवा एकात्मतेच्या वा समतेच्या भावनेने मुळीच नव्हे.

पण सत्तास्थापनेत स्वतः सर्वसत्ताधीश, सम्राट, अगदी अरेरावी झाल्यानंतर अकबराची दुर्दम्य महत्वाकांक्षा त्याच्या पलिकडे धाव घेऊ लागली होती।लोकांचा सम्राट झालो, याचा अर्थ यांचा पारलौकीक मीच आहे, जगाचा पैगंबरही मीच झालो आहे, अशा थाटात त्याने "दीन-ए-इलाही" चा घाट घातला. जे त्याला आधीच्या सुलतानांप्रमाणे हिंदूंना छळाच्या बळावर धर्मांतरीत करणे जमले नाही,ती राक्षसी महत्वाकांक्षा त्याने या अशा प्रकारे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला होता, तलवारीच्या बळावर नव्हे तर "दीन-ए-इलाही" द्वारे हिंदू धर्माला एक प्रकारे ग्रहण लावण्याचाच त्याचा प्रयत्न होता. कारण इतिहासातील सर्व लढाया या फ़क्त तलवारीच्याच बळावर लढल्या गेल्या नाहीत.त्यामागे कूटनितिचाही समावेशही होता.कारण, या धर्माचा मुख्य पैगंबर हा "अकबर" हाच मानावा लागे. नुसते "जयगोपाळ" सोडाच,पण नमस्कार म्हणूनही भागत नसे, तर त्या अकबरी धर्मात गेलेल्या हिंदूंना प्रथम वंदनेतच "अल्ला हो अकबर"च म्हणावे लागे. त्या धर्माची भाषाही पर्शियन होती जिचा मागमूसही हिंदुस्तानच्या संस्कृतीत दिसत नाही. जेणेकरून अकबराची सत्ता हे एकप्रकारे परचक्रच होते.एकंदरीत इतके सांगणे पुरेसे आहे की,अकबराची, मनुष्यजातीचा पारलौकीक सम्राट बनण्याची ही सवाई शेख महंमदी महत्वाकांक्षाही पार धुळीला मिळाली.कारन, त्याच्या या नव्या धर्मात आधी कोणी फ़ारसे हिंदू-मुसलमान गेलेच नाहीत.दुसरे प्रमाण म्हणजे आपण हिंदू,पारशी,ख्रिश्चन यासारख्या धर्मियांची नावे अर्हात त्या त्या धर्माच्या अनुयायांची नावे सांगू शकतो, तसे "दीन-ए-इलाही" च्या किती अनुयायांची नावे इतिहास देतो?कारण जरी या धर्माचे अनुयायी खोदून खोदून बळजबरीने शोधलेच तरी त्यांनी अकबराने स्थापन केलेल्या धर्मात जबरदस्तीने धर्मांतरीत केले गेले होते. कारण अकबराच्या मृत्यूनंतर त्याच्या धर्माचे हेच अनुयायी काळाबरोबरच कुठच्या कुठे इतिहासात बेपत्ता झाले हे त्या पैगंबरालाच माहीत.---संदर्भ (सावरकर लिखित "भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने--- पृष्ठ ३५६-३५७)

ऑरकुट वरील "आजचा दिनविशेष" कमुनिटी चे मालक ह्यांच्या लेखावारून साभार.

Saturday, April 17, 2010

दि. १३ एप्रिल २०१० हा सोनेरी दिवस आम्ही आजन्म विसरू शकत नाही. कारण या दिवशी एका आगळ्या वेगळ्या सेनेचा उदय झाला. ४४ वर्षापूर्वी हिंदुहृदय सम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांनी विचारांचे जे सागर मंथन केले. त्या मंथनातील वादळी विचारांचे थेंब हे महाराष्ट्रातच नाही तर उभ्या हिंदुस्तानातील जनमानसात शिंपडले गेले. आणि ह्या शिंपडलेल्या एकेका थेंबातूनच शिवसेनेच्या वादळी विचारांचा एक महासागर तयार झाला. याच विचार धारेच्या प्रवाहाने प्रेरित होऊन असंख्य तरुणाच्या गळ्यातले आजही ताईत असणारे व्यक्तिमत्व म्हणजे बाळासाहेब ठाकरे. त्यांच्या याच विचार धारेचे शिवधनुष्य पेलून त्यांच्या विचारांची महती त्रिखंडात इंटरनेट च्या माध्यमातून गाजवण्यासाठी ज्या सेनेचा १३ एप्रिल २०१० या दिवशी जन्म झाला ती सेना म्हणजे शिव माहिती व तंत्रज्ञान सेना.

दि. १३ एप्रिलला हा सोहळा ठरल्या प्रमाणे सेनाभवनामधील तिसर्या मजल्यावरील एका प्रशस्त हॉल मध्ये पार पडला. या मेळाव्याला पुणे, नागपूर व नाशिकसह विविध भागातील शेकडो शिवसैनिक उपस्थित होते. मेळाव्याला येणाऱ्या प्रत्येक शिवसैनिकांचे हॉलच्या प्रवेश द्वारा जवळच संपर्कासाठी माहिती नोंद केली जात होती. बरोबर ५.३० pm च्या ठोक्याला कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि व्यासपीठावरची संचालनाची सर्व सूत्र श्री विशेष राणे यांनी आपल्या हातात घेतली. त्यानंतर लगेचच “शिवसेना सचिव मा. विनायकजी राऊत साहेबांचे आगमन झाले आहे” असे श्री अमोल नाईक यांनी घोषणा करताच टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत झाले. मा विनायकजी राऊत साहेबांच्या हातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला गेला. आणि सर्वांच्या शिव गर्जनेने हॉल दणाणून गेला. आता पर्यंत श्री. राहुल खेडेकर, मा विनायकजी राऊत साहेब , मा मानकर साहेब या सर्व मान्यवरा व्यतिरिक्त श्री अमित चिविलकर, श्री अनुज म्हात्रे, श्री अमोल नाईक, नागपूरहून खास आलेले श्री सतीश पानपते तसेच महिला भगिनी मेघा गावडे, अक्षय महाडिक पुण्याचे श्री रोनक शहा हि मंडळी व्यासपीठावर उपस्थित होती. ऑर्कुट समुदायाचे नियंत्रक श्री अमित चिविलकर यांनी सुंदर आशय पूर्ण प्रस्तावना सादर केली त्यात त्यांनी इंटरनेट वरील ऑर्कुट समुदायाच्या जन्मापासून ते आज पर्यंतच्या कार्याचा सर्व लेखाजोखाच सर्वांसमोर मांडला. त्यानंतर श्री अमोल, श्री सतीश पानपते, अक्षया महाडिक, मेघा गावडे या सदस्यांनी हि आपली परखड मते सर्वांसमोर मांडली. त्यानंतर आम्हा सर्व ऑर्कुट समुदायातील कार्यकर्त्यांचे लाडके तसेच सर्व कार्यकर्त्यांना वेळोवेळी वडिलकीच्या नात्याने मार्गदर्शन करणारे, प्रसंगी आमच्या पाठीशी खंबीर पणे उभे असणारे मा. श्री जनार्दन मानकर साहेब यांनी आपल्या ओजस्वी भाषणाने सर्वांना मार्गदर्शन केले. त्यानंतर शिवसेना सचिव मा. विनायकजी राऊत साहेब यांनी त्यांच्या वक्तशीर अशा भाषणात खूप महत्वाचे मुद्दे या सभेत मांडले “एक अदृश्य शक्ती आज दृश्य स्वरुपात शिवसेना भवनात अवतरली आहे. एकमेकांचे चेहरेहि न पाहता, शिवसेना प्रमुखांना प्रत्यक्ष न भेटता तुम्ही शिवसेनेचं काम एका निष्ठेने करत आहात, या दृष्टीने तुम्हीच खरे शिवसेना प्रमुखांचे खरे दूत आहात.” अशा शब्दात राऊत यांनी समस्त ऑर्कुट समुदायाशी निगडीत असलेल्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले. तसेच “रंग विकत घेता येतात पण त्या रंगातील लोकांची निष्ठा विकत नाही घेता येत!!” असा टोलाही त्यांनी हाणला. या अभूत पूर्व अशा सोहळ्याला भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष मा. अभिजित पानसे तसेच मुंबई महापलिका स्थायी समिती अध्यक्ष मा. राहुल शेवाळे यांची उपस्तिथी लाभली. मा. अभिजित पानसे तसेच मा. राहुले शेवाळे यांनी आपले मार्गदर्शनपर मते सर्वांसमोर मांडली. माणसाला जर ध्यास, आत्मविश्वास असेल तर त्याला वय, स्थल, काल या कुठल्याच गोष्टी बंधन कारक नसतात. याचे मूर्तिमंत उदाहरण असलेले तसेच परदेशात राहून इंटरनेटच्या माध्यमातून शिवसेनेचा प्रचार आणि प्रसार करणारे मा. सुनील मंत्रीची उपस्तिथी या कार्यक्रमाला लाभली. तसेच शिवसेने बद्दल त्यांना एवढ्या अपेक्षा तसेच प्रेम का आहे या विषयी त्यांनी मोजक्याच शब्दात मनोगत व्यक्त केले. सर्व उपस्थित मान्यवरांचे मार्गदर्शन झाल्यावर श्री अमोल नाईक यांनी या मेळाव्याला उपस्थित असणार्या सर्व मान्यवरांचे नम्रपणे आभार प्रदर्शन केले तसेच या मेळाव्याला प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष रित्या सहकार्य केलेल्या सर्व सहकारी, स्वयंसेवकांचे आभार मानायला श्री अमोल नाईक विसरले नाही. आभार प्रदर्शन प्रकट केल्यावर राष्ट्रगीताने या अभूत पूर्व अशा सोहळ्याची सांगता झाली.

या दिवशी मा. शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे तसेच तसेच आदित्य ठाकरे यांची उपस्तिथी लाभणार होती. पण काही अपरिहार्य कारणांमुळे ते या कार्यक्रमाला येऊ शकले नाही. त्यांच्या वतीने या मेळाव्याला महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून उपस्थित असलेल्या समस्त शिवसैनिकांची इथे आम्ही नम्रपणे क्षमा मागतो.

थोडिशी हितगुज

४४ वर्षा पूर्वी इंटरनेट या माध्यमाचा कुठेहि मागमूस नव्हता. पण तरीही तेंव्हाच्या मोगल काँग्रेसी दडपशाही विरुद्ध आवाज जर कोणी उठवला असेल तर तो म्हणजे हिंदुहृदय सम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांनीच. हजारोंच्या वरती त्यांनी सभा घेतल्या, उभा महाराष्ट्र त्यांनी पिजून काढला. लोकांच्या उरात मराठी बाण्याच्या, स्वाभिमानाच्या मशाली पेटवल्या आणि बघता बघता याच मशालींचा धगधगता भगवा वणवा तयार झाला आणि हाच वणवा आजतागायत जिवंत जळत आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो!!! जर इंटरनेट सारखे प्रभावी माध्यम उपलब्ध नसूनही जर मा. बाळासाहेब एवढा भव्य वणवा पेटवू शकतात तर आज हे इंटरनेट चे प्रभावी ब्रम्हास्त्र आपल्याकडे आहे, त्याचा सदुपयोग जर आपण केला तर ते आपल्यासाठी वरदान ठरू शकत पण त्याचा गैर उपयोग जर केला गेला तर तेच मध्यम आपला संहार करू शकत हे लक्षात असुद्या.

आई भवानी ची आन घेउनी गोंधळ घालूया
कास धरुनी माय मराठी हिंदू धर्म वाढवूया
आड आला परी कोणीही तरी तिथेच ठेचुया
शपथ आम्हाला शिवरायांची हि साद घालूया !!

आपला नम्र,

शिवसैनिक कौस्तुभ गुरव