Monday, June 23, 2014

शिवसैनिक असल्याचे सार्थक झाले!- एक चांगला अनुभव!

आज सांयकाळी बदलापूर पूर्वेत मी आपल्या घराकडे निघालो होतो. दुचाकीवर होतो. नवरत्न हॉटेल पासून कात्रपकडे जात होतो. रस्त्याने समोरून एक बाई धावत आली.साधारण चाळीशीची असावी.निळ्या रंगांचा पंजाबी ड्रेस,गळ्यात पर्स,हातात पिशवी.  गाडी स्लो होती.तिने हात लाऊन मला थांबवले. " मला जरा सोडा,माझ्या आईला छातीत दुखायला लागले आहे. माझी प्लीज मदत करा " मी म्हंटल," बसा.कुठे जायचे आहे?" ती म्हणाली,"बँक ऑफ बडोदा बिल्डींग."  मी चाललो होतो त्याच्या विरुद्ध दिशेला होते ते ठिकाण.मी गाडी फिरवली आणि ती बसली. 

आम्ही निघालो. ती सांगू लागली,"मी कामावरून घरी जाताना अचानक आईचा मला फोन आला. तिने छातीत दुखू लागल्याच सांगितलं. मला प्लीज मदत करा आणि वर घरीही या. कदाचित आपल्याला तिला खाली आणून admit कराव लागेल."
मी ठीक आहे म्हंटल आणि घरात काही औषधे आहेत का विचारलं. पण त्या बाईला काही सुचतच न्हवत. मग मी धीर देत म्हणालो बदलापूर मधले चांगली  दोन विख्यात हॉस्पिटल तेथून अगदी लागूनच आहेत काळजी करू नका.आपण करू. सर्व नीट होईल.त्या बाईला जरा बर वाटल.

मग आम्ही तिथे पोहोचलो. तशी ती धावतच सुटली आणि धावता धावता मला पहिल्या मजल्यावर या म्हणाली. मी गाडी लाऊन वर गेलो. त्या बाईच्या आईने दार उघडल होत. हि बाई तिच्या आईला विचारात होती नक्की काय झाल? . तिची आई म्हणाली,"  अचानक छातीत जोरात दुखू लागल पण पण आता बरे आहे.तरी  आपण आपल्या नेहमीच्या डॉक्टर कडे थोड्या वेळाने जाऊ."
मग हि बाई म्हणाली,"Thanks.  फार मदत झाली तुमची. मला सुचत न्हवते. बर झाल तुम्ही भेटलात " आणि शेकह्यांड साठी हात पुढे केला.
मी हाथ मिळवला.नो मेन्शन म्हंटल.मग तिने नाव विचारलं मी माझ  नाव सांगितलं आणि विचारलं," मला  एक नाही समजल रस्त्याने एवढी लोक जात होते. तरी तुम्ही मलाच का मदत मागितली. तेही मी विरुद्ध दिशेने जाताना.?"

ती म्हणाली " आईचा असा फोन आणि तो तिचा त्रास होतानाचा आवाज ऐकून  मी रस्त्यावरून पळत होते,मला काही सुचत न्हवत.स्टेशन जवळ पण तरीही अर्ध्या रस्त्यातून रिकामी रिक्षा कुठे मिळणार? म्हणून मी धावत सुटले. तेवढ्यात तुम्ही दिसलात. तुमच्या गाडीवर शिवसेनेचा वाघ आणि भगवा झेंडा आहे. बस. म्हंटल ह्याला मदत मागू. हा शिवसैनिक आहे, आपली नक्की मदत करणार. अगदी उलटे जावे लागले तरी करणार. "

हे ऐकून मला फार बरे वाटले, अभिमान वाटला स्वतःचा,स्वतःच्या पक्षाचा.शिवसेनाप्रमुखांची ताकद काय आहे हे समजल.
शिवसैनिक मित्रानो,  हा विश्वास लोकांच्या मनात निर्माण केलाय शिवसेनाप्रमुखांनी. तो कधीही ढळू देऊ नका. सत्ता वैगेरे सेकंडरी आहे. लोकांची मदत करणे हीच आपली प्राथमिकता आहे.    
          
हीच ती माझी गाडी त्यावरील शिवसेनेचे बोध चिन्ह वाघ,भगवा आणि जय महाराष्ट्र.  


                   

Thursday, January 9, 2014

अलका पुणेवार निमित्ताने

हि बाई अभिनेत्री म्हणून मला तरी माहिती न्हवती. गदर वैगेरे चित्रपटात छोट्याशा भूमिका व स्टेज शोज करते अस हे प्रकरण झाल्यावर समजल. ह्या बाईंच आधी एक लग्न झाल . पहिल्या पतीपासून त्यांना एक मुलगी(वय २१ काही वृत्त पत्रानुसार २५ ) आहे व ती विवाहित आहे. त्यांनी दुसरे लग्न हवाई दलातील माजी अधिकारी संजय पुणेवार ह्यांच्याशी केल. त्यांच्यापासून त्यांना दोन जुळी मुल आहेत.अलका बाईंचे वय महाराष्ट्र टाईम्स नुसार ४७ व इतर वृत्तपत्रानुसार ४४ आहे. त्यांच्या प्रियकराचे वय महाराष्ट्र टाईम्स नुसार २७ व इतर वृत्तपत्रानुसार २३ आहे.


माझ्या मनात दोन प्रश्न आले. हि बाई म्हणते कि मला माझ्या नवऱ्याचा त्रास होता.त्याचेही एका मुलीशी संबंध होते. मी फार त्रासले होते. अलोक नसता तर मी माझ्या जीवाच बर वाईट केल असत. पण माझ्या मुलांना माझ्या वागण्याचा त्रास होऊ नये व त्यांनी वडिलांची दुसरी बायको accept करायची असेल तर मी मेले अस त्यांना समजायला हव,म्हणून मी आत्महत्येचा बनाव रचला.अस हि कबूल करतीये तर त्यांना सोडलं का ? त्यांनी स्वतःच स्वताच्या अपघाताचा बनाव रचला. आणि त्यांच्यामुळे पोलिसांचा वेळ वाया गेला. नवी मुंबईतील संध्या सिंह प्रमाणे तर हे प्रकरण नसेल ना अशी शक्यता वाटून पोलिसांनी जीवतोड मेहनत घेतली. सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग व कट रचणे आणि फसवणूक असे आरोप त्यांच्यावर का लावले नाहीत ? त्यांना सोडून का दिले?


दुसर अस कि दोन दोन लग्न होऊन पुन्हा तिसरे. तेही इतक्या लहान तरुणाशी. तो अलोक पालीवाल चांगला इंजिनियर आहे. मूळचा बंगलोरचा आहे व त्याचे वडील नामांकित सर्जन आहेत. एक भाऊ परदेशात तर एक मुंबईत स्थायिक आहे. त्याने हिच्यात काय बघितलं ? मला वाटल अभिनेत्री म्हणजे फार सुंदर असेल तर तेही नाही. तसेच हि बाई अलोकच्या आई वडिलांना भेटली. त्यांना स्वतःच नाव निकिता मिश्रा सांगितलं. तसेच माझे आईवडील अपघातात गेले व त्यात माझा चेहरा खराब झाला. तुम्ही सर्जन आहात तर माझी प्लास्टिक सर्जरी करून द्या. सगळाच झोल.

नक्की काय म्हण्याच ?इतक्या जास्त वयाच्या महिलेशी लग्न करून त्याला नक्की काय सुख मिळणार आहे ? ती फार काही सुंदर नाही कि श्रीमंत नाही. तिने ह्या पोराला नादाला लावलं कि तोच हिच्या प्रेमात पडला ?पण मग प्रेमात पडण्यासारखे तिच्यात काय आहे ?

आणि समजा अलका पुणेवार ऐवजी तिच्या वयाचा माणूस असता तर ? तर मात्र मिडिया आणि महिला संघटनानी त्यांना फाडून खाल्ल असत. आता कुठे गेली ती टीनपाट महिला आघाडी ?कुठे गेला तो महिला आयोग ?

Tuesday, December 17, 2013

अखेर लोकपाल मंजूर-माझेही मत

संसदेसमोर असलेले लोकपाल विधेयक अण्णांनी मान्य  केले ह्यावरून आम आदमी पक्ष बरीच टीका करत आहे त्यावर काही लिहावास वाटल ते लिहितोय.

आम आदमी पक्षाचे कुमार विश्वास जेव्हा राळेगणला गेले व हे लोकपाल विधेयक जन लोकपाल नाही तर सरकारी लोकपाल आहे, तुलनेत तेवढे प्रभावी नाही अस बोलू लागले. त्यावरून वाद झाला. अण्णांचे काही कार्यकर्ते विश्वास ह्यांच्यावर धावून गेले.
मला वाटत ह्यावेळच्या उपोषणाचा हा टर्निंग point होता. ह्या घटनेपर्यंत देश,राजकारणी  व मिडिया  अण्णा हजारेंचे अजून एक उपोषण इतकच त्याकडे पाहत होता. व गेल्यावेळी प्रमाणे सरकार आश्वासनावर बोळवण करेल व हे उपोषण संपेल असच सर्वांच मत होत.(जरी कुणी उघड बोलून दाखवत नसले तरी ).  पण अण्णा व सहकारी ठाम होते.     

ह्या सीन मुळे आप व अण्णा ह्यांच्यातील मतभेद किती टोकाचे आहेत हे स्पष्ट झाले. आधी ते उघड झालेच होते. ह्याच दिवशी अण्णांचे सहकारी विश्वंभर चौधरी ह्यांनी काहीना वाटत हा मुद्दा असाच पडून राहावा व पुढल्या निवडणुकीत त्याचा वापर करता येईल पण आम्हाला ते नको असून जितक्या मागण्या  मान्य होऊन मंजुरीसाठी पटलावर आल्यात तेवढे तर तेवढे लोकपाल पाहिजे अशी भूमिका घेतली. तिथून हालचालींना वेग आला.

ह्यापूर्वी आंदोलनात अण्णा व सरकार ह्यांच्यात दिल्लीचे ठग होते.अण्णांच्या वतीने हे दिल्लीचे ठगच चर्चा करीत. आजच ऐकल कि रामलीला मैदनावर अण्णांची वैयक्तिक भेट केवळ आयबीएन लोकमतच्या वागळे ह्यांनीच घेतली. आणि त्यावेळी केजरीवाल वागलेंवर चिडले होते. म्हणजे आंदोलन आपल्या तंत्राने चालावे,इतरांना अण्णा भेटू नये अशी पुरेपूर काळजी केजरीवाल आणि टीमने घेतली होती. शेवटी जेव्हा पोपटराव पवार,विलासराव देशमुख वैगेरे पुढे आले  आणि ते आंदोलन मागे घेण्यात आले.

हे आंदोलन चिघळावे व पुढे त्याचा आपल्याला फायदा मिळावा अशीच केजरीवाल टीमची अपेक्षा असावी.एकीकडे राजकरणी चोर म्हण्याचे,संसदेवर टीका करायची आणि जराही तडजोडीची भूमिका घ्याची नाही ह्यामागे वातावरण पेटते ठेऊन आपला स्वार्थ साधण्याची त्यांची मानसिकता दिसून येते.

अण्णांनी ह्यापूर्वी वेगवेगळ्या मागण्यांसाठी १३ उपोषण केली व लोकपाल साठी ३. १ रुपयाची मागणी केली तर चाराणे मिळतात हा फंडा काय त्यांना नवीन नाही.आणि हळूहळू वेळोवेळी चार आण्याचा रुपया करायचा असतो. कोणतेही आंदोलन असेच चालते.एकदम सरकार एक रुपया काढून देत नाही-एकदम सर्वच्या सर्व मागण्या मान्य होत नाहीत. हे अण्णा जाणतात. आताही पुढे सुधारणा करू ह्या विश्वासावर आहे ते तरी स्वीकारुया ह्या भूमिकेवर अण्णा आले . ह्यावेळी  त्यांच्या सोबत त्यांचे जुने व खरे सहकारी होते. ह्यावेळी वाटाघाटी थेट आण्णा व सरकार अशा होत्या. म्हणूनच लोकपाल मंजूर झाले.

असो. जे लोकपाल येते त्याचे स्वागत करूया. आणि अजून एक भावाना मनात आलीये
    मराठ्यांनी पुन्हा एकदा  हादरवले दिल्लीचे तख्त!

जयहिंद! जय महाराष्ट्र!                            

Wednesday, April 17, 2013

रानडेंचा उंच झोका पण इतरांचं काय ?

महाराष्ट्रात बरीच थोर  लोक होऊन गेली. पण फुले शाहू आंबेडकर आणि शिवाजी त्यापलीकडे लोक पाहतच नाहीत. त्यापलीकडे फारस   बोलतही  नाही. सध्या उंच माझा झोकामुळे न्यायमूर्ती रानडे ह्यांची आमच्या पिढीला ओळख  झाली पण अनेक  खूप थोर व्यक्तिमत्वे महाराष्ट्रात होऊन गेली. ज्यांची फारशी ओळख महाराष्ट्रास  नाही. असलीच तर इतिहासात कुठेतरी वाचेलल  नाव इतकच. अशी थोर लोक महाराष्ट्रासमोर मालिकेच्या माध्यमातून यायला हवीत. पूर्वी अशा मालिका होत्या.  अशा मालिका अजून यायला हव्यात.

मला आठवत साधारण २००० साली  झी  मराठीवर दोन मालिका लागत.

एक होती मर्मबंध. हे मर्मबंध होते टिळक व आगरकर ह्यांच्यातील. टिळकांच प्रथम  लक्ष्य होत  स्वातंत्र्य  व नंतर सामाजिक सुधारणा. आगरकर हे मवाळ. त्याचं म्हणणं होत आधी सामाजिक सुधारणा नंतर स्वातंत्र्य. आगरकर हे केसरीचे संपादक  हि होते. टिळकांच्या नित्य संपर्कातील होते. पण सुधारणा आधी कि स्वातंत्र्य आधी ह्यातून दोघांचे वैचारिक मतभेद वाढत गेले. आगरकर केसरीतून बाहेर पडले. त्यांनी आपले समाज सुधारणाविषयक मत मांडण्यासाठी  सुधारक हे पत्र काढले. तेव्हा आगरकर Fergusson   कॉलेज जवळ राहत. तो भाग ओसाड  माळरान  होता.  त्यांना दमा  हि होता.  टिळकांनी आगरकर ह्यांना माळावरचा महारोगी म्हंटले. असा वैचारिक  मतभेदाचा  इतिहास आणि आगरकर ह्यांचे कार्य हे उत्तमरीत्या त्या मालिकेत दाखवलेलं होत.  

दुसरी मालिका होती तीच नाव आठवत नाही. ती त्या संतती नीयमन  बाबत कार्य केलेल्या कर्वे ह्यांच्यावर होती. लोकांना संतती नियमनाचा उपदेश करत असताना आपल्याला मुल नको असा विचार करणारा हा माणूस. त्यासाठी आपल्या भावना मारणारा अस  चित्रण त्यात दाखवलं. स्वतःचा वंश वाढू देणार नाही असा हा निर्धार.  ग्रेट, थोर  हि विशेषण  हि कमी पडतील.  शिवाय लोकांच्या टिका,शिव्या शाप ते कसे सहन करतात. अस सर्व त्यात होत.

अशा मालिका आता का येत नाहीत?  किती किती म्हणून नाव घेऊ ? टिळक, आगरकर,कर्वे,सार्वजनिक काका, गांधीजींचे गुरु नामदार गोखले,मुंबईचे शिल्पकार   नाना शंकरशेठ, विठ्ठल रामजी
शिंदे,कर्मवीर भाऊराव पाटील.        

Saturday, January 26, 2013

गणपती महाराज व त्यांची अजात चळवळ

अजात
यंदाचा महाराष्ट्र टाइम्स दिवाळी अंक  वाचला.त्यातील गणपती महाराज व त्यांची अजात चळवळ हा लेख वाचून मी हादरलो. .अशा कितीतरी गोष्टी आपल्याला
माहिती नसतात.म.टा.चे आभार कि त्यांनी हि माहिती आपल्यापुढे आणली. त्या लेखाचा हा सारांश.- 

गणपती महाराज .१८८७ सालचा त्यांचा जन्म.मंगरुळ दस्तगीर हे त्याचं  गाव तिवसा तालुक्यात  आहे. राष्ट्रसंत तुकडोजी आणि गाडगे महाराज यांचे ते  समकालीन होते. ते माळी समाजाचे होते. ते वारकरी-कीर्तनकार होते. अजात.जाती सोडून द्या,आज पासून आपण अजात  अशी चळवळ त्यांनी विदर्भात १९२४  साली केली होती.बर्याच लोकांनी जाती सोडून दिल्या.जात लावयाची नाही,अजात म्हण्याचे स्वतःला. त्यात सर्वच जातीचे लोक होते  त्यांना ह्या कामात इतरांकडून त्रास हि झाला तसेच सहकार्य हि मिळाले.

 एकदा अजात झाला कि त्या व्यक्तीच्या घरावर  पांढर निशाण ते लावत.जात सोडली म्हणजे आपण स्वच झालो,स्वचतेच प्रतिक म्हणून पांढर निशाण त्यांनी स्वीकारलं होत.त्यांनी श्वेत  निशाणधारी अजातीय मानव संस्था निर्माण केली.  ते सामुदायिक काल्याचा कार्यक्रम करत.पिठल  भाकरी घर-घर फिरून एकत्र करायची,व गावाच्या मंदिरात सर्व समाजाने एकत्र येऊन  हा काल्याचा प्रसाद घ्याचा. म्हणजे कुणाच्या घरातली भाकरी कोणाला हे समजत नसे.अशा प्रकारे रोटी व्यवहार  त्यांनी सुरु केले.जे जात सोडून अजात
झाले अशांची लग्न त्यांनी आप आपसात लावून दिली.  नागपूरचे  महाराज  भोसल्यांनी हि त्यांचा रत्नजडीत पोशाख देऊन सन्मान केला होता. 

त्यांनी  ‘श्वेत निशाणधारी अजात मानव संस्था’ स्थापन करुन शेकडो अनुयायी
निर्माण केले. जातीचा विरोध, विषमतेचा विरोध सर्व पातळ्यापर्यंत पोहोचला पाहिजे. जात निसर्गाच्या विरोधी आहे. मानवाच्या आत्मस्वरुपाकडे जाण्याचा मार्ग जातीमुळे अवरुद्ध होतो, असे त्यांचे तत्त्वज्ञान होते.
आपल्या कीर्तन, प्रवचनातून सर्वांभूती समभावाने वागण्याची, निष्काम वृत्तीने ईश्वरभजन करण्याची, दारु-गांजा इत्यादी व्यसनापासून अलिप्त राहण्याचा आचारधर्म त्यांनी प्रतिपादन केला. त्यांनी 
त्याकाळी अस्पृश्यांसाठी मंदिर खुले करुन दिले. कोणतेही अवडंबर न माजविता कमी खर्चात विवाह करण्यावर भर दिला. आंतरजातीय विवाहावर त्यांनी दिलेला भर व  त्यासाठी त्यांनी केलेले विशेष प्रयत्न आजही प्रेरणादायी आहेत. 

अस्पृश्यांचा मंदिर प्रवेश, मिश्र विवाहाचे ग्रामीण भागात आयोजन, श्राद्ध, तेरवी अशा कर्मकांडाना जाहीर विरोध त्यांच्या विज्ञाननिष्ठ दृष्टीचे द्योतक आहे. 1987 साली विदर्भातील अनेक सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन गणपती महाराजांची जन्मशताब्दी साजरी केली. सव्वाशे वर्षांपूर्वी ग्रामीण भागातील जन्माला आलेल्या या सामाजिक व आर्थिक दृष्टीने अभावात जगणार्या संताने आपली क्रांतिकारी व जनमानसाला धडे देणारे विचार सामान्यांच्या गळी उतरविले व श्वेत  निशाणधारी अजातीय मानव संस्था निर्माण केली याचे आश्चर्य वाटते. 


त्यांनी हिंदू धर्मातील जातींचा नव्हे, तर हिंदू-मुस्लिम भेदाचाही धीटपणे विरोध केला. ज्योतिष, मुहूर्त, कर्मकांड यांना त्यांनी टाळले. एकनाथांनी काळानुरूप वेळोवेळी आपल्या वाणी व साहित्याद्वारे विरोध केला. त्यांनी विपुल अशी काव्यसंपदा निर्माण केली आहे. भारुड, भजने, भूपाळी, हरिपाठ यासोबत त्यांनी आपली सहजसिद्धानुभवर पूर्वार्ध व उत्तरार्ध अशा दोन खंडात आणि श्री पापलोप ग्रंथात खोट्या पांडित्याचा निषेध केला व आत्मस्वरुपाचे मर्म तार्किक पद्धतीने मांडले आहे. गुलाबराव नायगावकर यांच्या सत्यशोधकी
जलशाला, डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या शिक्षण प्रसाराला व तुकडोजी, गाडगेबाबांच्या समाजकल्याणार्थ त्यांनी प्रत्यक्ष कृतीद्वारे पाठिंबा दिला.या कामात सनातन्यांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्लेही केले. पण,
त्यांनी अंगीकृत कार्य सोडले नाही. गणपती महाराजांची काव्यसंपदा व चरित्र  जिज्ञासूंनी मुळातून वाचण्यासारखी आहे.

तसेच महाराष्ट्र जात निर्मुलन परिषदेचे ते अध्यक्ष होते. पण १९३४ साली त्याचं निधन झाल.त्यांच्या नंतरही त्यांच्या अनुयायांनी आंदोलन सुरूच ठेवलं. 


पुढे भारत स्वतंत्र झाला. स्वातंत्र्य मिळाले,मग जात आधारीत आरक्षण सुरु झाल. त्यात ह्या लोकांची नोंद "अजात" म्हणून झाली.ह्यांना कोणतेच आरक्षण मिळत नाही कि सवलती नाहीत.ह्या लोकांना दुख हे कि ज्या कारणासाठी आपण जात सोडली त्याची साधी दखल हि कुणी घेत नाही.हि चळवळ उपेक्षित राहिली. 

काही लोकांना आपल्या इतर भावांच्या जातीच्या  दाखल्या आधारे जात प्रमाणपत्र मिळाले.पण  जे जात सोडून अजात झाले त्यांच्याशी त्यांच्या नातेवाइकानी संबंध तोडलेच होते.   त्यामुळे बर्याच लोकना आरक्षणाचा  लाभ घेता येत नाही.  शिवाय बर्याच जाती ह्या मंडल आयोगामुळे आरक्षित झाल्या.हा आयोग लागू होता होता मध्ये ३ पिढ्या गेलेल्या.त्यामुळे इतकी जुनी प्रमाणपत्र ,कागपत्रे मिळणे  अशक्यच 

२००४ साली मुख्य  सचिव अशोक खोत ह्यांनी एक जनसुनावणी घेऊन अजातांच्या प्रश्नी तोडगा काढू असे आश्वासन दिले होते.त्यात समाजातील बर्याच व्यक्तीने आपले गाऱ्हाणे मांडले.पण पुढे काही झाले नाही.

जात सोडण्याची चळवळ,अजात होण्याची चळवळ जातीच्या रकान्यावर "अजात " म्हणून नोंद होऊन संपली.   

Wednesday, August 8, 2012

टीम अण्णा बरखास्ती बद्धल



आणा टीम-कोअर कमिटी बरखास्त  झाली आणि त्या आंदोलनाच मूल्यमापन सुरु झाल. आम्ही ह्या आंदोलनाच्या कायम विरोधात होतो.अगदी थोरल्या साहेबांनी पाठींबा दिला तरी.पण ह्या सर्व चर्चा चालू असताना एक मुद्दा कुणीच लक्षात घेत नाही.कि 
चाराणे हवे असतील १ रुपयाची डिमांड करावी लागते. सरकारने चाराणे सरकारी लोकपाल मधून मंजूर केले मग ते सोडून ह्यांना मधेच भ्रष्टाचार कसा काय आठवला तोही जुना?          
 हा मुद्दा कुणीच लक्षात नाही घेतला ना आणा टीम ने ना आणा विरोधकांनी  .तो असा -

जुलै मधील आंदोलन हे लोकपाल पारित करा म्हणून नाही तर १५ मंत्र्यांची चौकशी करा व त्यासाठी समिती नेमा अस होत. जर ह्या अधिवेशनात लोकपाल मग तो सरकारी तर सरकारी पास करा अस म्हंटल असत तर जन समर्थन हि मिळू शकल असत आणि कदाचित ते पास हि झाल असत.

पण सरकार १५ लोकांना काढणार नाही,किवा चौकशी समिती नेमणार नाही कारण हे सरकारने आरोप मान्य केल्यासारखं होईल.हे लोकांना समजलं म्हणून लोक आली नाहीत.आता मुंबईला गर्दी का न्हवती तर कारण वेगळी आहेत.मुंबईत सध्या फक्त ठाकरे आणि ठाकरेच जनमान्य आहेत तेच गर्दी जमवू शकतात.(तेही संध्यकाळी किंवा सुट्टीच्या दिवशी.वर्किंग डेज ला किंवा सकाळी- दुपारी नाही)तेव्हा मुंबई ला हि जन लोकपाल साठी आंदोलन होत व गर्दी न्हवती,अपयशाची सुरुवात तिथून झाली हे पहिले डोक्यातून काढून टाका.

तेव्हा टीम अण्णा ची हि मागणी चूक आहे हे त्यानाही माहिती होत व लोकांना हि समजल. पण मग त्यांनी अशी मागणी का केली? तर मला ह्याच उत्तर अस वाटत कि मुळात जे UPA २ चे पहिले दोन वर्ष २ जी,कॉमन वेल्थ आणि कसले कसले घोटाळे बाहेर आले त्यातून एक अराजक माजत होत.पूर्वी घोटाळे झाले नाहीत का? झाले आणि पचवले.कारण मिडिया न्हवती.रेडीओ च्या सरकारी बातम्या व वृत्तपत्र.आता रोज रोज मिडिया ट्रायल होऊ लागली.रोज वाभाडे निघू लागले. म्हणूनच सरकारने माफ करा सोनिया च्या कृपेने हि मंडळी पुढे आली असावीत. आणि त्यांनी अण्णाना  पुढे केल असाव. म्हणजे सरकार चा राग आहे तर तो इथे व्यक्त करा. असे. सेफ्टी wall

१५ मंत्री भ्रष्ट हा मुद्दाच नाही.१५ लोकांनी विरोधी मतदान केल तरी अडणार नाहीये.सभागृह सर्वोच्च आहे. मग तरी हा मुद्दा का काढला? कोणतेही आंदोलन पहिल्या दिवशी जे डिमांड करते १०० टक्के पूर्ण होत अस नाही.आंदोलनात २ पावलं मागे पुढे होतच असत.अण्णा ह्यांचा जन लोकपाल नाही तर सरकारी लोकपाल तरी घेता आला असता. काही मागण्या नसतील त्यात पण बर्याचशा मागण्या त्यात पूर्ण होत होत्या.आणि अण्णा सारख्यांना हे समजत नाही अशातला भाग नाही.त्यांची आंदोलन आठवा. ज्या मागण्या त्यांच्या  आहेत त्या १०० टक्के मानल्या अस होता का कधी? एकाच उपोषणात?चाराणे हवे असतील तर एक रुपया मागवा लागतो हे कामगार चळवळ,सामाजिक चळवळ पासूनच सूत्र ह्या टीम ला माहिती नाही अस कस असू शकेल? आणि कदाचित म्हणून अण्णा व टीम मध्ये काही काही स्टेटमेंट मध्ये मतभिनता येत होती.आता तर सुरेश पठारे-अण्णा चे स्वीय सचिव पण मी केवळ अण्णाबाबत बोलणार म्हणतात. ह्यात काय ते समजा.                                   

तसेच राजकीय विश्लेषक म्हणतात कि आता जर हा पक्ष निघाला तर हा पक्ष कॉंग्रेस विरोधी मतांचे विभाजन करणार.तसेच आंदोलनात दलित-मुस्लीम-आदिवासी नाहीत व शेवटी शेवटी आंदोलन हे शहरी भागातच मर्यादित झाले.म्हणजे ह्या पक्षाला शहरी भागात जास्त प्रतिसाद मिळेल.म्हणजे हा पक्ष भाजप ची मत खाणार.त्यामुळे हे कॉंग्रेस चेच हस्तक असतील हि शंका बळावते.   
कुमार सप्तर्षी म्हणतात -
1)अण्णा नि आपली मानगूट लोकपाल मधून सोडवली.
2)आणांच्या एका आंदोलनातले लोक पुढच्या आंदोलनात  नसतात. 

आता अण्णा ह्यातून बाजूला होणार व एखादा नवीन मुद्दा  घेऊन निदान महारष्ट्रात तरी आपली चालते हे दाखवणार.व आपला पूर्वीचा आब परत मिळवणार.हे नक्की.आणि त्यांनी कराव.आमच्या शुभेच्छा. किंवा अगदीच लोकपालच अपयश बोचल असेल तर महाराष्ट्रात विद्यमान लोकायुक्त पद्धतीत सुधारणा करून घ्याव्यात.       

Saturday, March 31, 2012

उद्धवजी आगे बढो,हम तुम्हारे साथ है


ठाण्यात कोन्ग्रेस आपल्याला सपोर्ट करणार हे ऐकून मला उद्धव साहेबांच्या राजकरणाबधल पुन्हा एकदा समाधान वाटल. खरे तर ठाण्यासाठी दादर ला जायची गरज न्हवती.३ जण आपण आधीच फोडले होते. तरी गेले तें गेले.असो.जेव्हा कल्याण डोंबिवलीत पेच निर्माण झाला तेव्हा मोठे साहेब बोलले कि मनसेने कोन्ग्रेस ला पाठींबा द्यावाच,येवू द्या एकदा लोकांसमोर तें.त्या मुळे दादरकर गप्प बसले.

मग इथे दादरचा टेकू घ्याची गरज न्हवती.पण घेतला.व आता जो आकंड तांडव दादरकरांचा चालू आहे तो कशामुळे? नाशिक मुळे कि standing चे अंडर standing जमल नाही म्हणून? जेवढे महाराष्ट्राला दादरकर बाबत माहिती त्यानुसार तें त्या त्या गावच त्या त्या गावापुरत ठेवतात.त्यांच वाक्य -"इथे पाठींबा दिला म्हणून दुसरीकडे द्यावा अस काही ठरलं नाहीये. "

म्हणजे खरी गेम हि.पण कारण पुढे करयचं नाशिकच.आणि काय नाशिक नशिक चालवाल आहे? आम्ही गप बसलो म्हणून तुम्ही आलात ना? आणि राष्ट्रवादी तटस्थ मग त्यांना हे राज्यसभेला मदत करणार.काहीही. तेवढे वाईट दिवस अजून पवार साहेबांचे आलेले नाहीत. तस काही न्हवत.खर हे कि त्यांना स्थायी हवी होती नाही मिळाली मग हे सगळ चालू केल.

पण आमचे उद्धव साहेब काय कच्या गोट्या नाही खेळले.त्यांनी एकाच वेळीस दादर,रेशीमबाग, बारामती सगळ्यांच्या गोट्या बाद केल्या.लय हौस आहे भारत जलाव पक्षाला आमचे चुलते एकत्र आण्याची.घ्या बसवून तुम्हीच उरावर.आम्हाला फरक नाही पडत.उद्धवजी मध्ये म्हणाले ज्यांनी दादरला आमच्या शिवसैनिकांच्या डोक्यात पहिल्या मजल्यावरून नारळ फेकले त्या शिव्सैनाकांची आठवण आहे आम्हाला अजूनही. त्यांच्याशी प्रतारणा आम्ही करणार नाही.

तेव्हा नाद करयचा नाही.सत्ता आम्ही कशी पण आणू.आम्हाला तात्विक गोष्टी शिकवू नयेत.पाठींबा कुणाचाही घेऊ.मराठी माणसासाठी काहीही. हा पण ती सत्ता राबवायला कमी पडलो तर मात्र आम्हाला खाली खेचायचा पूर्ण अधिकार जनतेला आहे दादरला किंवा बारामती ला नाही.

ता.क.स्थायी नाही तर परिवहन द्या. जो देईल तो माझा. मी सत्तेचा,सत्ता देणार्याचा.

अवांतर: मार्मिक वरून साहेबांचे सदर - टपल्या आणि टिचक्या

कर्नाटक पाठोपाठ गुजरात मध्ये भाजप आमदार ब्लू फिल्म बघताना आढळले.---बातमी
तरीच भाजप व मनसे च एवढ हल्ली जमतंय.मनसे कडे ब्लू प्रिंट(?) आहे आणि भाजप कडे ब्लू फिल्म