Wednesday, February 2, 2011

शिवसेना काल आज आणि उद्या.


महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईत मराठी जनतेच्या
इच्छाआकांक्षांना मूर्तस्वरूप देण्यासाठी जन्म पावलेल्या शिवसेनेची राजकीय
हत्या करण्याचा विचार महाराष्ट्रातल्या बहुतेक राजकीय पक्षांच्या मनात
शिवसेनेच्या जन्मापासून होता. पण जनतेच्या बळावर व बाळासाहेब ठाकरे यांच्या
खंबीर नेतृत्वामुळे शिवसेना उभी आहे व याच शिवसेनेने सामान्यातल्या
सामान्य माणसाला वैभवाने दिवस दाखवले. ज्यांना हे वैभवाचे दिवस सर्वाधिक
दिसले त्यांनीच शिवसेना सोडली. शिवसैनिक व मराठी माणूस शिवसेनेबरोबरच आहे.
शिवसेनेचे एकत्रीकरण करणे असे ज्या चळवळ्यांना वाटते. त्यांनी काही
प्रश्नांची उत्तरे द्यावीत.

१) शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी
माणसाच्या कल्याणासाठीच शिवसेनेची स्थापना केली. शिवसेना मराठी माणसापासून
दूर गेली. मराठी माणसाचे नुकसान शिवसेनेने केल्याचे एकतरी उदाहरण समोर आहे
काय?

२) शिवसेनेचे फक्त मराठी मराठी केले तेव्हा शिवसेना
मुंबई-ठाणे महानगरपालिकेच्या पुढे सरकली नाही. मराठी माणूस अठरापगढ जातीतच
विखुरलेला राहिला. शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्वाची गर्जना करताच जातीभेद
विसरून सर्व मराठी एक झाले व महाराष्ट्राची सत्ता, दिल्लीचे तख्तही
शिवसेनेला काबीज करता आहे. हिंदुत्वाची गर्जना करीत मिळवलेल्या सत्तेमुळे
महाराष्ट्रात कल्याण झाले ते ‘मराठी’ माणसाचेच ना?

३) शिवसेना ‘मराठी’पासून दूर गेल्याची टीका करीत जे बाहेर
पडले त्यांनी एक लक्षात घेतले पाहिजे. हिंदुत्वामुळे मिळालेल्या सत्तेमुळेच
त्या सगळ्यांची भरभराट झाली. आर्थिक स्थिती सुधारली. कोट्यवधी रुपयांच्या
जमिनीचे व्यवहार त्यांना करता आले. ‘हिंदुत्व’ यशस्वी झाले नसते तरया
सगळ्यांचे उद्योग, व्यापार शिखरावर गेले असते काय?

४) नारायण राणे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले ते हिंदुत्वाने दिलेल्या सत्तेमुळेच. हे सत्य नाही काह?

५) मुंबईची वाटा कॉंग्रेसच्या महाराष्ट्रद्वेष्ट्या धोरणांनी
लावली. मुंबईवरील लोंढे व बांगलदेशांचे आक्रमण हाच खरा धोका आहे.
शिवसेनेतून काही नेते बाहेर पडून कॉंग्रेस पक्षात गेल्याने हे लोंढे थांबले
काय? ‘मनसे’सारख्या पक्षांनी दोन रिक्षावाले व टॅक्सीवाल्यांना मारल्याने
मराठीजनांचे सर्व प्रश्न मार्गी लागले काय? मराठीची लढाई अखंड आहे. ती
कधीही न संपणारी लढाई शिवसेना सदैव लढत आहे हे खरे नाही काय?

६) महाष्ट्रात शिवसेनेचे खच्चीकरण करून देशातील हिंदुत्वाची
मान पिळायची हे कारस्थान आहे व त्यासाठी कोणतीही किंमत मोजण्याची तयारी
कॉंग्रेससारख्या पक्षाची आहे. देशविरोधी शक्तींना भीती शिवसेनेचीच आहे.
शिवसेना मजबूत राहिली तर धर्मांध, राष्ट्रद्रोही शक्तींना हिंदुस्थानात
डोके वर काढता येणार नाही. त्यामुळे शिवसेनाच फोडायची सध्या ते घडताना दिसत
नाही काय?

७) कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत ज्यांची पूजा होते असे
एकमेव हिंदू नेते फक्त शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे व ते ‘मराठी’
आहेत याचा अभिमन बाळगायचा नाही काय?

८) अमरनाथ यातेकरूवर हल्ले होताच अतिरेक्यांना जशास तसे-(तेव्हा बाळासाहेबांनी गर्जना केली कि जर अमरनाथ यात्रेकरूना धोका झाला तर मुंबईतून एकही यात्रेकरू हजला जावून देणार नाही.)
उत्तर देऊन यात्रा सुरळीत पार पाडणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. आता
कश्मीरातील हिंदूंच्या अमरनाथ यात्रेवर जबर करवाढ केली व अमरनाथ यात्रेचे
दिवस कमी करावेत अशी मागणी फुटीरवादी कश्मीरी पुढाऱ्यांनी केली. हिंदुत्व
कमजोर पडत असल्याचे हे लक्षण नाही काय?

९) राज ठाकरे यांच्यासाठी कुराणाचे भाषांतर ‘मराठी’त झाले व
मुसलमानांनी हे मराठी कुराण त्यांना भेट दिले. एका बाजूला हिंदूंच्या
यात्रांवर कारवाई होत असताना मराठी मुसलमानांना हज यात्रेसाठी जादा अनुदान
मिळाले यासाठी राज ठाकरे यांच्या पक्षाने आंदोलन केले. अशा पक्षाचे
शिवसेनेत विलीन व्हावे असे करंच कुणाला वाटते काय?

१०) शिवसेनेने मराठी माणसांचे अहित चिंतले नाही व मराठी
माणसांच्या कल्याणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी सतत खस्ता खाल्ल्या. शिवसेना
सोडून वेगळा पक्ष काढणाऱ्यांनी हा विचार कधी केला काय? उद्धव ठाकरे
यांच्या नेतृत्त्वाचा व कार्यपद्धतीचा विषय उकरून काढला व बाहेर पडण्याचे
कारन शोधले. त्यात काही अतिशययोक्ती आहे काय?

११) संपूर्ण विदर्भात कॉंग्रसने शेतकऱ्यांच्या जीवनाचे
स्मशान केले. हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्या आत्माहत्याग्रस्त
शेतकऱ्यांच्या कुंटुबीयांना आधार देण्यासाठी सावकारी पाशातून त्यांची
मुक्तता व्हावी. त्यांचे कर्ज माफ व्हावे यासाठी उद्धव ठाकरे यांनी
विदर्भासह महाराष्ट्रात अक्षरशः रान उठविले, झंझावती दौरे केले. हे सर्व
शेतकरी बांधव मराठी नव्हते काय?

No comments:

Post a Comment