Sunday, September 21, 2014

शिवसेना-भाजप युती

काही नवीन उत्साही कार्यकर्ते युती अगोदर भाजप किती ताकदवर होती हे सिद्ध करताना ७८-८६ काळातले आकडे फेकत आहेत.जनसंघाने शिवसेनेला पहिला पाठींबा १९६७ साली पोटनिवडणूकीसाठी दिला. १९७१ सालच्या शिवाजी पार्कच्या दसरा मेळाव्यात जनसंघाचे बलराज मधोक उपस्थित होते अधुन मधून जनसंघी शिवसेनेच्या कार्यक्रमाला येत. ७१ च्या लोकसभा निवडणुकीत वायव्य मुंबईच्या जागेवरून जनसंघ-शिवसेना युती फिस्कटली होती. शिवसेनेच्या हिंदुत्वाने लॉस होतो असा मतप्रवाह होता. अरे बाळानो ७८ ते ८६ जनसंघ व नंतर भाजप हे शरद पवार ह्यांच्या पुलोद प्रयोगात होते. सो त्यांची स्वताची ताकद किती व पवार पॉवर किती हे अनुत्तरीतच राहणार. नुसते एवढेच नाही तर भाजप तेव्हा गांधीवादी समाजवाद ह्या विचारावर आधारित होता. रामजन्मभूमी वैगेरे विषय न्हवतेच तेव्हा.

मग पार्ल्याच्या ८७च्या निवडणुकीत भाजपवाले गांधीवादी समाजवादाचा राग आळवत होते. आणि त्यांनी जनता दलाच्या प्राणलाल व्होराना पाठींबा दिला. परिणाम शिवसेनेचे रमेश प्रभू विजयी.कॉंग्रेसचे कुंटे पराभूत तर व्होरा तिसर्या स्थानी फेकले गेले . आणि ह्या निवडणुकीत अवतरले कोण तर सय्यद शहाबुद्दीन. सय्यद शहाबुद्दीनच्या येण्याने कट्टर हिंदुत्ववादी गट सतर्क झाला आणि हा गांधीवादी समाजवादाचा बुरखा परवडणार नाही तेलही जायचे आणि तूपही हे जाणले. मग आले आमच्याकडे युती करा युती करा करत. आम्ही न्हवतो आलो कधी तुमच्या दारात.

अधिक माहिती- शिवसेना १९६७ साली कल्याणच्या दुर्गाडी किल्ला आंदोलन व १९७० च्या महाडच्या महिकावती प्रकरणापासून हिंदुत्ववादी आहे. आणि किती कट्टर त्याची झलक बघायची असल्यास कल्याणच्या दुर्गाडी प्रकरणातली हि काही स्टेटमेंट बघा.
१) शिवसेना पाकी मुस्लिमांना हाकलून देईन. - मनोहर जोशी
२) मी जमावबंदी तोडून स्वतः भगवा फडकावेल.-साहेब
३) कृष्णराव धुळूप शेकापचे कल्याणचे आमदार आणि विरोधी पक्षनेते होते.
साहेब म्हणाले- कल्याणातील ६ हजार मुस्लिम मतांसाठी धुळप स्वताच्या आईला विकायला पण कमी करणार नाही.

No comments:

Post a Comment