Wednesday, January 12, 2011

शिवसेना-एक नजर


र्याच लोकांना हल्ली स्वप्न पडत असतात कि शिवसेना संपली.काल एक पावटा आमच्यातून गेला मग हि मळमळ अजून बहरून येते.त्या पावस्काराना काय कमी केल होत?विधान परिषदेवर आमदार केल होत.४ वर्ष आमदारकी बाकी होती तरी सोडून गेला? का गेला हे आम्हाला ह्या पीत पत्रकारांकडून समजले.म्हणे त्यांच्या कामगार सेनेत त्यांचे पंख छाटत होते.
आता आमदारांचे नुकतेच पगार वाढले.सोयी सवलती तर चिकार असतात तरी पण हे सोडून जातात का तर म्हणे कामगार सेनेत वर्चस्व कमी केल होत. म्हणजे पहा जेवढ्या थैल्या कामगार सेनेत ह्याने कमावल्या तेवढा पैसा आमदारकी मध्ये नाही असा अर्थ काढू का आम्ही?

राज ह्यांनी सोबत नेलेली विद्यार्थी सेना! एक बागुलबुवा

राज साहेब बाहेर पडले ते विद्यार्थी सेना सगळी सोबत घेवून हे तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलं.विद्यार्थी सेना संपली अशी ओरड सर्व पत्रकार ओरडत होते. बरोबर ना?
फरक पडला. नाही पडला असे नाही.नंतरच्या सिनेट निवडणुकीत आम्ही ३ जागांवर घसरलो. एकूण जागा असतात १०.
पण आज आदित्य व अभिजित पानसे ह्यांच्या नेतृत्वात ३ च्या ८ जागा झाल्या हे लक्षात घ्या.

मिडिया ने ह्याला प्रसिद्धी दिली ती उलट कि आदित्यचे केवळ नाव आहे सगळी रणनीती जुन्या लोकांनी आखली.हो ना मान्य आहे आदित्य ने काय किंवा प्रबोधनकार ह्यांच्या पासून कोणाही ठाकर्यांनी कधीच यश आपले मानले नाही कायम सामान्य सैनिकाच यश आहे असे म्हणाले.
पण हीच मिडिया अशी बातमी का देत नाही राज ह्यांच्याबरोबर बाहेर पडलेली विद्यार्थी सेना सावरायला शिवसेना यशस्वी.का देत नाही?कारण उघड आहे आम्ही पाकीट देत नाही.मग कोणीतरी पावटे उठतात आमच दुकान एक एक खाली होतंय शटर बंद होणार अशी स्वाभिमानी बांग देतात पण त्या स्वाभिमान ची टपरी सिनेट मध्ये फुटली हे हि मिडिया ठळक पणे का सांगत नाही.
शिवसेनेचे ४५ आमदार आहेत.११ लोकसभा खासदार आहेत.मुंबई,ठाणे,कल्याण-डोंबिवली,संभाजीनगर,नाशिक,येथे महापौर आहेत.नागपूर मध्ये उप महापौर आहेत.हे सर्वांनाच माहिती आहे.आता पुढे जी माहिती देतो ती फार कमी लोकांना माहिती आहे.

शिवसेना महाराष्ट्राबाहेर!


शिवसेना हि केरळ मध्ये समाजकारण करीत आहे.त्याची हि लिंक.
http://shivsena-kerala.org/history.htm

इतर राज्याचे बोलायचे म्हणजे गुजरात,गोवा, मध्य प्रदेश,छत्तीसगढ,दिल्ली येथे शिवसेना हिंदू संघटना म्हणून ताकद ठेवून आहे.
वाराणसी(उत्तर प्रदेश) मध्ये वाटर चित्रपटाच्या निदर्शनात शिवसेनाच पुढे होती.
मोहाली(पंजाब) व दिल्ली ची खेळ पट्टी शिवसैनिकांनीच उखडली.
कर्नाटक च्या श्रीराम सेनेचा अध्यक्ष हा शिवसेनेत होता.आज जी झुंड शाही तो करतोय त्याचे ट्रेनिंग त्याने शिवसेनेकडूनच घेतलं. त्याने बेळगाव प्रश्नी कर्नाटक ची तळी उचलली म्हणून साहेबांनी त्याची हकालपट्टी केली.
नेपाळात माववाद्याना उत्तर द्यायला शिवसेनाच पुढे आहे.हे त्या चित्रावरून दिसतच आहे.
दिल्लीत आमदारकीला आमच्या उमेदवार साध्वी विजया समल ह्यांना दुसर्या क्रमांकाची मते होती.
हिमाचल प्रदेश भाजप प्रवक्ते मध्ये बोंब मारत होते कि विधानसभेला शिवसेनेने उमेदवार उभे करून सत्ता घालवली.दोन -चार जागा द्यायला हव्या होत्या थोड नुकसान वाचल असत.
कर्नाटक मध्ये पण शिवसेना राजकीय दृष्ट्या nusence का काय म्हणतात ती value ठेवून आहे.
भोपाल,जबलपूर (मध्य प्रदेश) महापालिकेत आमचे नगरसेवक आहेत.

शिवसेना संपली असे दिवास्वप्न कोणी हि पाहू नये, आम्ही का संपणार नाही?

>>>>>>>>>>>>>>>.
१)कारण आम्ही बँका बुडवत नाही.
२)आम्ही साखर कारखाने आजारी दाखवून प्याकेज मागत नाही.
३)आम्ही अजून अमुक अमुक दिवस अमुक जिन्नस मिळणे मुश्कील सांगून काळाबाजाराला प्रोत्साहन देत नाही.
४)कमुनिस्त व समाजवादी ह्यांना कधीच कामगार ह्या पलीकडे दृष्टी न्हवती.कथित अन्यायावर ते लढत होते.म्हणून ते संपले.
आम्ही कायमच समाजकारण केले.
५)मराठी आमचा श्वास आहे हिंदुत्व आमचा प्राण आहे.आमची हि दोन तत्व हजारो वर्ष आक्रमकांना तोंड देत उभी आहेत.व ती आता आमच्या हातात सुरक्षितआहेत.

शिवसेना काल आज आणि उद्या हे शिवसेना नेते खासदार डॉक्टर मनोहर जोशींचे पुस्तक वाचा.ह्या पुस्तकावर त्यांनी डोक्तारेत मिळवली,त्यात अजूनही मुद्दे मिळतील.
लेखन सीमा! जय महाराष्ट्र!

No comments:

Post a Comment