Saturday, April 9, 2011

आम्ही आमच्या आधीच्या जुन्या लेखात पण अण्णा हजारेंची आंदोलने संशयास्पद असल्याचे म्हणाले होते.

परवा पासून पाहतोय आण्णा ह्यांना मिळणारा पाठींबा,त्यात आमच्या दैवताने-शिवसेना प्रमुखांनी त्यांना दिलेला पाठींबा ह्या पार्श्वभूमीवर आम्ही गोंधळून गेलो होतो.अरे आपण चुकत होतो कि काय? पण आज खरे रूप समोर आले.शांती भूषण सारखी संशयास्पद व्यक्ती ह्या समिती मध्ये असणार आहे.
आणि हुश्श.आम्ही वाचलो फार मोठ्या वैचारिक गोंधळामध्ये सापडलो होतो तुम्ही पण सापडू नका.खालील लेख वाचा.आणि जागे व्हा!जागे व्हा!!जागे व्हा!!!

मुंबई बॉम्ब स्फोटातील २ आरोपींचे वकील म्हणून काम करणारे शांती भूषण मसुदा समितीवर..

अहाहा!!!

जिंकले अण्णा!!! आह अण्णा...वाह अण्णा !!!! जिंकला इंडिया !!!! जंतरमंतर

झाले !!!! संपले सगळे घोटाळे !!आता गल्ली पासून दिल्लीपर्यंत कोणत्याच

कामासाठी पैसे मोजावे लागणार नाहीत !!!! अण्णा खुश ....अण्णाचे भक्त गणंग

खुश !!!!

अहो पण हे काय ? अण्णांनी सुचविल्या प्रमाणे मसुदा समितीवर

सहअध्यक्ष म्हणून शांती भूषण विराजमान झाले आहेत !!

कोण आहेत हे शांती

भूषण?

१९९३ च्या मुंबई बॉम्ब स्फोटातील २ आरोपींचे वकील म्हणून काम करणारे

शांती भूषण..अहो इतकेच काय या शांती भूषण साहेबांनी २००१ साली संसद

हल्ल्यातील आरोपी शौकत हुसेन गुरूला झालेल्या १० वर्षांच्या शीक्षेविरुद्ध

चक्क अपील केले होते ...अनेक घोटाळ्यांचे आरोप या शांती भूषण साहेबांवर

आहेत !!! आह अण्णा...वाह अण्णा !!!! काय म्हणत असतील मुंबई बॉम्ब

स्फोटातील मृतात्मे ?

शांति भूषण यानी राज नारायण यांच्या वतीने इंदिरा गांधींच्या विरुद्ध खटला जिंकला होता तेंव्हा जगमोहन लाल सिन्हा हे जज होते!

२००२ मध्ये यानी अरुंधती रॉयच्या वतीने सरकार विरुद्ध दावा दाखल केला होता .

बेंगलोर म्हैसूर इन्फ्रा स्ट्रक्चर स्कम मध्ये देवेगौडा यांच्या वतीने ते कोर्टात कौन्सेलर म्हणून होते !!!

थोडेसे लोकपाल बिलासंदर्भात-

नव्या लोकपालाने जर एखाद्यास भ्रष्ट ठरवले तर त्याला न्यायालयातही दाद मागण्याचा अधिकार राहणार नाही. वाटेल त्याची चौकशी करण्याचा अधिकार या लोकपाल यंत्रणेस असेल. अशा चौकशीस नकार देण्याचा अधिकार मात्र इतरांना नसेल. लोकपालास स्वत:हून वाटेल त्याची भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली चौकशी करता येऊ शकेल, त्यासाठी कोणाच्या तक्रारीची गरज नाही. या साऱ्या मागण्यांचा अर्थ इतकाच की जन लोकपालाद्वारे अमर्याद अधिकार असलेली अगडबंब यंत्रणा अस्तित्वात येईल आणि तिच्यावर कोणाचेही नियंत्रण नसेल. असलेच तर ते जनतेचे असेल. आता जनतेचे म्हणजे कोणाचे ? तर काही निवृत्त न्यायाधीश, समाजसेवक वगैरे मंडळी ही लोकपाल यंत्रणा चालवतील. पण ही मंडळी भ्रष्ट होऊ किंवा असू शकत नाहीत काय? त्यातही परत अण्णांची अट अशी की या यंत्रणेत दोन मॅगसेसे पुरस्कार विजेते असतील. याच्यासारखा दुसरा बालिशपणा नाही. मॅगसेसेच काय नोबेल मिळालेल्यांना सुध्दा पुढील आयुष्यात भ्रष्टाचाराचा मोह हेऊ शकतो आणि अमर्याद, अनंत कालासाठी जर अशा माणसांकडे सत्ता, अधिकार राहिली तर त्याच्या गैरवापराचे पातक त्यांच्याकडूनही होऊ शकते. बांगला देशात नोबेल विजेते महंमद यूनुस यांची जी घसरण सुरू आहे, त्याने हे दाखवून दिलेच आहे. या शिवाय अण्णा पुरस्कृत जनलोकपाल विधेयकाची अतिधोकादायक बाब म्हणजे त्यातून जन्माला येणाऱ्या लोकपालास अधिकारांचे, कायद्याचे कसलेही बंधन नसेल. म्हणजे एखादे सरकारी धोरण भ्रष्टाचारी ठरवायचा अधिकार अण्णा पुरस्कृत लोकपालास मिळेल आणि त्याच्या दृष्टीने हे कथित भ्रष्टाचारी धोरण रद्दबादलही करता येईल. एखाद्या खात्यासाठी केलेली तरतूद ही अनावश्यक ठरवायचा अधिकारसुध्दा अण्णा पुरस्कृत लोकपालास राहील. म्हणजे सरकारी धोरण आणि भ्रष्टाचाराची कृती यात फरक करण्याची किमान आवश्यकतासुध्दा या नव्या लोकपालास आवश्यक ठरणार नाही. याच्याइतके धोकादायक दुसरे काही नाही. अशी जर महाशक्तिशाली यंत्रणा जन्माला घालायची असेल तर मग संसदेची आवश्यकताच काय ? अर्निबध अधिकारांतून अर्निबध भ्रष्टाचार जन्माला येतो हे इतिहासाने वारंवार दाखवून दिलेले आहे . असे अधिकार ही हुकुमशाहीची सुरूवात असते. अण्णांना अशी हुकुमशाही हवी आहे काय? निवडून आलेले, सरकार चालवणारे सर्व नालायक आणि मी तेवढा योग्य अशा प्रकारच्या भूमिकेस टाळय़ा पडतात. पण त्यामुळे व्यवस्था चालू शकत नाहीत

अहाहा!!! जिंकले अण्णा!!! आह अण्णा...वाह अण्णा !!!!

अण्णाचे भक्त गणंग खुश !!!!

मुंबई बॉम्बस्फोटातील मृतात्म्यांनी मात्र शरमेने खाली मान घातली ...पण पर्वा कुणाला

? जिंकले अण्णा !!! हजारो कोटींचा जुगार चाललेला आयपीएलचे सामने पाहत आपण

जल्लोष साजरा करू या !!!! अण्णा बेस्ट इवेन्ट मनेजर आहेत ...आता विधानसभा,

लोकसभा,सर्वोच्च न्यायालये टाका बंद करून ....निवडणुका गेल्या चुलीत !!!

द्या सारा कारभार अण्णाच्या हातात ......चला चला घाई करा...व्हा परत एकदा

क्षणिक भावनांवर स्वार!! बिचारे मुंबई बॉम्ब स्फोटातील मृतात्मे

............आह अण्णा...वाह अण्णा !!!!

घ्या अजून बोडक्यावर बसवून.पाद्य पूजा करा



No comments:

Post a Comment