Saturday, March 31, 2012

उद्धवजी आगे बढो,हम तुम्हारे साथ है


ठाण्यात कोन्ग्रेस आपल्याला सपोर्ट करणार हे ऐकून मला उद्धव साहेबांच्या राजकरणाबधल पुन्हा एकदा समाधान वाटल. खरे तर ठाण्यासाठी दादर ला जायची गरज न्हवती.३ जण आपण आधीच फोडले होते. तरी गेले तें गेले.असो.जेव्हा कल्याण डोंबिवलीत पेच निर्माण झाला तेव्हा मोठे साहेब बोलले कि मनसेने कोन्ग्रेस ला पाठींबा द्यावाच,येवू द्या एकदा लोकांसमोर तें.त्या मुळे दादरकर गप्प बसले.

मग इथे दादरचा टेकू घ्याची गरज न्हवती.पण घेतला.व आता जो आकंड तांडव दादरकरांचा चालू आहे तो कशामुळे? नाशिक मुळे कि standing चे अंडर standing जमल नाही म्हणून? जेवढे महाराष्ट्राला दादरकर बाबत माहिती त्यानुसार तें त्या त्या गावच त्या त्या गावापुरत ठेवतात.त्यांच वाक्य -"इथे पाठींबा दिला म्हणून दुसरीकडे द्यावा अस काही ठरलं नाहीये. "

म्हणजे खरी गेम हि.पण कारण पुढे करयचं नाशिकच.आणि काय नाशिक नशिक चालवाल आहे? आम्ही गप बसलो म्हणून तुम्ही आलात ना? आणि राष्ट्रवादी तटस्थ मग त्यांना हे राज्यसभेला मदत करणार.काहीही. तेवढे वाईट दिवस अजून पवार साहेबांचे आलेले नाहीत. तस काही न्हवत.खर हे कि त्यांना स्थायी हवी होती नाही मिळाली मग हे सगळ चालू केल.

पण आमचे उद्धव साहेब काय कच्या गोट्या नाही खेळले.त्यांनी एकाच वेळीस दादर,रेशीमबाग, बारामती सगळ्यांच्या गोट्या बाद केल्या.लय हौस आहे भारत जलाव पक्षाला आमचे चुलते एकत्र आण्याची.घ्या बसवून तुम्हीच उरावर.आम्हाला फरक नाही पडत.उद्धवजी मध्ये म्हणाले ज्यांनी दादरला आमच्या शिवसैनिकांच्या डोक्यात पहिल्या मजल्यावरून नारळ फेकले त्या शिव्सैनाकांची आठवण आहे आम्हाला अजूनही. त्यांच्याशी प्रतारणा आम्ही करणार नाही.

तेव्हा नाद करयचा नाही.सत्ता आम्ही कशी पण आणू.आम्हाला तात्विक गोष्टी शिकवू नयेत.पाठींबा कुणाचाही घेऊ.मराठी माणसासाठी काहीही. हा पण ती सत्ता राबवायला कमी पडलो तर मात्र आम्हाला खाली खेचायचा पूर्ण अधिकार जनतेला आहे दादरला किंवा बारामती ला नाही.

ता.क.स्थायी नाही तर परिवहन द्या. जो देईल तो माझा. मी सत्तेचा,सत्ता देणार्याचा.

अवांतर: मार्मिक वरून साहेबांचे सदर - टपल्या आणि टिचक्या

कर्नाटक पाठोपाठ गुजरात मध्ये भाजप आमदार ब्लू फिल्म बघताना आढळले.---बातमी
तरीच भाजप व मनसे च एवढ हल्ली जमतंय.मनसे कडे ब्लू प्रिंट(?) आहे आणि भाजप कडे ब्लू फिल्म