Monday, April 25, 2011
सत्य साई बाबा
हे काल दिनांक २४ एप्रिल रोजी वारले.गेले महिनाभर आजारी होते.त्यांच्याच ट्रस्ट च्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.सर्व अवयव निकामी झाल्याने त्यांचे निधन झाले.आंध्रात ४ दिवसाचा व कर्नाटकात २ दिवसाचा दुखावता जाहीर करण्यात आला. त्यामुळे पहा काय काय झाले. आशा भोसले ह्यांनी एक जावई शोध लावला म्हणे हा मृत्यू नाही तर समाधी आहे. सचिन ने वाढ दिवस साजरा केला नाही.आज त्याने साईंच्या पार्थिवाचे दर्शन कुटुंबासहित घेतले. जे नेते गेले तिथे ते सगळे सत्ताधारी पक्षाचे कसे काय? (अशोकरावांचा आधार गेला.पुनर्वसन होत नाही बहुतेक) तिकडे भक्तांची रीघ लागलीये. ह्या बाबांनी बरीच समाज उपयोगी कामे केली असे सांगितले जाते.आता ती कामे त्यांच्या ट्रस्ट च्या माध्यमातून केली गेली.ह्या ट्रस्ट मध्ये आर्थिक अनियमितता असल्याचे आरोप झाले.आंध्र सरकारची पाच सदस्यीय समिती पण ह्यासाठी गठीत केली होती पुढे त्याचे काय झाले? क्लीन चीट.कोन्ग्रेस कडे काही असो व नसो क्लीन चीट मात्र ढिगाने असतात. बाबांची भोंदुगिरी! सर्वज्ञानी असतानासुध्दा "सत्यनारायन राजू" (जे त्या मुलाचे नाव ठेवण्यात आले होते.) शाळेत जायला लागला. थोड्याच दिवसात त्याच्या अगाध लीलांचा अनुभव सर्वांना येऊ लागला. मुलांना तो त्याच्या जादूच्या शक्तीमुळे आवडू लागला तर शिक्षक त्याला घाबरु लागले. का ते माहीत नाही. १९४० साली तो जेव्हा १५ वर्षाचा झाला तेव्हा त्याच्या वेडावरच्या इलाजांना कंटाळून सत्यनारायण राजूने जगाला तो अवतार असल्याचे सांगितले आणि स्वत:ला सत्यसाईबाबा हे नाव घेतले. त्यांनी घोषणा केली "येशू, महंमद, बुध्द आणि इतर हे काही परमेश्वराचे अवतार नव्हते. त्यांच्याकडे फक्त काही दैवी शक्ती होत्या. मीच परमेश्वर आहे. माझी अगाध आहे आणि त्याला अंत नाही. ह्या पृथ्वीतलावर सत्य आणि प्रेमाने मानवता आणणे हे माझे काम आहे. २०२२ साली ह्या अवतारानंतर मी कर्नाटकमधील मंड्या जिल्ह्यात प्रेमसाई म्हणून जन्म घेणार आहे."(???)
बाबांचे चमत्कार :-
"चमत्कार ही माझी ओळख आहे" हे शिर्षक आहे हॅरॉल्डसन नावाच्या लेखकाने जे बाबांच्या चमत्कारांविषयी लिहिले आहे त्यातील एका प्रकरणाचे. बाबांनीच त्यांच्या एका मुलाखतीत हे वाक्य उच्चारले होते. थोड्याच दिवसात सत्यसाईबाबा त्यांच्या चमत्कारांमुळे जगभर प्रसिध्द झाले. त्या काळात मान्यता पावलेल्या एका मासिकात म्हणजे "रिडर्स डायजेस्ट" मधे त्याबद्दल लिहून आले होते. फक्त त्यात त्यांनी सत्यसाईबाबांना परमेश्वर म्हणायच्याऐवजी चुकून गुरु म्हटले होते. त्यांनी लिहिले होते "ते हवेतून सोन्याच्या अंगठ्या , नाणी काढतात. दगडाचे चॉकलेटमधे रुपांतर करतात. आजारी लोकांना विभूती देऊन बरे करतात. ही त्यांच्या हातात कुठून येते हे कोणालाही कळत नाही. सगळ्यात कहर झाला जेव्हा त्यांनी १९५० साली एका मुलाला ज्याचे शरीर कुजत चालले होते त्याला परत जिवंत केले तेव्हा. १९७१ साली डॉ. जॉन हिस्लॉप जो अमेरिकन साई फौंडेशनचा अध्यक्ष होता त्याने तर असे जाहीर केले की वॉल्टर कोवान – ज्याचा ह्रदय बंद पडून मृत्यू झाला होता, - त्याला बाबांनी परत जिवंत केले.
कै. सुरी भगवंतम जे इंडियन इन्स्टीट्यूटचे प्रमुख होते आणि भारत सरकारचे विज्ञान सल्लागार होते त्यांनीपण एक चमत्कार सांगितला आहे की एक दिवस बाबांनी एकदम हवेतून भगवतगीता काढून दाखवली. ह्या माणसांनीच बाबांना पुढे आणले असणार ह्यात शंकाच नाही. पुढे काय घडले असणार हे सूज्ञास सांगणे नलगे. त्यांच्या ह्या चमत्कारांच्या मालिका तरी बघा – एकदा पाण्यात त्यांचे बोट बुचकळ्यावर त्याचे पेट्रोल झाले, चिंचेच्या झाडावरुन त्यांनी आंबे काढले, एवढेच काय चीनच्या हल्ल्यात त्यांनीच चीनच्या सैन्याला पिटाळून लावले असे अनेक चमत्कार त्यांच्या पदरी आहेत. ते स्वत: असा दावा करतात की ते कधीच झोपत नाहीत. गंमत म्हणजे डॉ. सॅम्युएल सॅंडवाईज ह्यांना बाबांनी सांगितले की मीच परमेश्वर आहे आणि मी सर्वशक्तिमान आहे आणि मी सर्व ठिकाणी असतो तेव्हा त्यांचा त्यांच्यावर विश्वास बसला. मग त्यांना हिस्लॉप विचारतात सर्व जगाचा कारभार चालवण्याचे काम असल्यामुळे बाबांना आपल्याशी बोलायला कसे परवडते ? बाबा त्यांना खात्री देतात की ते सर्वत्र असतात परमेश्वराला कसली सीमा ?
हिस्लॉपचे ह्या उत्तराने म्हणे लागलीच समाधान झाले.
ह्या अशा वातावरणात श्री. अब्राहम कोवूर आणि श्री. डॉ. नरसिंहन ( बेंगलोर विद्यापीठाचे उपकुलगुरु ) ह्यांनी सत्यसाईबाबांच्या विरोधात त्यांचे पितळ उघडे पाडण्याची मोहीम मोठ्या धैर्याने चालवली. डॉ.कोवूर ह्यांनी त्यांनीच लिहिलेल्या "Begone Godmen" ह्या पुस्तकात डॉ. भगवंतम ह्यांनी वॄत्तपत्रात केलेल्या दाव्यासंदर्भात लिहिले आहे. हे भगवंतम बाबांच्या तेलगू ते इंग्रजीचे दुभाषी होते. त्यांनी एका वर्तमानपत्रात बाबांचा एक चमत्कार लिहिला. "जगप्रसिध्द सिको कंपनीचे प्रमुख पुट्टपर्थीला भेट द्यायला आले तेव्हा बाबांनी त्यांना एक घड्याळ हवेतून काढून त्याचा प्रसाद त्यांना दिला. ते घड्याळ बघितल्यावर त्यांनी लगेचच बाबांसमोर लोटांगण घातले आणि ते त्यांचे शिष्यत्व पत्करले. ते घड्याळ काही साधेसुधे नव्हते. ते एक असे घड्याळ होते की जे अजून बाजारात यायचे होते आणि ते त्यांनी त्यांच्या ऑफीसमधे कडीकुलपात ठेवले होते."
भगवंतम ह्या घटनेबाबत जास्त काही सांगायला तयार नव्हते म्हणून डॉ. कोवूरांनी सिकोच्या प्रमुखांशी म्हणजे श्री. हातोरी ह्यांच्याशी पत्रव्यवहार केला आणि त्यांना ह्या गोष्टीला दुजोरा द्यायला सांगितला. श्री. हातोरींनी जे उत्तर पाठवले ते असे – "आपल्या पत्रात ज्या माणसाबद्दल आपण लिहिले आहे त्या माणसाविषयी मला काहीच माहिती नाही. ह्या साईबाबा नावाच्या माणसाला ना मी ओळखत ना माझ्या कंपनीतील कोणी माणूस. ही बातमी अत्यंत खोटी आहे ह्याबद्दल आम्हाला खात्री आहे. हे उत्तर जेव्हा त्याच वर्तमानपत्रात प्रसिध्द झाले तेव्हा भगवंतमचे ताबूत थंडे झाले. ह्यावरुन ह्या बाबांनी आपला चमत्कार जनतेमधे पसरवण्यासाठी कोणाकोणाला हाताशी धरले होते आणि त्यासाठी कुठल्या मार्गाचा अवलंब केला होता हे समजून येईल.
जेव्हा डॉ. कोवूरांनी बाबांची एक सामान्य हातचलाखी दाखवणारा माणूस म्हणून जगाला ओळख करुन दिली तेव्हा खळबळ उडाली. त्यापेक्षाही भारताचा वैज्ञानिक सल्लागार हा असल्या माणसाचा हस्तक म्हणून काम करतो ह्या बातमीने आपल्या देशाची बदनामी झाली. ते नुकसान कधीही न भरुन येणारे आहे. नशिबाने डॉ. नरसिंहन यांनी एक १२ शास्त्रज्ञांची समिती नेमून सर्व असल्या फालतू बाबांचे पितळ उघडे पाडण्यासाठी त्यांना जाहीर आव्हान दिले. जेव्हा ह्या समितीच्या सदस्यांनी सत्यसाईबाबांची गाठ घ्यायचा प्रयत्न केला तेव्हा हा परमेश्वर त्याच्या बेंगलोरजवळील व्हाईटफिल्ड नावाच्या निवासस्थानी लपून बसला. तेथून त्याने फक्त ह्या समितीवर चिखलफेक केली.
रात्रीचा अवतार :
हा इज्जतीचा पंचनामा कमी होता की काय म्हणून १९७६ मधे त्यांच्यावर अजून एक बॉंब पडला. ताल ब्रुक नावाच्या एका लेखकाने त्याच्या बाबांच्या आश्रमातील १४ महिन्यांच्या वास्तव्यात काय पाहिले ह्याविषयी एक पुस्तक लिहिले. ह्या पुस्तकाच्या भारतातील सर्व प्रती एका रात्रीत खरेदी करुन नष्ट करण्यात आल्या. ह्या पुस्तकात बाबांच्या समलिंगी चंगळवादाच्या कहाण्यांचे आणि लहान मुलांच्या लैंगिक शोषणाचे वर्णन करण्यात आले आहे. पहिल्यांदा त्याचा ह्यावर विश्वास बसेना. परंतु अनेक कहाण्या समोर आल्यावर त्याचाही नाईलाज झाला. ह्या पुस्तकामुळे आणि बातमीमुळे जनतेत बाबांविषयी शंकेचे वातावरण पसरले. नाहीतर त्याचे प्रस्थ फारच पूर्वी वाढले असते.
लोकांच्या मनात मग विचार यायला लागले की
जर बाबा मेलेल्या माणसाला जिवंत करु शकतात तर त्यांच्या मेव्हण्याला रेबीजपासून का नाही वाचवू शकले ?
ते जर परमेश्वरच असतील तर ते त्यांच्या अपेंडिसायटीससाठी आणि हाड मोडलेल्या पाया साठी इस्पितळात का दाखल झाले ?
ते जर जनतेला साधेपणाचे धडे देतात तर स्वत: मर्सिडीसमधून का फिरतात ?
त्यांना स्वसंरक्षणासाठी सिक्युरिटी गार्डस् का लागतात ?
का त्यांना जादूगार पी. सी. सरकार ह्यांच्यापासून धोका होता ?
त्यांच्या आश्रमातून आलेल्या स्त्रियांच्या शवांवर अत्याचारांच्या खुणा शवविच्छेदनात सापडल्या असे डॉक्टरांनी का लिहून ठेवले आहे ?
परदेशी शिष्यांपैकी अनेकजण त्यांची संपत्ती बाबांच्या संस्थानाच्या नावावर करुन अदृष्य का झाले ?
बाबांचे निवासस्थान “प्रशांतीनिलयम” हे गुंडांचे आश्रयस्थान आहे का ?
तसे नसेल तर आपल्या गृहमंत्र्यांच्या भेटीच्या अगोदर जेव्हा ह्या इमारतीची तपासणी करण्यात आली तेव्हा त्यात सायनाईड, आणि आर डी एक्स का सापडले ?
हे सगळे प्रश्न अनुत्तरीत आहेत. कृष्णकृत्ये आणि कर्म : शयनगृहातील हत्याकांड
सगळ्यात भयंकर नामुष्की ओढवली ती ६ जून १९९३ रोजी “प्रशांती निलयम” च्या सहा रहिवाशांचा खून बाबांच्या शयनगृहात झाला तेव्हा. त्यातील दोन मारेकऱ्यांनी केले आणि चार पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू पावले. हे लक्षात घेण्यासारखे आहे की ह्या चार मारेकर्याकडे फक्त सुरे होते आणि पोलिसांकडे बंदुका. जिवाच्या भितीने आपले परमेश्वर त्या खोलीतून खिडकीतून उडी टाकून पळाले आणि त्यांनी कोणालाच माहीत नसलेला एक अलार्म वाजवला. तुम्हाला आश्चर्य वाटेल जे लोक मेले ते सर्व बाबांचे लाडके शिष्यगण होते. त्यात ज्याने तो रत्न हार बाबांना हात चलाखीने दिला तोही होता. बाबांनी नंतर राखीपौर्णिमेच्या दिवशी ह्या सगळ्या भानगडी वर भाष्य केले “जन्म आणि मृत्यू हे एकत्रच प्रवास करत असतात. मृत्यू ही एक नैसर्गिक घटना आहे आणि म्हणून त्याच्याबद्दल काळजी करणे व्यर्थ आहे. तुमच्या लक्षात आले असेल की स्वामींचा मृत्यू हा त्यांच्याच हातात आहे. मला वाटेल तेवढे मी जगू शकतो कारण परमेश्वर माझ्या इच्छेच्या विरुद्ध वागू शकत नाही. त्यामुळे काही मूर्ख लोक हा प्रश्न विचारतात की परमेश्वरानेंच हे का नाही केले, ते का नाही केले.” ...पोलिसांचा पंचनामा दोनदा बदलण्यात आला. पहिल्यांदा तो बाबांच्या खुनाचा प्रयत्न म्हणून करण्यात आला. नंतर तो आश्रमातील भांडणे असा करण्यात आ.ला. सर्व राजकीय शिष्टाचार बाजूला ठेवून रहस्यमय रित्या भारताच्या राष्ट्रपतींनी असे प्रतिपादन केले की हे सगळी भानगड एका मुलीच्या संबंधातील आहे. हे राष्ट्रपती होते श्री. शंकरदयाल शर्मा. आपल्याला आठवत असेल यांनीच त्यांच्या घरातील गालिच्यासाठी ६० लाख रुपयांची मागणी केली होती. जेव्हा गृहमंत्र्यांना (श्री. शंकरराव चव्हाण ) विचारण्यात आले की ज्यांच्या शयनगृहात ह्या हत्या झाल्या त्यांचा जबाब का नोंदवला गेला नाही ? ह्याचे उत्तर आपल्या गृहमंत्र्यांनी फारच विनोदी दिले. ते म्हणाले की त्यावेळेस बाबा तेथे हजर नव्हते, एक गोष्ट आपल्या लक्षात आणून देणे आवश्यक आहे ती म्हणजे हे प्रतिपादन करण्याअगोदर आपले गृहमंत्री दोनदा बाबांच्या भेटीस जाऊन आले होते. अशारितीने ही चौकशी दडपण्यात आली. आश्चर्य म्हणजे ह्या सगळ्या प्रकरणानंतर आश्रमांनी कुठल्याही प्रकारची पोलिसांमधे आजपर्यंत तक्रार नोंदवली नाही. बाबांच्या दुर्दैवाने बी. प्रेमानंद यांनी हा पोलिसांचा तपास अस्विकारार्ह आहे असे सांगून सरकारवर पुरावे नष्ट केल्याचा न्यायालयात दावा लावला. ह्याच ग्रुहस्थांनी जेव्हा सोन्यावर सरकारी बंधने होती त्या काळात बाबांना न्यायालयात खेचले होते. त्यात त्यांनी बाबांवर असा अरोप केला होता की बाबा सोन्याचे दागिने तयार करुन “सुवर्ण नियंत्रण कायद्या”चा भंग करत आहेत. कारण त्यावेळेस जास्त सोने बाळगायला बंदी होती. हा आरोप फेटाळताना तव्हाचे न्यायधीश अंजनवेलू यांनी असा निर्णय दिला की दैवी शक्तीने निर्माण केलेले सोने हे तयार केले असे म्हणता येणार नाही. हे न्यायाधीश बाबांचे निकटचे शिष्य होते हे सांगायला नकोच.
मूत्र पिंडाची हकीकत:
मराठी साप्ताहिकाच्या १९ जानेवारी १९९६ च्या अंकात एक धक्कादायक बातमी छापून आली. त्यात सत्यसाईबाबा इन्स्टीट्यूट ऑफ हायर मेडिकल सायन्सेस या संस्थेबद्दलची एक बातमी छापून आली. ही संस्था बाबांच्या कृपेने २० कोटी रुपये खर्चून उभी झाली होती आणि गरीब जनतेत ती लोकप्रिय होती कारण ह्यात सर्व उपचार फुकट केले जायचे. याच संस्थेमध्ये मराठवाड्यातील त्रिंबक करवंदे नावाच्या एका गरीब शेतकर्याला त्याच्या मुलाचे मूत्रपिंड बसवण्यात येणार होते. शस्त्रक्रिया झाल्यानंतर एका आठवड्यानंतर मरायला टेकलेल्या त्रिंबकला सांगण्यात आले की शस्त्रक्रिया असफल झाली आहे. त्यांना परत त्यांच्या गावी पाठवण्यात आले. महाराष्ट्रात परत आल्यावर “Maharashtra Inst. Of Medical Sc.” मधे त्याचा “CT Scan” करण्यात आला तेव्हा असे आढळून आले की बिचर्या त्रिंबकची मूत्रपिंडाची शस्त्रक्रियाच झाली नव्हती. पण बालाजीचे मूत्रपिंड मात्र काढण्यात आले होते.
मग बालाजीचे मूत्रपिंड गेले कुठे ?
मी ९६ वर्ष जगणार आहे असे बाबा बोलायचे.त्याच्या आधीच गेले ते.मग जर तुम्ही (त्यांचे भक्त) त्यांची वाक्य खरी मानता तर त्याचं स्वतःच वाक्य खोट ठरलं ना? चमत्कार करून दाखवायचे. कुठे गेली ती कला? ती स्वताला वाचवायच्या कामी का आली नाही? १९४० ला ते म्हणाले कि मी साई बाबा आहे.महाराष्ट्रात असा कोणता संत होता जो स्वतःला मी अमुक संत-देव आहे त्याचा अवतार आहे असे म्हणाला? साई बाबा गजानन महाराज ह्यांनी समाधी घेतली.ते काही रुग्णालयात गेले नाहीत. त्यांनी वेगवेगळ्या रुपात भक्तांना दर्शन दिले.त्यांचे आजार बरे केले.त्यासाठी त्यांना सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल काढावे नाही लागले. महाराष्ट्राला संतांची परंपरा आहे पण कमर्शियल हेतूने संत महाराष्ट्रात कधीच झाले नाहीत.आजही जे आहेत ते नंरेन्द्र महाराज ह्यांनी हजारो लोकांना पुन्हा हिंदू धर्मात आणले,हि खरी संत परंपरा आहे.हवेतून अंगठ्या काढून दाखवणे व पेट्रोल बनवणे हि काही संतांची कामे नाहीत हा शुध्द चू गिरीचा धंदा आहे.संतानी त्यांच्या मर्यादेत राहावे.अध्यात्माचे मार्ग दाखवावे.पण मीच देव आहे.मी अमुक देवाचा अवतार आहे असे सांगू नये.तसे महाराष्ट्रात ह्या आधी कोणी सांगितले नाही.जर कोणाला शंका आली त्यांना थेट त्याच रुपात दर्शन दिले.पण हल्लीच्या काळात मी देव आहे सांगणे हा चू गिरीचा धंदा आहे
सत्य साई बाबा जगात महान जादुगार म्हणून नक्कीच ओळखले जातील पण देव अवतार म्हणून देव अवतार या संकल्पनेचा अपमान तरी करू नका..............
Subscribe to:
Post Comments (Atom)
atishay upyukt ani changali mahiti.....ya bhondu sadhuchya bhaktanchya dolyat anjan ghalnara lekh..sundar..apratim.
ReplyDeletegood work my bro .
ReplyDelete