Thursday, August 18, 2011

अण्णा वर चार(च) ओळी

१)लोकसभेत प्रत्येक खासदाराला बिल मांडण्याचा अधिकार आहे.

२)ह्या बिलास विरोधी पक्ष तयार आहेत मग अण्णा म्हणतात ते बिल विरोधी पक्ष का मांडत नाही?कमळाबाई ने सांगाव आम्ही आणतो मागे घ्या उपोषण.

३)बर अण्णांचा सर्व पक्षाला विरोध असला तरी एकही लायक विश्वासू अपक्ष खासदार हे बिल मांडण्यास त्यांना मिळाला नाही का? जास्त दूर कशाला जायला हव.आपल्या महाराष्ट्रात राजू शेट्टी सारखे खासदार आहेत.जे जंतर मंतर वर पाठींबा द्यायला गेले हि होते.(इतर पक्षांच्या नेत्यांना मनाई होती)

४)त्यामुळे हि आंदोलनाची नसती उठाठेव थांबवा.

(जेवढी ह्या आंदोलांची पात्रता तेवढीच लेखणी झिजवली)
विशेष आभार:मा.शिवसेना नेते,खासदार श्री. संजय राउत साहेब.कार्यकारी संपादक -दैनिक सामना
ज्यांनी गेले ४ महिने वेळोवेळी रोख ठोक आणि सच्चाई ह्या सदरातून आम्हा सर्व सामान्य जनतेला समजेल अशा भाषेत अण्णा व दिल्लीच्या ठगांचा आततायीपणा समोर आणला

No comments:

Post a Comment